शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

कोयना धरणग्रस्तांचेच पुनर्वसन नाही; धोक्यांच्या गावाबद्दल कसा विश्वास ठेवू?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:41 IST

सातारा : ‘कोयना धरणग्रस्तांच्याच पुनर्वसनाचा प्रश्न अजून सुटलेला नाही. मग भूस्खलन झालेल्या गावांच्या पुनर्वसनावर कसा विश्वास ठेवायचा? तसेच पुनर्वसन ...

सातारा : ‘कोयना धरणग्रस्तांच्याच पुनर्वसनाचा प्रश्न अजून सुटलेला नाही. मग भूस्खलन झालेल्या गावांच्या पुनर्वसनावर कसा विश्वास ठेवायचा? तसेच पुनर्वसन करायचे असेल तर कोयनेचं पाणी ज्या भागात गेलं आहे, तेथेच करावं. उपाशी मरण्याच्या ठिकाणी नको,’ अशी आग्रही मागणी करतानाच एकप्रकारे इशाराही श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी शासनाला दिला.

दरम्यान, यावेळी त्यांनी मुख्यमंत्री दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कोयना धरणग्रस्तांना स्थानबद्ध केल्याचा निषेधही केला.

सातारा येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. पाटणकर बोलत होते. यावेळी शरद जांभळे, हरिश्चंद्र दळवी, संतोष गोटल, चैतन्य दळवी, आदी उपस्थित होते.

डॉ. भारत पाटणकर म्हणाले, ‘सातारा जिल्ह्याला इतिहास आहे. १९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यात जिल्हा हाती शस्त्रे घेऊन लढला. अतिवृष्टीतील नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री पाटण तालुक्यात येणार होते. त्यावेळी कोयना धरणग्रस्तांमधील काहीजणांना पोलिसांनी स्थानबद्ध केले. लोकशाहीला घातक असाच हा प्रकार झाला; कारण, राज्याच्या मागील ४० वर्षांच्या इतिहासात असे कधीच घडले नव्हते. अधिकार आहे म्हणून चिरडणे व मुस्कटदाबीचाच हा प्रकार करण्यात आला. अशा घटना यापुढेही घडणार असतील तर महाराष्ट्रातील जनता याला प्रतिकार करील.

अतिवृष्टीत पाटण तालुक्यातील ढोकावळे, मीरगाव, आंबेघर गावांत भूस्खलन झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भूस्खलन धोका असणाऱ्या गावांचे पुनर्वसन करण्याचे स्पष्ट केले आहे. पण, पाटण तालुक्यातील कोयना धरणग्रस्त २३ गावांचेच पुनर्वसन अजून झालेले नाही. या २३ गावांमधील काही गावे दरडीचा धोका असणारी आहेत. त्यामुळे पुनर्वसन कसे करणार? शासनावर कसा विश्वास ठेवावा? लोकांच्या विश्वासास पात्र बना; तरच सर्वांचा तुमच्यावर विश्वास बसेल, असेही डॉ. पाटणकर यांनी स्पष्ट केले.

..............................................................