शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
3
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
4
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
5
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
6
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
7
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
8
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
9
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
10
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
11
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
12
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
13
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
14
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
15
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
16
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
17
जीएसटी 2.0चा धमाका : क्वीड vs एसप्रेसो vs अल्टो, देशातील सर्वात स्वस्तकार कोणती? 'या' कारवर मिळेल सर्वाधिक फायदा
18
Kieron Pollard: किरॉन पोलार्डचा वर्ल्ड रेकॉर्ड! 'असा' पराक्रम करणारा जगातील पहिलाच
19
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
20
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?

धरणाचे पाणी शेतात वळवू

By admin | Updated: August 9, 2015 21:02 IST

भारत पाटणकर यांचा इशारा : वांग-मराठवाडीवर क्रांतिदिनी श्रमिक मुक्ती दलाचे आंदोलन

सणबूर : ‘जिल्ह्यातील सर्व धरणग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासनाने येत्या हिवाळी अर्थसंकल्पामध्ये वीस हजार कोटींची तरतूद करावी, अन्यथा सर्व धरणांतील पाणी सोडून जमिनी ताब्यात घेऊन सामूहिक शेती केली जाईल,’ असा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी दिला. वांग-मराठवाडी येथे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. अशोक पाटील, वसंत मोहिते, श्रीरंग पाटील, उत्तम पवार, पोपट लोहार यांची प्रमुख उपस्थिती होती.डॉ. पाटणकर म्हणाले, ‘गेली अनेक वर्षं धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचे काम अपूर्ण आहे. विशेषत: १९७६ पूर्वीच्या आणि १९९९६-९७ या काळात झालेल्या कोयना, वारणा, धोम, कण्हेर, वांग-मराठवाडी, उजनी यासह इतर धरणांतील बाधित कुटुंबांच्या पुनर्वसनाची कामे निधीअभावी ठप्प झाली आहेत.शासनाने एकीकडे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घेतल्या आणि धरणे बांधली. त्या धरणाच्या पाण्यात गावे आणि शेती बुडाली त्या शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांचे पुनर्वसन बाजूला ठेवून शासनाने जलयुक्त शिवायोजनेची घोषणा केली. या योजनेवर शासन कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. आमचा विरोध जलयुक्त शिवाराला नाही. परंतु ते बांधलेले बंधारे भरण्यासाठी लागणारा साडेतीनशे ते पाचशे मिलीमीटर पाऊस हा दुष्काळी भागात पडत नाही. मग या बंधाऱ्यांत पाणी सोडणार कसे? यासाठी जास्त पाऊस पडणाऱ्या भागामध्ये धरणे बांधली. परंतु शासनाचे योग्य नियोजन नसल्यामुळे कोयनेपासून वारणेपर्यंत आणि उरमोडीपासून तारळी पर्यंतचे पाणी काही प्रमाणात सूर्याच्या उष्णेतेने वाया जात आहे, तर उरलेले कर्नाटकात जात आहे आणि दुष्काळी भागांना मात्र टँकरने पाणीपुरवठा केला जातो. ही एक प्रकारची सामाजिक गुन्हेगारी आहे. ती यापुढे खपवून घेणार नाही. असा इशारा भारत पाटणकर यांनी दिला. ते म्हणाले, शासनाने येत्या हिवाळी अधिवेशनात वीस हजार कोटींची तरतूद करून शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी पोहोचवावे. शिवाय उरलेले पुनर्वसन तातडीने करावे, अन्यथा आम्ही पुकारलेला एल्गार थांबवणार नाही.’ यावेळी शेकडो धरणग्रस्त उपस्थित होते. दिलीप पाटील यांनी प्रास्ताविक केले. जगन्नाथ विभुते यांनी आभार मानले. (वार्ताहर) ...पण शेतकऱ्यांना द्यायला पैसा नाही!५५ वर्षांपासून कोणतेही पुनर्वसन झालेले नाही आणि शासन म्हणतंय पैसे नाहीत. तुम्हाला चिक्की खायला पैसे आहेत. पूर्वीच्या सरकारमध्ये सिंचन घोटाळ्यात खायला अजित पवार, सुनील तटकरे यांना पैसा होता. भुजबळांना भानगडी करायला पैसा होता; पण शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाहीत,’ असा आरोप डॉ. पाटणकर यांनी यावेळी केला....अन्यथा सर्वांना बरोबर घेऊन आंदोलन !शेतकऱ्यांना पैसे दिले तर आत्महत्या थांबतील, आम्ही अनेक चांगल्या मुद्द्यांचा आराखडा सरकारला पाठवला आहे. पण, हे सरकार यावर चर्चा करायलाच तयार नाही. पण यापुढे तुमच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही, तर जानेवारी अखेर राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना, शेतमजुरांना प्रकल्पग्रस्तांना घेऊन आंदोलन सुरू करू, असा इशारा डॉ. भारत पाटणकर यांनी दिला.