शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

ऐन दुष्काळात भागविली टंचाईग्रस्तांची तहान

By admin | Updated: April 1, 2016 01:51 IST

कवठे केंजळ पाणीयोजना : मकरंद पाटील यांच्या भूमिकेमुळे परिसराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी

कवठे : वाई तालुक्याच्या पूर्व भागातील टंचाईग्रस्त भागातील भीषण दुष्काळी परिस्थितीतील जनतेला एकमेव आशादायी असलेल्या कवठे केंजळ उपसा जलसिंचन योजनेच्या किकलीकडे जात असलेल्या बंदिस्त पाईपलाईनची कवठे पर्यंतची पाईपलाईन पूर्ण करून कवठे येथील चंद्रभागा ओढ्यात पाणी सोडण्याची चाचणी आज पूर्ण झाल्याने ऐन दुष्काळात टंचाईग्रस्तांची तहान भागविली आहे.कवठे येथील बंधारा पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागल्याने कवठे व बोपेगाव तसेच खानापूर या परीसरातील ओढे जलमय झाले. या पाईपलाईनच्या क्षेत्रात येणा-या सर्व ओढ्यांवर पाईपलाईनमधून व्हॉल्व काढून पाणी सोडण्यात आल्याने सर्व ओढ्यावरील बंधारे भरून वाहू लागले . केंजळ येथे जात असलेल्या पाईपलाईनच्या दुस-या फाट्याने केंजळ व सुरूर या ओढ्यात पाणी सोडण्यात आले. त्यामुळे वाई तालुक्याच्या पूर्व भागावर घोंगावत असलेल्या पाणी टंचाईचे संकट काही अंशी कमी होण्यास मदत झाली आहे. कवठे केंजळ योजनेच्या टाकीतून तीन पाईपलाईन जात असून त्यातील पहिला फाटा परखंदी येथे, दुसरा फाटा केंजळ येथे तर तिसरा फाटा कवठे येथून किकली या गावाकडे जाणारा आहे. यातील परखंदी व केंजळ या पाईपलाईनचे काम पूर्ण झाले आहे. परंतु महिनाभराचे कॅनालचे आवर्तन असतानासुद्धा केंजळ येथून सुरूर व कवठे गावापर्यंत येणारे पाणी भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे कवठे येथे पोहोचू शकत नव्हते यावर पयार्यी मार्ग काढण्यासाठी आमदार मकरंद पाटील व जिल्हा बँकेचे संचालक नितीन पाटील यांनी कवठे येथून किकलीकडे जात असलेल्या पाईपलाईनचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले व कवठे, बोपेगाव, खानापूर ग्रामस्थ यांनी अहोरात्र सहकार्य करीत कॅनालचे आवर्तन संपण्यापूर्वी काम पूर्ण केल्याने या पाणी वाहू शकले. यामुळे वाई तालुक्यातील पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. (प्रतिनिधी)लोकांचे सांघिक श्रमदानजिल्हा बँकेचे संचालक नितीन पाटील व आमदार मकरंद पाटील अहोरात्र सदर योजनेवर लक्ष ठेवून होते व वारंवार या योजनेच्या कामावर प्रत्यक्ष थांबून योजेनेच्या पूर्णत्वासाठी प्रयत्न करीत असल्याने परिसरातील सर्वच ग्रामस्थ योजनेच्या ठिकाणी रात्रंदिवस उपस्थित राहून यथाशक्ती काम करण्यासाठी स्वत:कडील यंत्रसामुग्रीसह विना मोबदला श्रमदान करून योजनेवरील इंजिनीअर व कामगारांना सहकार्य करीत होते. वीस वर्षांनी पूर्ण क्षमतेने वाहू लागला चंद्रभागा ओढाचंद्रभागा ओढ्याला पूर येवून गेला कि परिसरातील विहिरी तुडुंब भरणार व वर्षभर पाणी शेतीसाठी पुरणार हे येथील शेतक-यांनी मांडलेले गणित गेले वीस वर्षे हा ओढा पूर्ण क्षमतेने भरून न वाहिल्याने फोल ठरत होते. वीस वर्षाच्या कालावधीनंतर महापूर यावा या पद्धतीने सदर ओढा पहिल्यांदाच भरल्याचे पाहताना लोकांच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटत होते