शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
3
पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मृतीस्थळ विकासासाठी ६८१ कोटींचा आराखडा; CM फडणवीसांची चौंडीत घोषणा
4
"मला वास्तवासोबत..."; बिग बॉस फेम अभिनेत्रीने सोडली इंडस्ट्री, निवडला अध्यात्माचा मार्ग
5
CID Recruitment: परीक्षा न देता सरकारी नोकरी, सीआयडीमध्ये 'या' पदासाठी भरती, 'इतका' पगार मिळणार!
6
पुन्हा सुरु होणार जीवघेणा खेळ! 'Squid Game 3' चा टीझर आऊट; रिलीज डेटही समोर
7
भारताने दहशतवादाविरोधात लढा द्यावा, आम्ही सोबत आहोत; अमेरिकेचा भारताला पाठिंबा...
8
दरमहा ५००० रुपयांची SIP केली तर किती वर्षात १ कोटी रुपये जमा होतील? गणित समजून घ्या
9
Noida Dog Attack: वॉक करणाऱ्या महिलेवर पाळीव कुत्र्याचा हल्ला; जीव वाचवायला गेली आणि अन्...
10
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
11
७ मे रोजी देशभरात वॉर मॉक ड्रिल; सामान्य नागरिक म्हणून आपण करायच्या 'या' १० गोष्टी 
12
जातीय जनगणनेबाबत मल्लिकार्जुन खरगे यांचे पीएम मोदींना पत्र; केल्या तीन महत्वाच्या सूचना...
13
नवऱ्यासोबत पहिल्यांदाच काम करणार मराठी अभिनेत्री; आनंद व्यक्त करत म्हणाली, "तो दिग्दर्शक..."
14
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
15
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी
16
सिंधु करार मोडून भारताने उचललं मोठं पाऊल! पाकिस्तानात नेमकी किती पाणी टंचाई भासणार?
17
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
18
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
19
टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
20
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार...

आनेवाडीतील टोल व्यवस्थापन बदलणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:41 IST

सातारा : हाणामारी, वादावादी आणि पावत्यांचा झोल यामुळे चर्चेत असलेल्या आनेवाडी टोलनाक्याचे व्यवस्थापन दिनांक ३ एप्रिलपासून बदलणार आहे. हा ...

सातारा : हाणामारी, वादावादी आणि पावत्यांचा झोल यामुळे चर्चेत असलेल्या आनेवाडी टोलनाक्याचे व्यवस्थापन दिनांक ३ एप्रिलपासून बदलणार आहे. हा टोल नाका रद्द करण्याची मागणी राष्ट्रवादीचे नेते आमदार शशिकांत शिंदे यांनी लावून धरली होती; परंतु आता याच टोलनाक्याचे व्यवस्थापन राष्ट्रवादीचे पुण्यातील नगरसेवक काकडे यांच्याकडे देण्यात येणार आहे.

सातारकरांच्या टीकेचा आणि राजकीय संघर्षाचे निमित्त ठरलेल्या आनेवाडी टोलनाक्याचे व्यवस्थापन खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थक अशोक सावंत यांच्याकडून काढून घेण्यात आले आहे. दिनांक ३ एप्रिलपासून या टोल नाक्याची जबाबदारी पुण्यातील राष्ट्रवादीचे नगरसेवक सचिन दोडके यांना देण्यात आली आहे.

या हस्तांतरणाद्वारे महाविकास आघाडीने उदयनराजे भोसले यांना राजकीय धक्का दिल्याची चर्चा सुरू झाली आहे. यावेळी खबरदारीचा उपाय म्हणून गुरूवारी आनेवाडी टोल नाक्यावर प्रचंड बंदोबस्त ठेवण्यात आला होता. उदयनराजे समर्थक अशोक सावंत यांच्या अशोका स्थापत्य कंपनीकडे खेड शिवापूर व आनेवाडी टोल नाक्याचे व्यवस्थापन देण्यात आले होते. येत्या तीन दिवसात व्यवस्थापन हस्तांतरण होणार असल्याने पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांच्या आदेशाप्रमाणे मोठ्या प्रमाणावर कुमक वाढविण्यात आल्याने आनेवाडी टोल नाक्याला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. आनेवाडी टोल नाक्याच्या टोल वसुलीवरून सातत्याने होणारी भांडणे, फास्टॅगच्या तांत्रिक अडचणी, रिलायन्स इन्फ्राच्या सदोष सुविधा यामुळे आनेवाडी टोलनाका सातत्याने चर्चेत असतो. दोन वर्षांपूर्वी आनेवाडी टोल नाक्याचा ताबा घेण्यावरून दोन्ही राजे समर्थकांमध्ये जोरदार संघर्ष झाला होता. मात्र, अशोका स्थापत्यने या टोलनाक्यांवर नियंत्रण ठेवले होते. आनेवाडी टोलनाका हस्तांतरणाची बरेच दिवसांपासून चर्चा सुरू होती.

दरम्यान, महाविकास आघाडीने आनेवाडी येथील टोल व्यवस्थापन आपल्या ताब्यात घेतले असल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलेल्या मागणीनुसार कऱ्हाड आणि सातारा आरटीओ पासिंगच्या गाड्यांबाबतचा निर्णयदेखील तत्काळ घ्यावा, अशी स्थानिक जनतेची मागणी आहे.

चौकट-

टोल वाढ झाल्याने वाहनधारकांना फटका

पुणे - बेंगलोर महामार्ग सहापदरीकरणाचे काम रिलायन्स इन्फ्राने घेऊनही तब्बल आठ वर्ष हे काम संपलेले नाही. तब्बल तीनवेळा या कामाला मुदतवाढ देण्यात आली आहे. आनेवाडी टोलनाक्यावरून जाणाऱ्या सर्व वाहनांना पाच टक्के टोलवाढ लागू झाली आहे. कार, जीप, व्हॅनला एकेरीसाठी १०० तर दुहेरीसाठी १५०, ट्रक आणि बससाठी एकेरी प्रवासासाठी ३४० रुपये तर दुहेरीसाठी ५०५ रुपये टोल लागू झाला आहे.