शहरं
Join us  
Trending Stories
1
“आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी आत्मपरीक्षणाची वेळ आली आहे”: सरसंघचालक मोहन भागवत
2
“मोदी सरकार काय लपवायचा प्रयत्न करत आहे?”; SIR वरून काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंचा सवाल
3
नगरपरिषद निवडणुकांसाठी एकनाथ शिंदेंचा धडका, १० दिवसांत ५३ सभा; जनता कौल देईल का?
4
पुतिन यांच्या भारत दौऱ्यात सर्वात मोठ्या डीलची तयारी...! संपूर्ण जग बघत राहणार, पाकिस्तान-चीनचं टेन्शन वाढणार
5
“CM असताना अडीच तासांपेक्षा जास्त कधी झोपलो नाही, विरोधकांची झोप उडवली”: एकनाथ शिंदे
6
महापरिनिर्वाण दिन २०२५: मध्य रेल्वे अतिरिक्त विशेष लोकल सेवा चालवणार; पाहा, वेळापत्रक
7
"...तर ताबडतोब देश सोडा!", डोनाल्ड ट्रम्प यांची मादुरो यांना फोनवर थेट धमकी; अमेरिका-व्हेनेझुएला युद्ध पेटणार?
8
अंत्यविधीसाठी कुटुंब परगावी, चोरट्यांनी साधली संधी; वॉशिंग मशीनमधील दागिने-पैसे केले लंपास
9
"नॉन-व्हेज खाणारे वाईट आहेत, असं मी म्हणत नाही, पण..."; पंतप्रधान मोदी संसदेत नेमकं काय बोलले?
10
याला म्हणतात 'इंटरनॅशनल बेइज्जती'! रशियन तरुणींना कोणत्या देशाचे तरुण सर्वाधिक आवडतात? पाकिस्तानी ब्लॉगरचा VIDEO पाहून हसू आवरणार नाही!
11
VIDEO : रोहित-गंभीर यांच्यात वाद? ड्रेसिंग रुममधील व्हायरल व्हिडिओमुळे रंगली चर्चा
12
SIR वरुन पश्चिम बंगालमध्ये तणाव वाढला; कोलकात्यात शेकडो BLO चे तीव्र आंदोलन...
13
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात 'वंदे मातरम्'वर 10 तास चर्चा; PM मोदी सहभागी होणार...
14
“आमच्याकडे झालेल्या निवडणुका सर्वांत निष्पक्ष होत्या”; राहुल गांधींना मित्र पक्षाचा घरचा अहेर
15
तीन स्मार्ट मैत्रिणी अन् महिन्याला लाखोंची कमाई ! ब्रम्होसची माहिती देत पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या निशांतला केवळ तीन वर्षांची शिक्षा
16
लैंगिक शोषणाच्या तक्रारींची भिती दाखवणाऱ्या प्राध्यापकाला इतकी सौम्य शिक्षा कशी? चार प्राध्यापकांची केली होती फसवणूक
17
IND vs SA: रोहित शर्मासोबत एअरपोर्टवर नेमकं काय घडलं? विराट कोहलीही टक लावून बघतच बसला...
18
डिजिटल अरेस्टवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; देशभरातील सर्व प्रकरणे CBI कडे सोपवली
19
“आयोगाने पारदर्शी, प्रामाणिकपणे...”; निवडणुका स्थगित होताच असीम सरोदेंनी केली मोठी मागणी
20
पोर्टेबल लॅब, टॉयलेट, पाणी, अदृश्य सेना...; कुठल्याही देशात जाताना काय काय सोबत घेऊन फिरतात पुतिन?
Daily Top 2Weekly Top 5

