शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

ऐन दुष्काळात भागविली टंचाईग्रस्तांची तहान

By admin | Updated: April 1, 2016 01:51 IST

कवठे केंजळ पाणीयोजना : मकरंद पाटील यांच्या भूमिकेमुळे परिसराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी

कवठे : वाई तालुक्याच्या पूर्व भागातील टंचाईग्रस्त भागातील भीषण दुष्काळी परिस्थितीतील जनतेला एकमेव आशादायी असलेल्या कवठे केंजळ उपसा जलसिंचन योजनेच्या किकलीकडे जात असलेल्या बंदिस्त पाईपलाईनची कवठे पर्यंतची पाईपलाईन पूर्ण करून कवठे येथील चंद्रभागा ओढ्यात पाणी सोडण्याची चाचणी आज पूर्ण झाल्याने ऐन दुष्काळात टंचाईग्रस्तांची तहान भागविली आहे.कवठे येथील बंधारा पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागल्याने कवठे व बोपेगाव तसेच खानापूर या परीसरातील ओढे जलमय झाले. या पाईपलाईनच्या क्षेत्रात येणा-या सर्व ओढ्यांवर पाईपलाईनमधून व्हॉल्व काढून पाणी सोडण्यात आल्याने सर्व ओढ्यावरील बंधारे भरून वाहू लागले . केंजळ येथे जात असलेल्या पाईपलाईनच्या दुस-या फाट्याने केंजळ व सुरूर या ओढ्यात पाणी सोडण्यात आले. त्यामुळे वाई तालुक्याच्या पूर्व भागावर घोंगावत असलेल्या पाणी टंचाईचे संकट काही अंशी कमी होण्यास मदत झाली आहे. कवठे केंजळ योजनेच्या टाकीतून तीन पाईपलाईन जात असून त्यातील पहिला फाटा परखंदी येथे, दुसरा फाटा केंजळ येथे तर तिसरा फाटा कवठे येथून किकली या गावाकडे जाणारा आहे. यातील परखंदी व केंजळ या पाईपलाईनचे काम पूर्ण झाले आहे. परंतु महिनाभराचे कॅनालचे आवर्तन असतानासुद्धा केंजळ येथून सुरूर व कवठे गावापर्यंत येणारे पाणी भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे कवठे येथे पोहोचू शकत नव्हते यावर पयार्यी मार्ग काढण्यासाठी आमदार मकरंद पाटील व जिल्हा बँकेचे संचालक नितीन पाटील यांनी कवठे येथून किकलीकडे जात असलेल्या पाईपलाईनचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले व कवठे, बोपेगाव, खानापूर ग्रामस्थ यांनी अहोरात्र सहकार्य करीत कॅनालचे आवर्तन संपण्यापूर्वी काम पूर्ण केल्याने या पाणी वाहू शकले. यामुळे वाई तालुक्यातील पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. (प्रतिनिधी)लोकांचे सांघिक श्रमदानजिल्हा बँकेचे संचालक नितीन पाटील व आमदार मकरंद पाटील अहोरात्र सदर योजनेवर लक्ष ठेवून होते व वारंवार या योजनेच्या कामावर प्रत्यक्ष थांबून योजेनेच्या पूर्णत्वासाठी प्रयत्न करीत असल्याने परिसरातील सर्वच ग्रामस्थ योजनेच्या ठिकाणी रात्रंदिवस उपस्थित राहून यथाशक्ती काम करण्यासाठी स्वत:कडील यंत्रसामुग्रीसह विना मोबदला श्रमदान करून योजनेवरील इंजिनीअर व कामगारांना सहकार्य करीत होते. वीस वर्षांनी पूर्ण क्षमतेने वाहू लागला चंद्रभागा ओढाचंद्रभागा ओढ्याला पूर येवून गेला कि परिसरातील विहिरी तुडुंब भरणार व वर्षभर पाणी शेतीसाठी पुरणार हे येथील शेतक-यांनी मांडलेले गणित गेले वीस वर्षे हा ओढा पूर्ण क्षमतेने भरून न वाहिल्याने फोल ठरत होते. वीस वर्षाच्या कालावधीनंतर महापूर यावा या पद्धतीने सदर ओढा पहिल्यांदाच भरल्याचे पाहताना लोकांच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटत होते