शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

पर्यटकांची रेलचेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:26 IST

महाबळेश्वर : संचारंबदीमुळे जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे बंद असली तरी बहुतांश पर्यटक नियम डावलून महाबळेश्वर व पाचगणी या पर्यटनस्थळांना भेट ...

महाबळेश्वर : संचारंबदीमुळे जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे बंद असली तरी बहुतांश पर्यटक नियम डावलून महाबळेश्वर व पाचगणी या पर्यटनस्थळांना भेट देत आहेत. मात्र, स्थानिक प्रशासनाकडून अशा पर्यटकांना शहरात प्रवेश दिला जात नसल्याने त्यांना पुन्हा परतीचा प्रवास करावा लागत आहे. जिल्हा प्रशासनाने पर्यटनस्थळे सुरू करण्याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी स्थानिकांंमधून होत आहे.

कचरा रस्त्यावरच

सातारा : सातारा शहरात पालिकेकडून घंटागाड्या व ट्रॅक्टरद्वारे कचरा संकलनाचे काम केले जाते. घंटागाड्यांमार्फत हे काम योग्य पद्धतीने सुरू असले तरी अनेक ट्रॅक्टरचालक ट्रॅक्टरमध्ये क्षमतेपेक्षा जास्त कचरा भरून डेपोकडे मार्गस्थ होत आहेत. हा कचरा रस्त्यावर पडत असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

पारा २१ अंशांवर

महाबळेश्वर : सातारा शहरासह जिल्ह्यात मान्सून पूर्णपणे सक्रिय झाला नसला तरी महाबळेश्वर व पाचगणीत गेल्या काही दिवसांपासून रिपरिप सुरू आहे. पवसामुळे तापमान खालावले असून, मंगळवारी शहराचे कमाल तापमान २१.१ तर किमान तापमान १८.१ अंश सेल्सिअस नोंदवले आहे. थंडीमुळे महाबळेश्वर तालुक्यात शेकोट्या पेटू लागल्या आहेत.

कसरत थांबली

सातारा : जुना मोटर स्टॅँड ते बुधवार नाका या मार्गाच्या डांबरीकरणााचे काम नुकतेच पूर्णत्वास आले आहे. अनेक वर्षांपासून खड्डेमय रस्त्यामुळे सुरू असलेली परवड थांबल्याने वाहनधारकांसह व्यापारी व दुकानदारांमधून समाधान व्यक्त होत आहे. या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली होती. या मार्गावरून वाहन चालविणेदेखील जिकरीचे बनले होते. पालिकेने डांबरीकरणाचे काम मार्गी लावल्याने बुधवार नाका मार्गावरील वाहतूक सुकर झाली आहे.

डागडुजीची मागणी

मेढा : केळघर-महाबळेश्वर मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून, त्याचा वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सातारा ते महाबळेश्वर या मार्गाच्या डांबरीकरणाचे काम सुरू आहे. यासाठी रस्त्यात मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले आहे. डांबरीकरणाच्या कामामुळे या मार्गावर अवजड वाहतूक सातत्याने सुरू आहे. त्यामुळे ठिकठिकाणचे रस्ते उखडले असून, रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत.

खडीमुळे अपघात

सातारा : अर्कशाळा ते शाहूपुरी चौक या मार्गाची खड्ड्यांमुळे अक्षरश: चाळण झाली आहे. ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे या मार्गावरून ये-जा करताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. सातारा नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाने शहरातील खड्डे मुरूम टाकून बुजवले. काही प्रमुख रस्त्यांचे डांबरीकरणही केले. मात्र, अंतर्गत रस्त्यांची डागडुजी न केल्याने वाहनधारकांची परवड सुरूच आहे.

वाहतुकीची कोंडी

सातारा : राजवाडा बसस्थानकासमोर असलेल्या तांदूळ आळीत वाहतुकीची सतत कोंडी होत आहे. अनेक खासगी वाहने, रिक्षा, मालवाहतूक करणारी वाहने याच मार्गावरुन ये-जा करतात. तर अनेक वाहनधारक रस्त्याकडेला तसेच दुकानांसमोर नो पार्किंगमध्ये वाहने लावत आहेत. अरुंद रस्ता असल्याने या मार्गावरून वाट काढताना वाहनधारकांसह पादचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पोलिसांकडून येथील वाहतुकीबाबत उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

पावसाची संततधार

सातारा : पश्चिमेकडील महाबळेश्वर, जावळी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. महाबळेश्वरसह परिसरात अधूनमधून हलक्या सरी बरसत आहेत. जावळी तालुक्यातही बुधवारी ठिकठिकाणी परतीच्या पावसाने हजेरी लावली. दुष्काळी भागात अद्याप मान्सून सक्रिय झाला नसून, शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत.

ओढ्यांची स्वच्छता

सातारा : सातारा पालिकेकडून ओढे व नाल्यांच्या स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आले आहे. पावसामुळे शहरातील सर्व ओढे कचऱ्याने तुडुंब भरले होते. प्रवाह बंद झाल्याने या ओढ्यांमधील व नाल्यांतील पाणी रस्त्यावरून वाहत होते. त्यामुळे नागरिकांसह पादचाऱ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत होता. पालिकेच्या आरोग्य विभागाने ओढे व नाले स्वच्छतेचे काम पुन्हा हाती घेतल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.