शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
5
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
6
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
7
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
8
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
9
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
10
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
11
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
12
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
13
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
14
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
15
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
16
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
18
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
19
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
20
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)

ऐन दुष्काळात भागविली टंचाईग्रस्तांची तहान

By admin | Updated: April 1, 2016 01:51 IST

कवठे केंजळ पाणीयोजना : मकरंद पाटील यांच्या भूमिकेमुळे परिसराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी

कवठे : वाई तालुक्याच्या पूर्व भागातील टंचाईग्रस्त भागातील भीषण दुष्काळी परिस्थितीतील जनतेला एकमेव आशादायी असलेल्या कवठे केंजळ उपसा जलसिंचन योजनेच्या किकलीकडे जात असलेल्या बंदिस्त पाईपलाईनची कवठे पर्यंतची पाईपलाईन पूर्ण करून कवठे येथील चंद्रभागा ओढ्यात पाणी सोडण्याची चाचणी आज पूर्ण झाल्याने ऐन दुष्काळात टंचाईग्रस्तांची तहान भागविली आहे.कवठे येथील बंधारा पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागल्याने कवठे व बोपेगाव तसेच खानापूर या परीसरातील ओढे जलमय झाले. या पाईपलाईनच्या क्षेत्रात येणा-या सर्व ओढ्यांवर पाईपलाईनमधून व्हॉल्व काढून पाणी सोडण्यात आल्याने सर्व ओढ्यावरील बंधारे भरून वाहू लागले . केंजळ येथे जात असलेल्या पाईपलाईनच्या दुस-या फाट्याने केंजळ व सुरूर या ओढ्यात पाणी सोडण्यात आले. त्यामुळे वाई तालुक्याच्या पूर्व भागावर घोंगावत असलेल्या पाणी टंचाईचे संकट काही अंशी कमी होण्यास मदत झाली आहे. कवठे केंजळ योजनेच्या टाकीतून तीन पाईपलाईन जात असून त्यातील पहिला फाटा परखंदी येथे, दुसरा फाटा केंजळ येथे तर तिसरा फाटा कवठे येथून किकली या गावाकडे जाणारा आहे. यातील परखंदी व केंजळ या पाईपलाईनचे काम पूर्ण झाले आहे. परंतु महिनाभराचे कॅनालचे आवर्तन असतानासुद्धा केंजळ येथून सुरूर व कवठे गावापर्यंत येणारे पाणी भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे कवठे येथे पोहोचू शकत नव्हते यावर पयार्यी मार्ग काढण्यासाठी आमदार मकरंद पाटील व जिल्हा बँकेचे संचालक नितीन पाटील यांनी कवठे येथून किकलीकडे जात असलेल्या पाईपलाईनचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले व कवठे, बोपेगाव, खानापूर ग्रामस्थ यांनी अहोरात्र सहकार्य करीत कॅनालचे आवर्तन संपण्यापूर्वी काम पूर्ण केल्याने या पाणी वाहू शकले. यामुळे वाई तालुक्यातील पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. (प्रतिनिधी)लोकांचे सांघिक श्रमदानजिल्हा बँकेचे संचालक नितीन पाटील व आमदार मकरंद पाटील अहोरात्र सदर योजनेवर लक्ष ठेवून होते व वारंवार या योजनेच्या कामावर प्रत्यक्ष थांबून योजेनेच्या पूर्णत्वासाठी प्रयत्न करीत असल्याने परिसरातील सर्वच ग्रामस्थ योजनेच्या ठिकाणी रात्रंदिवस उपस्थित राहून यथाशक्ती काम करण्यासाठी स्वत:कडील यंत्रसामुग्रीसह विना मोबदला श्रमदान करून योजनेवरील इंजिनीअर व कामगारांना सहकार्य करीत होते. वीस वर्षांनी पूर्ण क्षमतेने वाहू लागला चंद्रभागा ओढाचंद्रभागा ओढ्याला पूर येवून गेला कि परिसरातील विहिरी तुडुंब भरणार व वर्षभर पाणी शेतीसाठी पुरणार हे येथील शेतक-यांनी मांडलेले गणित गेले वीस वर्षे हा ओढा पूर्ण क्षमतेने भरून न वाहिल्याने फोल ठरत होते. वीस वर्षाच्या कालावधीनंतर महापूर यावा या पद्धतीने सदर ओढा पहिल्यांदाच भरल्याचे पाहताना लोकांच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटत होते