शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

कोयना धरणग्रस्तांचेच पुनर्वसन नाही; धोक्यांच्या गावाबद्दल कसा विश्वास ठेवू?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:41 IST

सातारा : ‘कोयना धरणग्रस्तांच्याच पुनर्वसनाचा प्रश्न अजून सुटलेला नाही. मग भूस्खलन झालेल्या गावांच्या पुनर्वसनावर कसा विश्वास ठेवायचा? तसेच पुनर्वसन ...

सातारा : ‘कोयना धरणग्रस्तांच्याच पुनर्वसनाचा प्रश्न अजून सुटलेला नाही. मग भूस्खलन झालेल्या गावांच्या पुनर्वसनावर कसा विश्वास ठेवायचा? तसेच पुनर्वसन करायचे असेल तर कोयनेचं पाणी ज्या भागात गेलं आहे, तेथेच करावं. उपाशी मरण्याच्या ठिकाणी नको,’ अशी आग्रही मागणी करतानाच एकप्रकारे इशाराही श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी शासनाला दिला.

दरम्यान, यावेळी त्यांनी मुख्यमंत्री दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कोयना धरणग्रस्तांना स्थानबद्ध केल्याचा निषेधही केला.

सातारा येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. पाटणकर बोलत होते. यावेळी शरद जांभळे, हरिश्चंद्र दळवी, संतोष गोटल, चैतन्य दळवी, आदी उपस्थित होते.

डॉ. भारत पाटणकर म्हणाले, ‘सातारा जिल्ह्याला इतिहास आहे. १९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यात जिल्हा हाती शस्त्रे घेऊन लढला. अतिवृष्टीतील नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री पाटण तालुक्यात येणार होते. त्यावेळी कोयना धरणग्रस्तांमधील काहीजणांना पोलिसांनी स्थानबद्ध केले. लोकशाहीला घातक असाच हा प्रकार झाला; कारण, राज्याच्या मागील ४० वर्षांच्या इतिहासात असे कधीच घडले नव्हते. अधिकार आहे म्हणून चिरडणे व मुस्कटदाबीचाच हा प्रकार करण्यात आला. अशा घटना यापुढेही घडणार असतील तर महाराष्ट्रातील जनता याला प्रतिकार करील.

अतिवृष्टीत पाटण तालुक्यातील ढोकावळे, मीरगाव, आंबेघर गावांत भूस्खलन झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भूस्खलन धोका असणाऱ्या गावांचे पुनर्वसन करण्याचे स्पष्ट केले आहे. पण, पाटण तालुक्यातील कोयना धरणग्रस्त २३ गावांचेच पुनर्वसन अजून झालेले नाही. या २३ गावांमधील काही गावे दरडीचा धोका असणारी आहेत. त्यामुळे पुनर्वसन कसे करणार? शासनावर कसा विश्वास ठेवावा? लोकांच्या विश्वासास पात्र बना; तरच सर्वांचा तुमच्यावर विश्वास बसेल, असेही डॉ. पाटणकर यांनी स्पष्ट केले.

..............................................................