शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
2
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
3
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
4
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
5
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
6
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
7
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
8
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
9
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
10
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
11
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
12
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
13
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
14
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
15
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
16
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
17
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
19
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
20
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण

‘स्वाभिमानी’चे तीन उपोषणकर्ते रुग्णालयात

By admin | Updated: August 17, 2014 22:31 IST

प्रकृती खालावली : कऱ्हाडच्या आंदोलनाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कऱ्हाड : येथील तहसील कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरू केलेले उपोषण रविवारी पाचव्या दिवशीही सुरूच होते. रविवारी तीन उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारार्थ उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, या उपोषणाकडे प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप संघटनेचे जिल्हाध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी केला आहे. उसाला प्रतिटन ५०० रुपयांप्रमाणे दुसरा हप्ता तातडीने द्यावा आणि ऊसदर आंदोलनात शेतकऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे तत्काळ मागे घ्यावेत, या प्रमुख मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दि. १३ पासून येथील तहसील कार्यालासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. संघटनेचे जिल्हाध्यक्ष पंजाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली देवानंद पाटील, बापूसाहेब साळुंखे, प्रदीप मोहिते, सचिन नलवडे, भाऊसाहेब माने हे उपोषणास बसले आहेत. गत पाच दिवसांपासून उपोषण सुरू असताना रविवारी देवानंद पाटील, बापूसाहेब साळुंखे व भाऊसाहेब माने या तीन उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांना उपचारार्थ रुग्णालयामध्ये हलविण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून देण्यात आला. त्यानुसार रविवारी तिन्ही उपोषणकर्त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. शनिवारी खासदार राजू शेट्टी यांनी उपोषणस्थळी भेट दिली. त्यावेळी त्यांनीही उपोषणकर्त्यांशी चर्चा करून मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार घेणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला. या उपोषणाकडे प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असल्याचा आरोप संघटनेचे जिल्हाध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी केला आहे. ‘प्रशासनाचा एकही अधिकारी उपोषणस्थळाकडे आलेला नाही. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी साखर आयुक्त कार्यालयाचे सचिव व कऱ्हाडचे उपनिबंधक यांनी उपोषणस्थळी भेट दिली. त्यावेळी त्यांनी ठोस आश्वासन न देता फक्त उपोषण मागे घेण्यासंदर्भात विनंती केली. ती चर्चा फिस्कटल्यानंतर एकही अधिकारी उपोषणस्थळाकडे फिरकलेला नाही. त्यातून शासनाचा नाकर्तेपणा दिसून येतो. इतर उपोषणांच्यावेळी पाठिंबा देण्यासाठी येणाऱ्यांनीही शेतकऱ्यांच्या या उपोषणाकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे त्यांनाही शेतकऱ्यांचा किती कळवळा आहे, ते दिसते,’ असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)मंगळवारी रस्त्यावर उतरणारस्वाभिमानी शेतकरी संघटना आपल्या मागण्यांवर ठाम आहे. सोमवारपर्यंत या मागण्यांबाबत निर्णय न झाल्यास मंगळवारी आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल. राज्यकर्त्यांना लोकशाहीची भाषा समजत नाही. त्यामुळे त्यांना समजेल अशा भाषेतच आम्हाला न्यायासाठी लढा द्यावा लागेल, असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.