शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
3
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
4
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
5
जीएसटी 2.0चा धमाका : क्वीड vs एसप्रेसो vs अल्टो, देशातील सर्वात स्वस्तकार कोणती? 'या' कारवर मिळेल सर्वाधिक फायदा
6
Kieron Pollard: किरॉन पोलार्डचा वर्ल्ड रेकॉर्ड! 'असा' पराक्रम करणारा जगातील पहिलाच
7
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
8
हुंड्यासाठी जावयाची क्रूरता! जमिनीसाठी पत्नीची केली हत्या, सासऱ्यालाही दिला विजेचा झटका
9
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
10
Navratri 2025: नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ, दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचनाने कोणते लाभ होतात?
11
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
12
ऐकावं ते नवलच! शोधून शोधून थकली पण सापडलाच नाही नवरा; मग स्वत:शीच केलं लग्न अन्...
13
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा भिडणार? समजून घ्या IND vs PAKचे गणित
14
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
15
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
16
Mumbai: सचिन तेंडुलकरच्या हस्ते दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्याचे लोकार्पण!
17
Navratri 2025: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करूया स्मरण आणि मानसपूजन देवी शैलपुत्रीचे!
18
दुर्दैवी अंत! ज्याच्या इशाऱ्यावर 'वाघ' उठबस करायचा, त्याच मालकाला वाघाने टेन्शनमध्ये शिकार बनवलं
19
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू

संख्याबळ असून सरपंचपद विरोधकांकडे जाण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोरेगाव : कोरेगाव तालुक्यातील सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्षांची अवस्था ‘कही खुशी, कही गम’ अशीच ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोरेगाव : कोरेगाव तालुक्यातील सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्षांची अवस्था ‘कही खुशी, कही गम’ अशीच बनली आहे. सरपंचपदासाठी आपल्याच विचारांच्या उमेदवारांची निवड होण्याच्यादृष्टीने राष्ट्रवादीसह काँग्रेस, शिवसेना आणि भाजपने कंबर कसली आहे. शैक्षणिक पात्रतेचा विषय ऐरणीवर असल्याने संख्याबळ जास्त असून, विरोधी गटाकडे सरपंचपद जाईल, या भीतीने गावपातळीवरील नेतेमंडळींमध्ये भीतीचे वातावरण आहे.

तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली होती. सात ग्रामपंचायती पूर्णत: तर १२ ग्रामपंचायती अंशत: बिनविरोध झाल्या होत्या. कऱ्हाड उत्तरमध्ये पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना मानणारा राष्ट्रवादी गट आणि काॅंग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य भीमराव पाटील यांना मानणाऱ्या गटामध्ये थेट लढत झाली होती. वाठार किरोली ग्रामपंचायत ताब्यात घेऊन भीमराव पाटील यांनी दहा वर्षांनंतर परिवर्तन घडविले आहे. फलटण राखीव मतदारसंघात विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, मुंबई बाजार समितीचे सभापती बाळासाहेब सोळस्कर-पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने यश मिळविले आहे.

कोरेगाव मतदारसंघात राष्ट्रवादीतर्फे आमदार शशिकांत शिंदे यांनी सर्वाधिक ग्रामपंचायतींवर विजय मिळविल्याचा दावा केला होता, तर आमदार महेश शिंदे यांनी देखील सर्वात जास्त ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवल्याचा दावा केला होता. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर श्रेयवाद रंगला होता. त्यातच सर्वांचे लक्ष हे सरपंचपदाच्या आरक्षणावर लागून राहिले होते. आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर अनेक गावातील विशेषत: मोठ्या गावातील राजकीय चित्र बदलले असून, त्याचा फटका दोन्ही आमदारांना बसू शकतो, हे मात्र निश्‍चित. काॅंग्रेसने काही ठिकाणी नशीब आजमावले असले तरी महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्यांना अपेक्षित यश मिळालेच आहे. बिनविरोध झालेल्या गावांनी एकत्रित येऊन निवडणूक न लढण्याचे ठरविले होते.सरपंचपदाच्या आरक्षणाबाबतही गावात बसून, चर्चेद्वारे निर्णय घेतला जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, कोरेगाव मतदारसंघात आमदार शशिकांत शिंदे व आमदार महेश शिंदे यांच्या गटामध्येच लढत झालेली असून, आता सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पॅनेलबंदी अथवा आघाडीबाबत शासनाचे ठोस निर्णय अथवा धोरण नसल्याने गावपातळीवर अनेक बदल होऊ शकतात. त्यामुळे आताही दोन्ही आमदारांचे गट सर्वाधिक ग्रामपंचायती आणि सरपंच आमचेच होणार, असा दावा करीत आहेत. पाडळी स्टेशन (सातारारोड) चा अपवाद वगळता वाठार स्टेशन, वाठार किरोली,तांदुळवाडी, मंगळापूर, देऊर, अंबवडे संमत वाघोली, कठापूर, ल्हासुर्णे, किन्हई, भोसे, सोळशी या गावांमधील राजकीय समीकरणे आरक्षणांमुळे बदलणार आहे.

चौकट

उपसरपंचपदावर मानावे लागणार समाधान

सरपंचपदासाठी इच्छुक असलेल्यांना आता काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. काहीजणांना उपसरपंचपदावर समाधान मानावे लागणार आहे.

शहराचे वारे ग्रामीण भागाकडे

सातारा जिल्ह्यातील शहरी भागांमध्ये नगरपालिका, नगरपंचायतीच्या राजकारणामध्ये अनेकांना उपनगराध्यपदावर समसमान संधी दिली जाते. ठरावीक कालावधी ठरवून प्रत्येकाला संधी देण्याचे धोरण पक्षप्रमुख आखतात. तोच पॅटर्न आता ग्रामीण भागात लागू होण्याची शक्यता आहे. आरक्षणामुळे सरपंचपदापासून दूर राहिलेल्यांना संधी देण्यासाठी आता त्या पॅटर्नची मागणी होऊ लागली आहे. आरक्षण सोडतीच्या ठिकाणीच कार्यकर्त्यांमध्ये तशी कुजबुज होती.