शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
4
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
7
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
9
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
10
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
11
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
12
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
13
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
14
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
15
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
16
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
17
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
18
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
19
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
20
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली

तीन किलो गहूत महिनाभर पोट भरते का?शिधा पत्रिकाधारकांचा सवाल : अन्न सुरक्षा की उपासमारीची योजना

By admin | Updated: February 9, 2015 00:47 IST

शिधा पत्रिकाधारकांचा सवाल : अन्न सुरक्षा की उपासमारीची योजना

परळी : मोठा गाजावाजा करून आणलेली राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना राबविताना माणसी दरमहा तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ याप्रमाणे वाटप असल्याची ती राष्ट्रीय अन्न सुरक्षा आहे की, उपासमार योजना आहे? असा प्रश्न गरजूंना पडला आहे. एक व्यक्ती तीन किलो गव्हात महिनाभर जगणार कसा? असा सवाल उपस्थित करून किमान गहू कोठा वाढवून द्या, अशी मागणी होत आहे.याबाबत सर्वसामान्य नागरिक व शिधा पत्रिकाधारकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या योजनेत प्रत्येक गावातील ७४ टक्के शिधापत्रिकाधारकांचा समावेश करून तसा याद्या तयार करण्यात आल्या व पूर्वीच्या दारिद्र्यरेषेखालील शिधा पत्रिकाधारकांनाही अन्य शिधापत्रिकांप्रमाणेच खाद्य देण्याची पद्धत सुरू केली आहे. त्यानुसार ज्या दारिद्र्यरेषेखालील शिधापत्रिकाधारक कुटुंबात कार्डापाठीमागे पंधरा किंवा वीस किलो गहू तर आठ किंवा दहा किलो तांदूळ मिळत होता. त्यांना तो माणसी मिळू लागला.दारिद्र्यरेषेखाली एका शिधापत्रिकेत दोन किंवा तीनच व्यक्ती होत्या. त्यांना १५-२० किलो धान्य पुरेसे होते. आता मानसी तीन किलो म्हणजे त्या कुटुंबाला सहा ते नऊ किलो धान्य मिळते. म्हणजे त्या कुटुंबाला तेवढ्या धान्यात महिनाभर जगणे शक्य नाही. म्हणजेच कमी पडणारे धान्य बाजारभावाप्रमाणे घ्यावे लागणार आहे. काही शिधापत्रिकेत एकच व्यक्ती आहे. त्याचा तीन किलोत महिना कसा निघणार?१५-२० वर्षांपूर्वी शासनाने सर्वांना शिधापत्रिका दिल्या व नंतर वाटप बंद करून टाकले त्यापैकी चार-सहा वर्षांची मुले-मुलीआता किमान २५-२६ वर्षांची झाली. विवाह होऊन तो स्वतंत्र कुटुंबधारक झाला; पण नवीन शिधापत्रिका मिळाली नाही म्हणून एकाच कार्डात १५-२० व्यक्तींचा समावेश आहे. अशा शिधापत्रिकाधारकांनी नावे अन्न सुरक्षा यादीतच नाहीत. एका कुटुंबाची स्वतंत्र दोन किंवा तीन कुटुंबे झाली; पण स्वतंत्र कार्ड नाही. म्हणून त्याला अन्न सुरक्षेचा लाभ मिळणार नसेल, तर तो माझ्यावर अन्याय आहे,अ‍ेसे त्या कुटुंबाला वाटते ते खरे आहे. म्हणजेच त्यांच्यावरील अन्याय दूर करावा व त्यासाठी विभक्त कुटुंबाला स्तंत्र शिधा पत्रिका मिळालीच पाहिजे अशी कुटुंबीयांची मागणी आहे. (वार्ताहर)अशीही आहेत गावेसरकार म्हणते, किमान ७५ टक्के जनतेला या योजनेचा लाभ मिळेल. यात ७४ ते ७५ शिधापत्रिकाधारकांचा समावेश करण्यात आला आहे. परंतु सर्वच गावात हा उपाय योग्य नाही. अनेकठिकाणी मागास, कोरडवाहू, डोंगर पठारावरील गावे ९० टक्क्यांपेक्षाही जास्त कुटुंबे या योजनेला पात्र ठरणारी आहेत, मग त्याचे काय?