शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

संख्याबळ असून सरपंचपद विरोधकांकडे जाण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोरेगाव : कोरेगाव तालुक्यातील सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्षांची अवस्था ‘कही खुशी, कही गम’ अशीच ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोरेगाव : कोरेगाव तालुक्यातील सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्षांची अवस्था ‘कही खुशी, कही गम’ अशीच बनली आहे. सरपंचपदासाठी आपल्याच विचारांच्या उमेदवारांची निवड होण्याच्यादृष्टीने राष्ट्रवादीसह काँग्रेस, शिवसेना आणि भाजपने कंबर कसली आहे. शैक्षणिक पात्रतेचा विषय ऐरणीवर असल्याने संख्याबळ जास्त असून, विरोधी गटाकडे सरपंचपद जाईल, या भीतीने गावपातळीवरील नेतेमंडळींमध्ये भीतीचे वातावरण आहे.

तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली होती. सात ग्रामपंचायती पूर्णत: तर १२ ग्रामपंचायती अंशत: बिनविरोध झाल्या होत्या. कऱ्हाड उत्तरमध्ये पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना मानणारा राष्ट्रवादी गट आणि काॅंग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य भीमराव पाटील यांना मानणाऱ्या गटामध्ये थेट लढत झाली होती. वाठार किरोली ग्रामपंचायत ताब्यात घेऊन भीमराव पाटील यांनी दहा वर्षांनंतर परिवर्तन घडविले आहे. फलटण राखीव मतदारसंघात विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, मुंबई बाजार समितीचे सभापती बाळासाहेब सोळस्कर-पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने यश मिळविले आहे.

कोरेगाव मतदारसंघात राष्ट्रवादीतर्फे आमदार शशिकांत शिंदे यांनी सर्वाधिक ग्रामपंचायतींवर विजय मिळविल्याचा दावा केला होता, तर आमदार महेश शिंदे यांनी देखील सर्वात जास्त ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवल्याचा दावा केला होता. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर श्रेयवाद रंगला होता. त्यातच सर्वांचे लक्ष हे सरपंचपदाच्या आरक्षणावर लागून राहिले होते. आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर अनेक गावातील विशेषत: मोठ्या गावातील राजकीय चित्र बदलले असून, त्याचा फटका दोन्ही आमदारांना बसू शकतो, हे मात्र निश्‍चित. काॅंग्रेसने काही ठिकाणी नशीब आजमावले असले तरी महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्यांना अपेक्षित यश मिळालेच आहे. बिनविरोध झालेल्या गावांनी एकत्रित येऊन निवडणूक न लढण्याचे ठरविले होते.सरपंचपदाच्या आरक्षणाबाबतही गावात बसून, चर्चेद्वारे निर्णय घेतला जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, कोरेगाव मतदारसंघात आमदार शशिकांत शिंदे व आमदार महेश शिंदे यांच्या गटामध्येच लढत झालेली असून, आता सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पॅनेलबंदी अथवा आघाडीबाबत शासनाचे ठोस निर्णय अथवा धोरण नसल्याने गावपातळीवर अनेक बदल होऊ शकतात. त्यामुळे आताही दोन्ही आमदारांचे गट सर्वाधिक ग्रामपंचायती आणि सरपंच आमचेच होणार, असा दावा करीत आहेत. पाडळी स्टेशन (सातारारोड) चा अपवाद वगळता वाठार स्टेशन, वाठार किरोली,तांदुळवाडी, मंगळापूर, देऊर, अंबवडे संमत वाघोली, कठापूर, ल्हासुर्णे, किन्हई, भोसे, सोळशी या गावांमधील राजकीय समीकरणे आरक्षणांमुळे बदलणार आहे.

चौकट

उपसरपंचपदावर मानावे लागणार समाधान

सरपंचपदासाठी इच्छुक असलेल्यांना आता काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. काहीजणांना उपसरपंचपदावर समाधान मानावे लागणार आहे.

शहराचे वारे ग्रामीण भागाकडे

सातारा जिल्ह्यातील शहरी भागांमध्ये नगरपालिका, नगरपंचायतीच्या राजकारणामध्ये अनेकांना उपनगराध्यपदावर समसमान संधी दिली जाते. ठरावीक कालावधी ठरवून प्रत्येकाला संधी देण्याचे धोरण पक्षप्रमुख आखतात. तोच पॅटर्न आता ग्रामीण भागात लागू होण्याची शक्यता आहे. आरक्षणामुळे सरपंचपदापासून दूर राहिलेल्यांना संधी देण्यासाठी आता त्या पॅटर्नची मागणी होऊ लागली आहे. आरक्षण सोडतीच्या ठिकाणीच कार्यकर्त्यांमध्ये तशी कुजबुज होती.