शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
2
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
3
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
4
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
5
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
6
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
7
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
8
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
9
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
10
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
11
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
12
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
13
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
14
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
15
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
16
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
17
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
18
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
19
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
20
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा

कासच्या तिरी झक्कास कालवण अन् भाकरी! - खडकांवर रंगतो खेळ; भांडी धुण्यासाठीही मुक्त पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 00:51 IST

जागतिक वारसास्थळ म्हणून कोंदण लाभलेल्या कास पठारावर पर्यटकांची पावसाळ्यातच गर्दी असायची. हा ट्रेंड गेल्या काही वर्षांत बदलत चालला आहे.

ठळक मुद्देयुवांचा ओढा वाढला

प्रगती जाधव-पाटीलजागतिक वारसास्थळ म्हणून कोंदण लाभलेल्या कास पठारावर पर्यटकांची पावसाळ्यातच गर्दी असायची. हा ट्रेंड गेल्या काही वर्षांत बदलत चालला आहे. कास पठाराबरोबरच कास तलावाच्या भोवती असलेल्या धनदाट झाडांच्या संगतीने सुट्यांच्या निमित्ताने पार्टी रंगत आहेत. विशेष म्हणजे मोठ्या शहरांतून येणाऱ्या पाहुण्यांना चुलीवरचं जेवण करून घालण्याकडे सातारकरांचा कल वाढत आहे. त्यामुळेच कासच्या तिरी... कालवण अन् भाकरीची रंगलेली पार्टी अनेकांना मोहात पाडते.

घरी आलेल्या पाहुण्याला खाता-पिता पाठवायचं नाही ही सातारी पाहुणचाराची खासियत. शहरात कितीही आधुनिकता आणि यांत्रिकीकरण आले असले तरीही सातारकरांच्या मनात हा पारंपरिकतेचा पगडा अद्यापही घरोघरी पाहायला आणि अनुभवायला मिळतो. पाहुण्याचं आगमन कोणत्या वेळेवर होतेय, यावर त्यांचा पाहुणचार कसा करायचा? हे ठरतं. सकाळी नऊ आणि सायंकाळी पाचच्या सुमारास येणाºया पाहुण्याचा नाष्टा सक्तीचा! तर जेवणाच्या वेळेत आलेल्याला जेवल्याशिवाय पाठवायचे नाही हे अगदी पक्के ठरलेलेच! एखादा पाहुणा मुक्कामी आला तर दुसºयादिवशी निसर्ग भोजन हमखास होणार. शहरापासून अवघ्या २६ किलोमीटरवर असलेल्या कास तलावाला सर्वाधिक पसंती दिली जाते. स्वयंपाक करायला आवश्यक असणारे पाणी तलावातून आणता येते. त्यामुळे शहरातून जास्तीचे पाणी आणण्याची गरज पडत नाही. सरपण मुबलक आणल्यामुळे घरातून येताना स्वयंपाक तयार करण्याचे जिन्नस आणले की येथे झक्कास स्वयंपाकाचा बेत रंगतो.झुडपं म्हणजे मिनी किचनच..!कास तलावाच्या लगत असलेल्या झुडपांच्या सावलीत दगडांची चुल करून तेथे स्वयंपाक केला जातो. सुट्यांमध्ये येथे येणाºयांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमााणावर वाढत आहे. कित्येकदा घरातून सगळं आठवणीने घेतले तरीही एखादी वस्तू घेण्याची विसरली जाते. कधी कोणाकडे मीठ नसते, तर कधी हळद विसरलेली असते, मसाल्याच्या पुड्या सापडत नाहीत तर कोणाला चूल पेटवायला काडीपेटी विसरल्याचे लक्षात येते. अशा सर्व विसराळूंसाठी ही झुडपे म्हणजे मिनी किचन आहेत. येथे पूर्वी स्वंयपाक करून गेलेले अनेकजण झुडपांमध्ये पुड्या बांधून हळद, मीठ, काडीपेटी, मसाल्याच्या पुड्या ठेवतात. ज्याला गरज आहे, तो त्याचा वापर करतो. आणि स्वत:ची सोय झाल्यामुळे तो पुढे येणाºयासाठी या वस्तू प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून ती पिशवी झुडपात सुरक्षित ठिकाणी ठेवली जाते.स्वयंपाक करण्यासाठी कासला पहिली पसंती!कुटूंबाबरोबर पुर्ण एक दिवस मुक्त वातावरणात आणि चुलीवरचं जेवण हवं असेल तर कास तलाव परिसराला सर्वाधिक पंसती दिली जाते. स्वयंपाक करायला मुबलक पाणी आणि सरपणाची मुक्त उपलब्धता या दोन कारणांमुळे येथे स्वयंपाकाच्या चुली पेटतात. वातावरणात कितीही उकाडा असला तरी कास परिसरातील वारे थंड असते म्हणून उन्हाळ्याच्या दिवसांत येथे येणाºयांच्या संख्या मोठी आहे.ही असते तयारी...!पूर्ण दिवस व्यतित करायला येणारे सर्व काही तलाव परिसरात बनवतात. पण ज्यांना चुलीवरचा रस्सा खायचा आहे आणि ज्यांच्याकडे वेळ कमी आहे, ते घरातूनच भाकरी, भात, रश्याचा मसाला आदी तयार करून आणतात. तलाव परिसरात आले की रस्सा फोडणीला टाकतात. मुबलक वेळ असणारे मात्र, कांदा, टोमॅटो, पीठ, तांदुळ, दोन तीन पातेले, कढई, पळी, उलतणे आदी सर्व वस्तु सोबत आणतात. जाताना भांडी धुवून वाळवून नेण्याची त्यांची मानसिकता असते.