धरणाचे पाणी शेतात वळवू

By admin | Updated: August 9, 2015 21:02 IST

भारत पाटणकर यांचा इशारा : वांग-मराठवाडीवर क्रांतिदिनी श्रमिक मुक्ती दलाचे आंदोलन

सणबूर : ‘जिल्ह्यातील सर्व धरणग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासनाने येत्या हिवाळी अर्थसंकल्पामध्ये वीस हजार कोटींची तरतूद करावी, अन्यथा सर्व धरणांतील पाणी सोडून जमिनी ताब्यात घेऊन सामूहिक शेती केली जाईल,’ असा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी दिला. वांग-मराठवाडी येथे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. अशोक पाटील, वसंत मोहिते, श्रीरंग पाटील, उत्तम पवार, पोपट लोहार यांची प्रमुख उपस्थिती होती.डॉ. पाटणकर म्हणाले, ‘गेली अनेक वर्षं धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचे काम अपूर्ण आहे. विशेषत: १९७६ पूर्वीच्या आणि १९९९६-९७ या काळात झालेल्या कोयना, वारणा, धोम, कण्हेर, वांग-मराठवाडी, उजनी यासह इतर धरणांतील बाधित कुटुंबांच्या पुनर्वसनाची कामे निधीअभावी ठप्प झाली आहेत.शासनाने एकीकडे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घेतल्या आणि धरणे बांधली. त्या धरणाच्या पाण्यात गावे आणि शेती बुडाली त्या शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांचे पुनर्वसन बाजूला ठेवून शासनाने जलयुक्त शिवायोजनेची घोषणा केली. या योजनेवर शासन कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. आमचा विरोध जलयुक्त शिवाराला नाही. परंतु ते बांधलेले बंधारे भरण्यासाठी लागणारा साडेतीनशे ते पाचशे मिलीमीटर पाऊस हा दुष्काळी भागात पडत नाही. मग या बंधाऱ्यांत पाणी सोडणार कसे? यासाठी जास्त पाऊस पडणाऱ्या भागामध्ये धरणे बांधली. परंतु शासनाचे योग्य नियोजन नसल्यामुळे कोयनेपासून वारणेपर्यंत आणि उरमोडीपासून तारळी पर्यंतचे पाणी काही प्रमाणात सूर्याच्या उष्णेतेने वाया जात आहे, तर उरलेले कर्नाटकात जात आहे आणि दुष्काळी भागांना मात्र टँकरने पाणीपुरवठा केला जातो. ही एक प्रकारची सामाजिक गुन्हेगारी आहे. ती यापुढे खपवून घेणार नाही. असा इशारा भारत पाटणकर यांनी दिला. ते म्हणाले, शासनाने येत्या हिवाळी अधिवेशनात वीस हजार कोटींची तरतूद करून शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी पोहोचवावे. शिवाय उरलेले पुनर्वसन तातडीने करावे, अन्यथा आम्ही पुकारलेला एल्गार थांबवणार नाही.’ यावेळी शेकडो धरणग्रस्त उपस्थित होते. दिलीप पाटील यांनी प्रास्ताविक केले. जगन्नाथ विभुते यांनी आभार मानले. (वार्ताहर) ...पण शेतकऱ्यांना द्यायला पैसा नाही!५५ वर्षांपासून कोणतेही पुनर्वसन झालेले नाही आणि शासन म्हणतंय पैसे नाहीत. तुम्हाला चिक्की खायला पैसे आहेत. पूर्वीच्या सरकारमध्ये सिंचन घोटाळ्यात खायला अजित पवार, सुनील तटकरे यांना पैसा होता. भुजबळांना भानगडी करायला पैसा होता; पण शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाहीत,’ असा आरोप डॉ. पाटणकर यांनी यावेळी केला....अन्यथा सर्वांना बरोबर घेऊन आंदोलन !शेतकऱ्यांना पैसे दिले तर आत्महत्या थांबतील, आम्ही अनेक चांगल्या मुद्द्यांचा आराखडा सरकारला पाठवला आहे. पण, हे सरकार यावर चर्चा करायलाच तयार नाही. पण यापुढे तुमच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही, तर जानेवारी अखेर राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना, शेतमजुरांना प्रकल्पग्रस्तांना घेऊन आंदोलन सुरू करू, असा इशारा डॉ. भारत पाटणकर यांनी दिला.