शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

टोल दरवाढ त्वरित मागे घेऊन पूर्वीच्या टोलमध्येच कपात करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:35 IST

सातारा : सातारा-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील आनेवाडी आणि खेडशिवापूर टोलनाक्यावरील टोलच्या दरात सुमारे ५ टक्के केलेली टोल दरवाढ ही अन्यायकारक ...

सातारा : सातारा-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील आनेवाडी आणि खेडशिवापूर टोलनाक्यावरील टोलच्या दरात सुमारे ५ टक्के केलेली टोल दरवाढ ही अन्यायकारक आणि प्रवासी आणि संबंधीतांच्या संयमाचा अंत पाहणारी आहे. वास्तविक या रस्त्याचे काम सन २०१३ मध्ये पूर्ण होणार होते. मूळची मुदत संपूनही सुमारे ८ वर्षे झाली, तरी काम पूर्ण झालेले नाही. म्हणूनच ५ टक्के वाढ करण्याऐवजी जुन्या टोलदरातच ५ टक्क्यापेक्षा जास्त टोल करकपात करावी, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे.

उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात नमूद केले आहे की, सातारा ते पुणे या राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करताना अनेक गैरसोयींचा सामना प्रवाशांना करावा लागत आहे. असलेले सेवा रस्ते अत्यंत खराब आहेत. काही ठिकाणी सेवा रस्ते आहेत की नाहीत, हे देखिल समजत नाही. रस्त्यांवरील खड्डयांची तर मोजदादही करता येत नाही. इतके असंख्य खड्डे आहेत. हा राष्ट्रीय महामार्ग खरंच आहे का? असा प्रश्न वाहनचालकांना आणि प्रवाशांना पडत असतो. दिशादर्शक - स्थलदर्शक फलकांची वानवा आहे. काही वेळा अपरिचित वाहनचालकांला एखादे गाव कधी आपण मागे टाकले हे देखिल कळत नाही. ट्रक ले-बाय, शौचालय सुविधा इत्यादी बाबी तर सुरुवातीपासूनच गायब आहेत. शेजारील कर्नाटक राज्यातील याच राष्ट्रीय महामार्गावर आनेवाडी आणि खेडशिवापूर टोलनाक्यांपेक्षा कमी टोल दर देऊन प्रवास करणारे वाहनचालक आणि प्रवासी हे सातारा-पुणे प्रवासादरम्यान प्रत्येक असुविधेबाबत आणि खड्‌डयांबाबत अक्षरश: लाखोली वाहत असतात.

यासारख्या अनेक सुविधांची असलेली वानवा लक्षात घेता, सध्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंडियाने) आणि टोल चालविणाऱ्या रिलायन्स व्यवस्थापनाने टोल दरवाढ करून, प्रवासी आणि वाहनचालक/धारकांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. त्यांनी केलेली दरवाढ त्वरित मागे घ्यावी, तसेच नुसती दरवाढ मागे न घेता, जुन्या दरात ५ टक्क्यापेक्षा जास्त रकमेची टोल करकपात करावी, अशी मागणी उदयनराजे भोसले यांनी केली आहे.