शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...
2
“दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे उत्तर नाही, एअर स्ट्राइक करणे पर्याय असू शकत नाही”: राज ठाकरे
3
‘ऑपरेशन सिंदूर’ म्हणजे माझ्या आईसारख्या महिलांचा सन्मान; गणबोटे कुटुंबाने मानले मोदींचे आभार 
4
युद्धापूर्वीच पाकिस्तानचे आत्मसमर्पण, संरक्षण मंत्री म्हणाले- 'आम्ही कारवाई करणार नाही'
5
Operation Sindoor : अखेर न्याय झालाच! भारताने पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला; कोणी दिलं 'ऑपरेशन सिंदूर' हे नाव?
6
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'नंतर काय काय घडलं? जगभरातून समर्थन...
7
'अभी पिक्चर बाकी है...', ऑपरेशन सिंदूरनंतर माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांची सूचक पोस्ट!
8
पीएम किसानचा २०वा हप्ता कधी येणार? तुमचं नाव यादीत आहे का? मोबाईलवरुनही तपासू शकता
9
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'च नव्हे, भारताने आधीही पाकिस्तानविरुद्ध केलेल्या 'या' मोठ्या कारवाया!
10
'ऑपरेशन सिंदूर' हेच नाव का ठेवले गेले? काय आहे भारतीय संस्कृतीत सिंदूरचे महत्त्व? वाचा!
11
Operation Sindoor Live Updates: "यापुढेही भारतावर हल्ल्याची शक्यता, म्हणून उत्तर देणे गरजेचे होते"
12
Operation Sindoor: कुख्यात दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबाचा खात्मा; १४ लोकांना यमसदनी धाडलं
13
आजोबा, वडील एक्स आर्मी, पतीही...! कोण आहेत 'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देणाऱ्या लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी
14
Operation Sindoor: नऊ ठिकाणं... ९० दहशतवाद्यांचा खात्मा; भारतीय लष्कराने दहशतवाद्यांचे कंबरडेच मोडले!
15
Operation Sindoor: २५ मिनिटांत ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त; कर्नल सोफिया कुरैशी यांनी सांगितला थरार
16
Operation Sindoor : पाकिस्तानमध्ये हल्ल्याच्या २३ मिनिटे आधीच लष्कराने ट्विट केले? समोर आली माहिती
17
‘ऑपरेशन सिंदूर’चे श्रेय तुम्ही घेऊ नका, ते फक्त भारतीय सेनेचेच; संजय राऊतांची सरकारवर टीका
18
'ऑपरेशन सिंदूर'चा परिणाम! 'या' डिफेन्स स्टॉक्सने घेतली मोठी झेप; ३ महिन्यात नफा दुप्पट
19
गृह मंत्रालय अलर्ट! निमलष्करी दलांच्या सुट्ट्या रद्द; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत-पाकमधील तणाव वाढला
20
पाकिस्तानी स्टॉक मार्केटचे काय हाल ऐकाल...; रात्री भारताची मिसाईल कोसळली, दिवसा भीतीने शेअर बाजार...

संख्याबळ असून सरपंचपद विरोधकांकडे जाण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोरेगाव : कोरेगाव तालुक्यातील सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्षांची अवस्था ‘कही खुशी, कही गम’ अशीच ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोरेगाव : कोरेगाव तालुक्यातील सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्षांची अवस्था ‘कही खुशी, कही गम’ अशीच बनली आहे. सरपंचपदासाठी आपल्याच विचारांच्या उमेदवारांची निवड होण्याच्यादृष्टीने राष्ट्रवादीसह काँग्रेस, शिवसेना आणि भाजपने कंबर कसली आहे. शैक्षणिक पात्रतेचा विषय ऐरणीवर असल्याने संख्याबळ जास्त असून, विरोधी गटाकडे सरपंचपद जाईल, या भीतीने गावपातळीवरील नेतेमंडळींमध्ये भीतीचे वातावरण आहे.

तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली होती. सात ग्रामपंचायती पूर्णत: तर १२ ग्रामपंचायती अंशत: बिनविरोध झाल्या होत्या. कऱ्हाड उत्तरमध्ये पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना मानणारा राष्ट्रवादी गट आणि काॅंग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य भीमराव पाटील यांना मानणाऱ्या गटामध्ये थेट लढत झाली होती. वाठार किरोली ग्रामपंचायत ताब्यात घेऊन भीमराव पाटील यांनी दहा वर्षांनंतर परिवर्तन घडविले आहे. फलटण राखीव मतदारसंघात विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, मुंबई बाजार समितीचे सभापती बाळासाहेब सोळस्कर-पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने यश मिळविले आहे.

कोरेगाव मतदारसंघात राष्ट्रवादीतर्फे आमदार शशिकांत शिंदे यांनी सर्वाधिक ग्रामपंचायतींवर विजय मिळविल्याचा दावा केला होता, तर आमदार महेश शिंदे यांनी देखील सर्वात जास्त ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवल्याचा दावा केला होता. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर श्रेयवाद रंगला होता. त्यातच सर्वांचे लक्ष हे सरपंचपदाच्या आरक्षणावर लागून राहिले होते. आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर अनेक गावातील विशेषत: मोठ्या गावातील राजकीय चित्र बदलले असून, त्याचा फटका दोन्ही आमदारांना बसू शकतो, हे मात्र निश्‍चित. काॅंग्रेसने काही ठिकाणी नशीब आजमावले असले तरी महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्यांना अपेक्षित यश मिळालेच आहे. बिनविरोध झालेल्या गावांनी एकत्रित येऊन निवडणूक न लढण्याचे ठरविले होते.सरपंचपदाच्या आरक्षणाबाबतही गावात बसून, चर्चेद्वारे निर्णय घेतला जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, कोरेगाव मतदारसंघात आमदार शशिकांत शिंदे व आमदार महेश शिंदे यांच्या गटामध्येच लढत झालेली असून, आता सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पॅनेलबंदी अथवा आघाडीबाबत शासनाचे ठोस निर्णय अथवा धोरण नसल्याने गावपातळीवर अनेक बदल होऊ शकतात. त्यामुळे आताही दोन्ही आमदारांचे गट सर्वाधिक ग्रामपंचायती आणि सरपंच आमचेच होणार, असा दावा करीत आहेत. पाडळी स्टेशन (सातारारोड) चा अपवाद वगळता वाठार स्टेशन, वाठार किरोली,तांदुळवाडी, मंगळापूर, देऊर, अंबवडे संमत वाघोली, कठापूर, ल्हासुर्णे, किन्हई, भोसे, सोळशी या गावांमधील राजकीय समीकरणे आरक्षणांमुळे बदलणार आहे.

चौकट

उपसरपंचपदावर मानावे लागणार समाधान

सरपंचपदासाठी इच्छुक असलेल्यांना आता काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. काहीजणांना उपसरपंचपदावर समाधान मानावे लागणार आहे.

शहराचे वारे ग्रामीण भागाकडे

सातारा जिल्ह्यातील शहरी भागांमध्ये नगरपालिका, नगरपंचायतीच्या राजकारणामध्ये अनेकांना उपनगराध्यपदावर समसमान संधी दिली जाते. ठरावीक कालावधी ठरवून प्रत्येकाला संधी देण्याचे धोरण पक्षप्रमुख आखतात. तोच पॅटर्न आता ग्रामीण भागात लागू होण्याची शक्यता आहे. आरक्षणामुळे सरपंचपदापासून दूर राहिलेल्यांना संधी देण्यासाठी आता त्या पॅटर्नची मागणी होऊ लागली आहे. आरक्षण सोडतीच्या ठिकाणीच कार्यकर्त्यांमध्ये तशी कुजबुज होती.