शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
2
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
3
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
4
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
5
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
6
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
7
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
8
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
9
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
10
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
11
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
12
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
13
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
14
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
15
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
16
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
17
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
18
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
19
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
20
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प

हुतात्म्यांच्या स्मृर्ती जागविण्याचे काम व्हावे : बाळासाहेब पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:47 IST

पुसेसावळी : हुतात्म्यांची पावन भूमी असलेल्या वडगावमध्ये दरवर्षी ९ सप्टेंबरला हुतात्मा क्रांती प्रतिष्ठानच्या वतीने कार्यक्रम घेतला जातो. त्या कार्यक्रमास ...

पुसेसावळी : हुतात्म्यांची पावन भूमी असलेल्या वडगावमध्ये दरवर्षी ९ सप्टेंबरला हुतात्मा क्रांती प्रतिष्ठानच्या वतीने कार्यक्रम घेतला जातो. त्या कार्यक्रमास गेल्या अनेक वर्षांपासून येण्याचे भाग्य लाभत असून हुतात्म्यांच्या स्मृर्ती जागविण्याचे काम या माध्यमातून व्हावे, असे मत सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केले. ते वडगाव (ज.स्वा) ता. खटाव येथे हुतात्म्यांना अभिवादन कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी श्रीनिवास पाटील, सुनील माने, प्रदीप विधाते, मानसिंग जगदाळे, कल्पना खाडे, बंडा गोडसे, सुरेंद्र गुदगे, शिवाजीराव सर्वगोड, संतोष घार्गे, भाग्यश्री भाग्यवंत, सी.एम.पाटील, संदीप मांडवे, जितेंद्र पवार, जयश्री कदम, रेखा घार्गे, चंद्रकांत पाटील, अर्जुनराव खाडे ,प्रकाश घार्गे, जनार्दन कासार (प्रांताधिकारी), शैलेश सूर्यवंशी (प्रांताधिकारी), किरण जमदाडे (तहसिलदार) आदींची प्रमुख उपस्थिती होती.

बाळासाहेब पाटील म्हणाले की, हुतात्म्यांमुळे देशाला स्वातंत्र्य मिळण्यास मदत झाली आहे. त्यामुळे त्यांच्या विचारांचा वारसा पुढे चालण्यासाठी या हुतात्मा दिनास उत्सवाचे स्वरूप द्यावे. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणपती उत्सव येत आहे. त्यामुळे सर्वांनी काळजी घेऊन उत्सव साजरा करावा. त्याचबरोबर रखडलेल्या विकास कामांना चालना दिली जाईल आणि पाणी प्रश्नासाठी पुढाकार घेऊन राहिलेली उरमोडीची कामे मार्गी लावली जातील. यावेळी श्रीनिवास पाटील, बंडा गोडसे, सुनील माने आदींची भाषणे झाली.

कार्यक्रमास पुसेसावळी परिसरातील विविध गावचे सरपंच, सोसायट्यांचे चेअरमन, सदस्य, स्वातंत्र्य सैनिक, गोवामुक्ती स्वातंत्र सैनिक संघटना व वडगाव ग्रामस्थ उपस्थित होेते. सूत्रसंचालन काशीनाथ दुटाळ यांनी केले, तर हुतात्मा पुत्र वसंतराव घार्गे आभार यांनी मानले.