शहरं
Join us  
Trending Stories
1
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
2
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
3
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
4
भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या
5
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
6
FD-RD विसरून जाल, LIC ची ही 'कन्यादान' स्कीम आहे जबरदस्त; मुलीच्या लग्नाच्या वेळी मिळतील २७ लाख
7
"मराठी बोलत नाही, दम असेल तर...", भोजपुरी अभिनेत्याचं थेट राज ठाकरेंना चॅलेंज
8
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
9
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
10
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
11
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
12
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
13
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
14
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
15
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
16
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
17
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
18
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
19
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
20
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...

आनेवाडीतील टोल व्यवस्थापन बदलणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:41 IST

सातारा : हाणामारी, वादावादी आणि पावत्यांचा झोल यामुळे चर्चेत असलेल्या आनेवाडी टोलनाक्याचे व्यवस्थापन दिनांक ३ एप्रिलपासून बदलणार आहे. हा ...

सातारा : हाणामारी, वादावादी आणि पावत्यांचा झोल यामुळे चर्चेत असलेल्या आनेवाडी टोलनाक्याचे व्यवस्थापन दिनांक ३ एप्रिलपासून बदलणार आहे. हा टोल नाका रद्द करण्याची मागणी राष्ट्रवादीचे नेते आमदार शशिकांत शिंदे यांनी लावून धरली होती; परंतु आता याच टोलनाक्याचे व्यवस्थापन राष्ट्रवादीचे पुण्यातील नगरसेवक काकडे यांच्याकडे देण्यात येणार आहे.

सातारकरांच्या टीकेचा आणि राजकीय संघर्षाचे निमित्त ठरलेल्या आनेवाडी टोलनाक्याचे व्यवस्थापन खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थक अशोक सावंत यांच्याकडून काढून घेण्यात आले आहे. दिनांक ३ एप्रिलपासून या टोल नाक्याची जबाबदारी पुण्यातील राष्ट्रवादीचे नगरसेवक सचिन दोडके यांना देण्यात आली आहे.

या हस्तांतरणाद्वारे महाविकास आघाडीने उदयनराजे भोसले यांना राजकीय धक्का दिल्याची चर्चा सुरू झाली आहे. यावेळी खबरदारीचा उपाय म्हणून गुरूवारी आनेवाडी टोल नाक्यावर प्रचंड बंदोबस्त ठेवण्यात आला होता. उदयनराजे समर्थक अशोक सावंत यांच्या अशोका स्थापत्य कंपनीकडे खेड शिवापूर व आनेवाडी टोल नाक्याचे व्यवस्थापन देण्यात आले होते. येत्या तीन दिवसात व्यवस्थापन हस्तांतरण होणार असल्याने पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांच्या आदेशाप्रमाणे मोठ्या प्रमाणावर कुमक वाढविण्यात आल्याने आनेवाडी टोल नाक्याला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. आनेवाडी टोल नाक्याच्या टोल वसुलीवरून सातत्याने होणारी भांडणे, फास्टॅगच्या तांत्रिक अडचणी, रिलायन्स इन्फ्राच्या सदोष सुविधा यामुळे आनेवाडी टोलनाका सातत्याने चर्चेत असतो. दोन वर्षांपूर्वी आनेवाडी टोल नाक्याचा ताबा घेण्यावरून दोन्ही राजे समर्थकांमध्ये जोरदार संघर्ष झाला होता. मात्र, अशोका स्थापत्यने या टोलनाक्यांवर नियंत्रण ठेवले होते. आनेवाडी टोलनाका हस्तांतरणाची बरेच दिवसांपासून चर्चा सुरू होती.

दरम्यान, महाविकास आघाडीने आनेवाडी येथील टोल व्यवस्थापन आपल्या ताब्यात घेतले असल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलेल्या मागणीनुसार कऱ्हाड आणि सातारा आरटीओ पासिंगच्या गाड्यांबाबतचा निर्णयदेखील तत्काळ घ्यावा, अशी स्थानिक जनतेची मागणी आहे.

चौकट-

टोल वाढ झाल्याने वाहनधारकांना फटका

पुणे - बेंगलोर महामार्ग सहापदरीकरणाचे काम रिलायन्स इन्फ्राने घेऊनही तब्बल आठ वर्ष हे काम संपलेले नाही. तब्बल तीनवेळा या कामाला मुदतवाढ देण्यात आली आहे. आनेवाडी टोलनाक्यावरून जाणाऱ्या सर्व वाहनांना पाच टक्के टोलवाढ लागू झाली आहे. कार, जीप, व्हॅनला एकेरीसाठी १०० तर दुहेरीसाठी १५०, ट्रक आणि बससाठी एकेरी प्रवासासाठी ३४० रुपये तर दुहेरीसाठी ५०५ रुपये टोल लागू झाला आहे.