शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

चाय पे चर्चा.. अन् दुधात माशी!

By admin | Updated: February 1, 2016 01:05 IST

जिल्हा परिषद बंड : उदयनराजेंच्या भूमिकेमुळे राष्ट्रवादीची कोंडी

सातारा : आजपर्यंत आक्रमक पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हा परिषदेतील पदाधिकाऱ्यांच्या बाबतीत भलतीच कोंडी झाली आहे. ‘शरद पवार यांच्याशी बोलल्यानंतरच रवी साळुंखेंच्या राजीनाम्याचा निर्णय घेऊ,’ अशी स्पष्ट भूमिका खासदार उदयनराजेंनी घेतल्यामुळे त्यांची ‘चाय पे चर्चा’ होणार कधी अन् आपली ‘दुधात पडलेली माशी’ बाहेर काढणार कधी, असा यक्षप्रश्न पक्षापुढे पडला आहे. पुढील वर्षी जानेवारी महिन्यात जिल्हा परिषदेची निवडणूक होत असून, त्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी बदलांचे वारे वाहू लागले आहेत. गेल्या दोन-तीन महिन्यांपासूनच पदाधिकाऱ्यांनी राजीनामा द्यावा, यासाठी अनेक इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून तयार होते. त्याला मुहूर्त मिळाला तो जानेवारी महिन्यात. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगूनही अध्यक्ष माणिकराव सोनवलकर सोडून इतरांनी राजीनामा दिला नव्हता. उलट उपाध्यक्षांसह पाचजणांनी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकविला. ‘आम्हाला काम करण्यासाठी कमी कालावधी मिळाला आहे. त्यामुळे दि. ३१ मार्चपर्यंत काम करण्यासाठी कालावधी वाढवून मिळावा. नाहीतर आम्ही पक्षाचा व पदाचाही राजीनामा देतो,’ असा इशारा त्यांनी पत्राद्वारे पक्षाला दिला होता. मात्र, पक्षाने कोणाचेच लाड न करण्याचे ठरविले होते. पदाधिकाऱ्यांच्या या बंडामुळे राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील सर्व आमदारांची बैठक घेऊन निर्णय होणार, असेही सांगण्यात आले. आता या घटनेला दहा दिवस होऊन गेले आहेत. तरीही कोणतीही बैठक झालेली नाही. त्यामुळे राष्ट्रवादीची नरमाई व खामोशीची भूमिका स्पष्टपणे दिसून येऊ लागली आहे. त्यातच खासदार उदयनराजे भोसले हे आक्रमक होत चालले आहेत. त्यातच जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रवी साळुंखे यांनी उदयनराजेंच्या आदेशाशिवाय राजीनामा देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. साळुंखे यांच्यावर अविश्वासाचा ठराव आणण्याबाबतही खलबते झाली. पण खासदार उदयनराजे यांचा आक्रमकपणा वेगळेच सांगून जाऊ लागला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेतील सर्वच पदाधिकाऱ्यांचे नक्की होणार तरी काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच राष्ट्रवादीची खामोशीही बरेच काही सांगून जात आहे. यावर आता तोडगा कोण व कसा काढणार, हा प्रश्न आहे. (प्रतिनिधी) जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षांनी अद्याप राजीनामा दिलेला नाही. येत्या दोन-तीन दिवसांत राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील सर्व आमदारांची साताऱ्यात बैठक होईल. त्यामध्ये चर्चा करून काय ते ठरविण्यात येईल. - सुनील माने, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस