शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

चाय पे चर्चा.. अन् दुधात माशी!

By admin | Updated: February 1, 2016 01:05 IST

जिल्हा परिषद बंड : उदयनराजेंच्या भूमिकेमुळे राष्ट्रवादीची कोंडी

सातारा : आजपर्यंत आक्रमक पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हा परिषदेतील पदाधिकाऱ्यांच्या बाबतीत भलतीच कोंडी झाली आहे. ‘शरद पवार यांच्याशी बोलल्यानंतरच रवी साळुंखेंच्या राजीनाम्याचा निर्णय घेऊ,’ अशी स्पष्ट भूमिका खासदार उदयनराजेंनी घेतल्यामुळे त्यांची ‘चाय पे चर्चा’ होणार कधी अन् आपली ‘दुधात पडलेली माशी’ बाहेर काढणार कधी, असा यक्षप्रश्न पक्षापुढे पडला आहे. पुढील वर्षी जानेवारी महिन्यात जिल्हा परिषदेची निवडणूक होत असून, त्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी बदलांचे वारे वाहू लागले आहेत. गेल्या दोन-तीन महिन्यांपासूनच पदाधिकाऱ्यांनी राजीनामा द्यावा, यासाठी अनेक इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून तयार होते. त्याला मुहूर्त मिळाला तो जानेवारी महिन्यात. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगूनही अध्यक्ष माणिकराव सोनवलकर सोडून इतरांनी राजीनामा दिला नव्हता. उलट उपाध्यक्षांसह पाचजणांनी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकविला. ‘आम्हाला काम करण्यासाठी कमी कालावधी मिळाला आहे. त्यामुळे दि. ३१ मार्चपर्यंत काम करण्यासाठी कालावधी वाढवून मिळावा. नाहीतर आम्ही पक्षाचा व पदाचाही राजीनामा देतो,’ असा इशारा त्यांनी पत्राद्वारे पक्षाला दिला होता. मात्र, पक्षाने कोणाचेच लाड न करण्याचे ठरविले होते. पदाधिकाऱ्यांच्या या बंडामुळे राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील सर्व आमदारांची बैठक घेऊन निर्णय होणार, असेही सांगण्यात आले. आता या घटनेला दहा दिवस होऊन गेले आहेत. तरीही कोणतीही बैठक झालेली नाही. त्यामुळे राष्ट्रवादीची नरमाई व खामोशीची भूमिका स्पष्टपणे दिसून येऊ लागली आहे. त्यातच खासदार उदयनराजे भोसले हे आक्रमक होत चालले आहेत. त्यातच जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रवी साळुंखे यांनी उदयनराजेंच्या आदेशाशिवाय राजीनामा देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. साळुंखे यांच्यावर अविश्वासाचा ठराव आणण्याबाबतही खलबते झाली. पण खासदार उदयनराजे यांचा आक्रमकपणा वेगळेच सांगून जाऊ लागला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेतील सर्वच पदाधिकाऱ्यांचे नक्की होणार तरी काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच राष्ट्रवादीची खामोशीही बरेच काही सांगून जात आहे. यावर आता तोडगा कोण व कसा काढणार, हा प्रश्न आहे. (प्रतिनिधी) जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षांनी अद्याप राजीनामा दिलेला नाही. येत्या दोन-तीन दिवसांत राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील सर्व आमदारांची साताऱ्यात बैठक होईल. त्यामध्ये चर्चा करून काय ते ठरविण्यात येईल. - सुनील माने, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस