शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

कासच्या तिरी झक्कास कालवण अन् भाकरी! - खडकांवर रंगतो खेळ; भांडी धुण्यासाठीही मुक्त पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 00:51 IST

जागतिक वारसास्थळ म्हणून कोंदण लाभलेल्या कास पठारावर पर्यटकांची पावसाळ्यातच गर्दी असायची. हा ट्रेंड गेल्या काही वर्षांत बदलत चालला आहे.

ठळक मुद्देयुवांचा ओढा वाढला

प्रगती जाधव-पाटीलजागतिक वारसास्थळ म्हणून कोंदण लाभलेल्या कास पठारावर पर्यटकांची पावसाळ्यातच गर्दी असायची. हा ट्रेंड गेल्या काही वर्षांत बदलत चालला आहे. कास पठाराबरोबरच कास तलावाच्या भोवती असलेल्या धनदाट झाडांच्या संगतीने सुट्यांच्या निमित्ताने पार्टी रंगत आहेत. विशेष म्हणजे मोठ्या शहरांतून येणाऱ्या पाहुण्यांना चुलीवरचं जेवण करून घालण्याकडे सातारकरांचा कल वाढत आहे. त्यामुळेच कासच्या तिरी... कालवण अन् भाकरीची रंगलेली पार्टी अनेकांना मोहात पाडते.

घरी आलेल्या पाहुण्याला खाता-पिता पाठवायचं नाही ही सातारी पाहुणचाराची खासियत. शहरात कितीही आधुनिकता आणि यांत्रिकीकरण आले असले तरीही सातारकरांच्या मनात हा पारंपरिकतेचा पगडा अद्यापही घरोघरी पाहायला आणि अनुभवायला मिळतो. पाहुण्याचं आगमन कोणत्या वेळेवर होतेय, यावर त्यांचा पाहुणचार कसा करायचा? हे ठरतं. सकाळी नऊ आणि सायंकाळी पाचच्या सुमारास येणाºया पाहुण्याचा नाष्टा सक्तीचा! तर जेवणाच्या वेळेत आलेल्याला जेवल्याशिवाय पाठवायचे नाही हे अगदी पक्के ठरलेलेच! एखादा पाहुणा मुक्कामी आला तर दुसºयादिवशी निसर्ग भोजन हमखास होणार. शहरापासून अवघ्या २६ किलोमीटरवर असलेल्या कास तलावाला सर्वाधिक पसंती दिली जाते. स्वयंपाक करायला आवश्यक असणारे पाणी तलावातून आणता येते. त्यामुळे शहरातून जास्तीचे पाणी आणण्याची गरज पडत नाही. सरपण मुबलक आणल्यामुळे घरातून येताना स्वयंपाक तयार करण्याचे जिन्नस आणले की येथे झक्कास स्वयंपाकाचा बेत रंगतो.झुडपं म्हणजे मिनी किचनच..!कास तलावाच्या लगत असलेल्या झुडपांच्या सावलीत दगडांची चुल करून तेथे स्वयंपाक केला जातो. सुट्यांमध्ये येथे येणाºयांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमााणावर वाढत आहे. कित्येकदा घरातून सगळं आठवणीने घेतले तरीही एखादी वस्तू घेण्याची विसरली जाते. कधी कोणाकडे मीठ नसते, तर कधी हळद विसरलेली असते, मसाल्याच्या पुड्या सापडत नाहीत तर कोणाला चूल पेटवायला काडीपेटी विसरल्याचे लक्षात येते. अशा सर्व विसराळूंसाठी ही झुडपे म्हणजे मिनी किचन आहेत. येथे पूर्वी स्वंयपाक करून गेलेले अनेकजण झुडपांमध्ये पुड्या बांधून हळद, मीठ, काडीपेटी, मसाल्याच्या पुड्या ठेवतात. ज्याला गरज आहे, तो त्याचा वापर करतो. आणि स्वत:ची सोय झाल्यामुळे तो पुढे येणाºयासाठी या वस्तू प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून ती पिशवी झुडपात सुरक्षित ठिकाणी ठेवली जाते.स्वयंपाक करण्यासाठी कासला पहिली पसंती!कुटूंबाबरोबर पुर्ण एक दिवस मुक्त वातावरणात आणि चुलीवरचं जेवण हवं असेल तर कास तलाव परिसराला सर्वाधिक पंसती दिली जाते. स्वयंपाक करायला मुबलक पाणी आणि सरपणाची मुक्त उपलब्धता या दोन कारणांमुळे येथे स्वयंपाकाच्या चुली पेटतात. वातावरणात कितीही उकाडा असला तरी कास परिसरातील वारे थंड असते म्हणून उन्हाळ्याच्या दिवसांत येथे येणाºयांच्या संख्या मोठी आहे.ही असते तयारी...!पूर्ण दिवस व्यतित करायला येणारे सर्व काही तलाव परिसरात बनवतात. पण ज्यांना चुलीवरचा रस्सा खायचा आहे आणि ज्यांच्याकडे वेळ कमी आहे, ते घरातूनच भाकरी, भात, रश्याचा मसाला आदी तयार करून आणतात. तलाव परिसरात आले की रस्सा फोडणीला टाकतात. मुबलक वेळ असणारे मात्र, कांदा, टोमॅटो, पीठ, तांदुळ, दोन तीन पातेले, कढई, पळी, उलतणे आदी सर्व वस्तु सोबत आणतात. जाताना भांडी धुवून वाळवून नेण्याची त्यांची मानसिकता असते.