शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
4
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
5
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
6
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
7
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
8
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
9
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
10
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
11
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
12
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
13
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
14
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
15
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
16
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
17
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
18
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
19
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
20
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."

कोयना धरणग्रस्तांचेच पुनर्वसन नाही; धोक्यांच्या गावाबद्दल कसा विश्वास ठेवू?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:41 IST

सातारा : ‘कोयना धरणग्रस्तांच्याच पुनर्वसनाचा प्रश्न अजून सुटलेला नाही. मग भूस्खलन झालेल्या गावांच्या पुनर्वसनावर कसा विश्वास ठेवायचा? तसेच पुनर्वसन ...

सातारा : ‘कोयना धरणग्रस्तांच्याच पुनर्वसनाचा प्रश्न अजून सुटलेला नाही. मग भूस्खलन झालेल्या गावांच्या पुनर्वसनावर कसा विश्वास ठेवायचा? तसेच पुनर्वसन करायचे असेल तर कोयनेचं पाणी ज्या भागात गेलं आहे, तेथेच करावं. उपाशी मरण्याच्या ठिकाणी नको,’ अशी आग्रही मागणी करतानाच एकप्रकारे इशाराही श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी शासनाला दिला.

दरम्यान, यावेळी त्यांनी मुख्यमंत्री दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कोयना धरणग्रस्तांना स्थानबद्ध केल्याचा निषेधही केला.

सातारा येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. पाटणकर बोलत होते. यावेळी शरद जांभळे, हरिश्चंद्र दळवी, संतोष गोटल, चैतन्य दळवी, आदी उपस्थित होते.

डॉ. भारत पाटणकर म्हणाले, ‘सातारा जिल्ह्याला इतिहास आहे. १९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यात जिल्हा हाती शस्त्रे घेऊन लढला. अतिवृष्टीतील नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री पाटण तालुक्यात येणार होते. त्यावेळी कोयना धरणग्रस्तांमधील काहीजणांना पोलिसांनी स्थानबद्ध केले. लोकशाहीला घातक असाच हा प्रकार झाला; कारण, राज्याच्या मागील ४० वर्षांच्या इतिहासात असे कधीच घडले नव्हते. अधिकार आहे म्हणून चिरडणे व मुस्कटदाबीचाच हा प्रकार करण्यात आला. अशा घटना यापुढेही घडणार असतील तर महाराष्ट्रातील जनता याला प्रतिकार करील.

अतिवृष्टीत पाटण तालुक्यातील ढोकावळे, मीरगाव, आंबेघर गावांत भूस्खलन झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भूस्खलन धोका असणाऱ्या गावांचे पुनर्वसन करण्याचे स्पष्ट केले आहे. पण, पाटण तालुक्यातील कोयना धरणग्रस्त २३ गावांचेच पुनर्वसन अजून झालेले नाही. या २३ गावांमधील काही गावे दरडीचा धोका असणारी आहेत. त्यामुळे पुनर्वसन कसे करणार? शासनावर कसा विश्वास ठेवावा? लोकांच्या विश्वासास पात्र बना; तरच सर्वांचा तुमच्यावर विश्वास बसेल, असेही डॉ. पाटणकर यांनी स्पष्ट केले.

..............................................................