शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

कासच्या तिरी झक्कास कालवण अन् भाकरी! - खडकांवर रंगतो खेळ; भांडी धुण्यासाठीही मुक्त पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 00:51 IST

जागतिक वारसास्थळ म्हणून कोंदण लाभलेल्या कास पठारावर पर्यटकांची पावसाळ्यातच गर्दी असायची. हा ट्रेंड गेल्या काही वर्षांत बदलत चालला आहे.

ठळक मुद्देयुवांचा ओढा वाढला

प्रगती जाधव-पाटीलजागतिक वारसास्थळ म्हणून कोंदण लाभलेल्या कास पठारावर पर्यटकांची पावसाळ्यातच गर्दी असायची. हा ट्रेंड गेल्या काही वर्षांत बदलत चालला आहे. कास पठाराबरोबरच कास तलावाच्या भोवती असलेल्या धनदाट झाडांच्या संगतीने सुट्यांच्या निमित्ताने पार्टी रंगत आहेत. विशेष म्हणजे मोठ्या शहरांतून येणाऱ्या पाहुण्यांना चुलीवरचं जेवण करून घालण्याकडे सातारकरांचा कल वाढत आहे. त्यामुळेच कासच्या तिरी... कालवण अन् भाकरीची रंगलेली पार्टी अनेकांना मोहात पाडते.

घरी आलेल्या पाहुण्याला खाता-पिता पाठवायचं नाही ही सातारी पाहुणचाराची खासियत. शहरात कितीही आधुनिकता आणि यांत्रिकीकरण आले असले तरीही सातारकरांच्या मनात हा पारंपरिकतेचा पगडा अद्यापही घरोघरी पाहायला आणि अनुभवायला मिळतो. पाहुण्याचं आगमन कोणत्या वेळेवर होतेय, यावर त्यांचा पाहुणचार कसा करायचा? हे ठरतं. सकाळी नऊ आणि सायंकाळी पाचच्या सुमारास येणाºया पाहुण्याचा नाष्टा सक्तीचा! तर जेवणाच्या वेळेत आलेल्याला जेवल्याशिवाय पाठवायचे नाही हे अगदी पक्के ठरलेलेच! एखादा पाहुणा मुक्कामी आला तर दुसºयादिवशी निसर्ग भोजन हमखास होणार. शहरापासून अवघ्या २६ किलोमीटरवर असलेल्या कास तलावाला सर्वाधिक पसंती दिली जाते. स्वयंपाक करायला आवश्यक असणारे पाणी तलावातून आणता येते. त्यामुळे शहरातून जास्तीचे पाणी आणण्याची गरज पडत नाही. सरपण मुबलक आणल्यामुळे घरातून येताना स्वयंपाक तयार करण्याचे जिन्नस आणले की येथे झक्कास स्वयंपाकाचा बेत रंगतो.झुडपं म्हणजे मिनी किचनच..!कास तलावाच्या लगत असलेल्या झुडपांच्या सावलीत दगडांची चुल करून तेथे स्वयंपाक केला जातो. सुट्यांमध्ये येथे येणाºयांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमााणावर वाढत आहे. कित्येकदा घरातून सगळं आठवणीने घेतले तरीही एखादी वस्तू घेण्याची विसरली जाते. कधी कोणाकडे मीठ नसते, तर कधी हळद विसरलेली असते, मसाल्याच्या पुड्या सापडत नाहीत तर कोणाला चूल पेटवायला काडीपेटी विसरल्याचे लक्षात येते. अशा सर्व विसराळूंसाठी ही झुडपे म्हणजे मिनी किचन आहेत. येथे पूर्वी स्वंयपाक करून गेलेले अनेकजण झुडपांमध्ये पुड्या बांधून हळद, मीठ, काडीपेटी, मसाल्याच्या पुड्या ठेवतात. ज्याला गरज आहे, तो त्याचा वापर करतो. आणि स्वत:ची सोय झाल्यामुळे तो पुढे येणाºयासाठी या वस्तू प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून ती पिशवी झुडपात सुरक्षित ठिकाणी ठेवली जाते.स्वयंपाक करण्यासाठी कासला पहिली पसंती!कुटूंबाबरोबर पुर्ण एक दिवस मुक्त वातावरणात आणि चुलीवरचं जेवण हवं असेल तर कास तलाव परिसराला सर्वाधिक पंसती दिली जाते. स्वयंपाक करायला मुबलक पाणी आणि सरपणाची मुक्त उपलब्धता या दोन कारणांमुळे येथे स्वयंपाकाच्या चुली पेटतात. वातावरणात कितीही उकाडा असला तरी कास परिसरातील वारे थंड असते म्हणून उन्हाळ्याच्या दिवसांत येथे येणाºयांच्या संख्या मोठी आहे.ही असते तयारी...!पूर्ण दिवस व्यतित करायला येणारे सर्व काही तलाव परिसरात बनवतात. पण ज्यांना चुलीवरचा रस्सा खायचा आहे आणि ज्यांच्याकडे वेळ कमी आहे, ते घरातूनच भाकरी, भात, रश्याचा मसाला आदी तयार करून आणतात. तलाव परिसरात आले की रस्सा फोडणीला टाकतात. मुबलक वेळ असणारे मात्र, कांदा, टोमॅटो, पीठ, तांदुळ, दोन तीन पातेले, कढई, पळी, उलतणे आदी सर्व वस्तु सोबत आणतात. जाताना भांडी धुवून वाळवून नेण्याची त्यांची मानसिकता असते.