शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
3
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
4
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
5
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
6
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
7
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
8
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
9
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
10
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
11
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
12
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
13
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
14
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
15
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
16
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
17
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
18
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
19
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
20
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

खंडाळ्याजवळ अपघातात तीन ठार, दोन गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 23:17 IST

खंडाळा : पुणे-बंगलोर आशियाई महामार्गावरील खंडाळ्याजवळ उभ्या ट्रकला भरधाव जीपने पाठीमागून जोरदार धडक दिली. यावेळी झालेल्या भीषण अपघातात जीपमधील ...

खंडाळा : पुणे-बंगलोर आशियाई महामार्गावरील खंडाळ्याजवळ उभ्या ट्रकला भरधाव जीपने पाठीमागून जोरदार धडक दिली. यावेळी झालेल्या भीषण अपघातात जीपमधील तिघे जागीच ठार झाले तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांपैकी दोघेजण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रहिवासी होते.याबाबत खंडाळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावंतवाडी (सिंधुदुर्ग) येथून एक लग्न सोहळा करून काहीजण मुंबईला जीपमधून निघाले होते. रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास खंबाटकी बोगदा ओलांडून जीप खंडाळ्याजवळच्या जुन्या टोलनाक्याजवळ आली. यावेळी भरधाव जाणाऱ्या जीपने (एमएच ४७ एबी १७८४) महामार्गाच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकला (केएल १६ यू ४४२०) पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात जीपच्या पुढील भागाचा चक्काचूर होऊन प्रवासी आतमध्येच दबले गेले.या अपघातात विलास शंकर सामंत (वय ६२, रा. पाट, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग. सध्या रा. मुंबई), बाळकृष्ण शंकर सामंत (६४, रा. दहिसर मुंबई) आणि विनायक गंगाधर कामत (७४, रा. तळवडे, ता. सावंतवाडी. सध्या रा. मुंबई) हे तिघेजण जागीच ठार झाले. तर विनायक कामत यांची पत्नी स्मिता कामत ( ७२) आणि चालक रवी गवाणकर (रा. जुहू, मुंबई) हे दोघे गंभीर जखमी आहेत.या अपघाताची माहिती मिळताच खंडाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर जखमींना खंडाळा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यामधील जखमी असणाºया स्मिता कामत यांची प्रकृती अत्यवस्थ आहे. पोलीस उपनिरीक्षक महेश कदम हे या अपघाताचा तपास करीत आहेत.