शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
4
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
5
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
6
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
7
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
8
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
9
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
10
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
11
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
12
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
13
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
14
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
15
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
16
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
17
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
18
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
19
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
20
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
Daily Top 2Weekly Top 5

ऊसदरासाठी तीन दिवसांचा ‘अल्टिमेटम’

By admin | Updated: November 12, 2014 22:55 IST

कऱ्हाडच्या परिषदेत इशारा : शनिवारपर्यंत तोडगा न निघाल्यास आंदोलन

कऱ्हाड : ‘उत्पादन खर्च पाहता तीन हजार पाचशे रुपयांच्या आत उसाचा भाव परवडत नाही. हा दर पदरात पाडून घेण्यासाठी दि. १५ तारखेपर्यंत कारखान्यांना ऊस घालू नका. तोपर्यंत सरकारने ऊसदराचा तोडगा काढला नाही, तर आंदोलनासाठी तयार राहा,’ अशी हाक शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी दिली. शेतकरी हुतात्मादिनी बुधवारी येथील भेदा चौकात आयोजित ऊस परिषदेत ते बोलत होते. यावेळी संघटनेचे मराठावाडा प्रमुख कालिदास आपटे, क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेडचे शिवाजीराव नांदखिले, बिग्रेडिअर सुधीर सावंत, महिला आघाडी प्रमुख वंदनाताई पवार, युवा आघाडीचे शंकर गायकवाड, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बाळासाहेब पठारे, पुणे जिल्हाध्यक्ष पांडुरंग रायते, सांगली जिल्हाध्यक्ष हणमंत पाटील, सोलापूर जिल्हाध्यक्ष राजेंद्र भोसले, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष पी. जी. पाटील, सातारा जिल्हाध्यक्ष विकास मुळीक, नगरचे जिल्हाध्यक्ष अशोकराव पठारे, परमेश्वर पिसुरे, ऊसतोडणी मुकादम विश्वनाथ पवार, ‘मनसे’चे सोलापूर जिल्हाध्यक्ष दिलीप धोत्रे, सातारा जिल्हाध्यक्ष रवींद्र शेलार, विकास पवार, दादा शिंंगण, शहराध्यक्ष सागर बर्गे यांची उपस्थिती होती.रघुनाथदादा पाटील म्हणाले, ‘शेतकऱ्यांनी आपला ऊस दि. १५ तारखेपर्यंत तोडू देऊ नये. तोपर्यंत सरकारने ऊसदराबाबत निर्णय घेतला नाही, तर आंदोलनाची दिशा ठरविली जाईल. आझाद मैदानावर जमायचे, साखर आयुक्त कार्यालयाला टाळे ठोकायचे की, विधानसभेला घेराव घालायचा याबाबतचा निर्णय १५ तारखेनंतर घेतला जाईल. शेतकऱ्यांनी या लढाईसाठी तयार राहावे. मनसे आणि शेतकरी व स्वातंत्र्यसैनिकांची ताकद काय असते, हे आम्ही सरकाराला दाखवून देऊ. मोदी सरकारने लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात शेतीमालाचा उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा धरून शेतीमालाची आधारभूत किंंमत दिली जाईल, असे आश्वासन दिले होते; परंतु यावर्षीच्या खरीप व रब्बी हंगामाच्या मोदी सरकारने जाहीर केलेल्या आधारभूत किंमती पाहता शेतकऱ्यांचा विश्वासघात झाल्याचे दिसते.’ ब्रिगेडिअर सुधीर सावंत, रवींद्र शेलार, सयाजीराव देशमुख, कालिदास आपटे, दिलीप धोत्रे, प्रशांत गिड्डे, अ‍ॅड. विकास पवार, शंकरराव गायकवाड आदींची भाषणे झाली. (प्रतिनिधी)अन्यथा राडा करायला तयार!सरकारने ऊसदराबाबत समिती स्थापन केली आहे. समितीच्या बैठकीत उत्पादन खर्चावर आधारित दर देणार असला तरच संघटना उपस्थित राहील; अन्यथा राडा करायला आम्ही तयार आहोत, असा इशारा शिवाजीराव नांदखिले यांनी यावेळी बोलताना दिला. तडजोड करणाऱ्यांनाही बडवा !राजू शेट्टी यांनी तडजोडीचे राजकारण करून शेतकऱ्यांचे सर्वात मोठे नुकसान केले आहे. या आंदोलनात प्रसंगी त्यांनाही बडवून काढायची भूमिका शेतकऱ्यांनी ठेवावी. मोदी सरकार हे अतिरेकी सरकार आहे. परदेशी कांदा आयात करून या सरकारने शेतकऱ्यांना भिकेला लावण्याचे उद्योग सुरू केले आहेत, असे मत शिवाजीराव नांदखिले यांनी यावेळी व्यक्त केले.