शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
3
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
4
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
5
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
6
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
7
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
8
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
9
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
10
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
11
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
12
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
13
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
14
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
15
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
16
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
17
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
18
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
19
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
20
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती

कोयनेतील पाणीसाठा १०० टीएमसीच्या उंबरठ्यावर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:47 IST

सातारा : जिल्ह्यात चार दिवसांपासून चांगला पाऊस होत असून, पश्चिम भागात जोर वाढला आहे. यामुळे प्रमुख धरणांत पाणीसाठा वेगाने ...

सातारा : जिल्ह्यात चार दिवसांपासून चांगला पाऊस होत असून, पश्चिम भागात जोर वाढला आहे. यामुळे प्रमुख धरणांत पाणीसाठा वेगाने वाढत चालला आहे. तर कोयना धरणातील साठा ९८ टीएमसी झाला आहे. पूर्व भागातही चांगला पाऊस होत आहे. दरम्यान, गुरुवार सकाळपर्यंत कोयनेला ७१, तर महाबळेश्वरला ८१ मिलिमीटर पाऊस पडला आहे.

ऑगस्ट महिन्यात ओढ दिलेल्या पावसाने सप्टेंबर उजाडताच चांगली सुरुवात केली आहे. त्यातच जिल्ह्यात आठवड्यापासून पाऊस होत आहे. मात्र, चार दिवसांत चांगलाच जोर वाढला आहे. यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पश्चिम भागातील कोयना, नवजा, कास, तापोळा, महाबळेश्वर भागात दमदार पाऊस होत आहे. यामुळे प्रमुख समजल्या जाणाऱ्या कोयना, धोम, कण्हेर, उरमोडी, बलकवडी, तारळी धरणांत चांगला पाणीसाठा वाढू लागला आहे. यामुळे धरणे लवकरच भरू शकतात.

जिल्ह्यात गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ७१ मिलिमीटर पाऊस झाला, तर जूनपासून ३८३९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. नवजा येथे ४५ आणि यावर्षी आतापर्यंत ५११८ मिलिमीटर पाऊस पडला; तर महाबळेश्वरला सकाळपर्यंत ८१ व जूनपासून ५१०१ मिलिमीटर पाऊस पडला आहे. तर कोयना धरणात सकाळच्या सुमारास ९७.९२ टीएमसी पाणीसाठा झाला. १०५.२५ टीएमसी क्षमता असणारे कोयना धरण भरण्यासाठी जवळपास ७ टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. तर सकाळच्या सुमारास कोयना धरणात २९६३१ क्युसेक वेगाने पाणी येत होते.

दरम्यान, जिल्ह्याच्या पूर्व भागातही दमदार पाऊस होत आहे. माण, खटाव, फलटण तालुक्यात अनेक ठिकाणी चांगला पाऊस होऊ लागलाय. यामुळे खरीप हंगामातील पिकांना फायदा झाला. माण तालुक्यातील अनेक गावांच्या ओढ्यांना पाणी येऊ लागले आहे. तसेच बंधाऱ्यात पाणीसाठा होत आहे. तरीही अजून मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम राहणार आहे.

चौकट :

धोममध्ये ८८, तर उरमोडीत ८३ टक्के पाणीसाठा...

जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस होत असल्याने प्रमुख धरणांतील पाणीसाठा वाढत चालला आहे. गुरुवारी सकाळच्यासुमारास धोम धरणात ८७.८९ टक्के पाणीसाठा झाला होता. कण्हेरमध्ये ९०, कोयनेत ९३, उरमोडी धरणात ८२.८९, बलकवडीत ९८ आणि तारळी धरणात ९१.८२ टक्के पाणीसाठा झाला होता, तर खटाव तालुक्यातील येरळवाडी धरणात अवघा ४.५४ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. खटाव तालुक्यात चांगला पाऊस झाल्यास धरण भरू शकते.

............................................................