शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

आली लहर.. केला कहर अन् घेतले जहर--संताप आणि किरकोळ कारणातून आयुष्य संपवण्याचा मार्ग-- तरूणाईची मानसिकता =आत्महत्येची कारणमीमांसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 23:16 IST

सातारा : घरातून मिळालेल्या नकारातून आलेला राग, स्पर्धेच्या युगात सर्वांबरोबर धावताना होणारी दमछाक किंवा मग प्रेमातील अपयश यापैकी कोणतेही एक कारण तरुणाईला आत्महत्येच्या मार्गावर नेऊ पाहत आहे.

ठळक मुद्दे गळफास घेणेविषप्राशन करणे

प्रगती जाधव-पाटील ।सातारा : घरातून मिळालेल्या नकारातून आलेला राग, स्पर्धेच्या युगात सर्वांबरोबर धावताना होणारी दमछाक किंवा मग प्रेमातील अपयश यापैकी कोणतेही एक कारण तरुणाईला आत्महत्येच्या मार्गावर नेऊ पाहत आहे. ‘आली लहर.. केला कहर अन् घेतले जहर,’ अगदी अशीच मानसिकता तरुणाईची दिसत आहे.हातात आलेल्या आधुनिक गॅझेटस्मुळे तरुणाईने दुनिया मुठ्ठीमे केली; पण वास्तविक ही दुनिया त्यांच्या मुठीतून दूर गेल्यानंतर येणाऱ्या नैराश्यातून त्यांनी ‘कायमची सुटका हवी’ म्हणून आत्महत्येचा मार्ग स्वीकारणे पसंत करत आहेत. स्पर्धेच्या युगात स्वत:शीच लढत राहणाºया या विद्यार्थ्यांचा संवाद कमी झाला आहे. आॅनलाईन विश्वात रमणाºयांना विविध माध्यमातून ‘लाईक’ करणारे अनेकजण आहेत. मात्र, चेहºयावरील हावभाव आणि वर्तन बदलूनही कोणी काय झालं? हे विचारात नाही, याचे शल्य तरुणाईला बोचणारे आहे. कॉलेजमध्ये असलेला एकटेपणा, अभ्यास पेलता येत नसल्याने आलेले नैराश्य हे आत्महत्येची काही प्रमुख कारणे मानली जात आहेत.तरुणाईची सहनशीलता आता कमालीची ढासळली आहे. त्यामुळे कुठल्याही कारणाने झालेला विरोध पचवणं त्यांना जड जात आहे. अशात कुटुंबीयांना धडा शिकविण्यासाठी रागाच्या भरात विषप्राशन करणारे बहाद्दरही अनेक आहेत.महाविद्यालयाची चाहूल लागल्यानंतरच प्रत्येकाला आपली ‘परफेक्ट जोडी’ शोधण्याची उत्सुकता असते. मित्र परिवाराच्या मदतीने पाळत ठेवून एखादी आवडली आणि तिने नकार दिला तर युवक आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात. दुसरीकडे महाविद्यालयीन ओळखीचे नको इतक्या जवळचे संबंध प्रस्थापित केलेल्या युवतींना नंतर हे नाते पुढे नेता आले नाही तरीही त्या आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात.आत्महत्यापूर्वी मिळतो सोशल संकेततारुण्याच्या उंबरठ्यावर असताना आलेले नैराश्य सोसवतही नाही अन् सांगवतही नाही, असे असते. म्हणूनच कोणीतरी आपल्याला विचारावे, या हेतूने आत्महत्या करण्यापूर्वी तरुणाई काही सोशल संकेत देते. व्हॉटस्अ‍ॅप अन् फेसबुकच्या दुनियेत वावरणारी तरुणाई स्टेटस आणि डीपी अपडेट करून काही सुचविते. हे सुचविणे जर मित्रांच्या लक्षात आले तर त्यातून आत्महत्या करण्याचा विचार बाहेर जातो; पण दुर्दैवाने मित्रांनीही जर हे गांभीर्याने घेतले नाही तर मात्र या जगाला माझी गरज नाही, म्हणून ही मुलं आत्महत्या करतात. घरी वावरतानाही ही मुलं कमालीची समंजस्य असल्यासारखे वागतात.ही काही कारणेप्रेम प्रकरणातील अपयशप्रेम संबंधातून निर्माण होणारी बदनामीची भीतीवाईट संगतीमुळे अभ्यासाकडे झालेले दुर्लक्षमहाविद्यालयात मिळणारी द्वेषकारक किंवा कमीपणाची वागणूकमहाविद्यालयातील वरिष्ठ वर्गातील मुलांकडून होणारे रॅगिंगसाताºयातील काही उदाहरणे१. जावळी तालुक्यातील एका तरुणीने घरात रविवारी तिच्या आवडीचे जेवण केले नाही, या कारणाने पडवीत जाऊन औषध पिऊन आत्महत्या केली. याविषयी तिने चिठ्ठी लिहून ठेवली होती.. सातारा तालुक्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणाºया एका युवकाने परीक्षेच्या निकालाच्या भीतीने आत्महत्या केली. निकाल लागला तेव्हा हा मुलगा कमी गुणांनी उत्तीर्ण झाल्याचे निदर्शनास आले होते.