शहरं
Join us  
Trending Stories
1
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
2
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
3
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
4
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
5
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
6
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
7
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
8
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
9
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
10
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
11
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
12
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
13
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
14
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
15
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
16
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
17
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
18
लेख: तोटा सोसून बँकेच्या बचत खात्यात लोकांनी पैसे का ठेवावे?
19
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
20
India vs England: जिथे कमी तिथे केएल राहुल!

पुरेसे पर्जन्यमान झाल्याने जिल्ह्यातील टँकर बंद...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:26 IST

सातारा : जिल्ह्यात पुरेसे पर्जन्यमान झाल्याने सर्व तालुक्यांतील टँकर बंद करण्यात आले आहेत. तर यावर्षी जिल्ह्यात टंचाईची स्थिती एकदम ...

सातारा : जिल्ह्यात पुरेसे पर्जन्यमान झाल्याने सर्व तालुक्यांतील टँकर बंद करण्यात आले आहेत. तर यावर्षी जिल्ह्यात टंचाईची स्थिती एकदम कमी राहिली आहे.

जिल्ह्यात तीन-चार वर्षांतून दुष्काळ पडतो. त्यातच पाऊस झाला तरी माण, खटाव, फलटणसारख्या तालुक्यांत डिसेंबरनंतर टँकर सुरू करायला लागायचे. पण, गेल्या काही वर्षांत हे चित्र बदलले आहे. याला कारण म्हणजे जलसंधारणाची कामे. त्याचबरोबर वॉटर कप स्पर्धेमुळे तर पाणी साठवण्याचे तुफान आलेले. यामुळे माण, खटाव आणि कोरेगाव तालुक्यात जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात झालेली. परिणामी पावसाचे पडलेले पाणी अडून राहिले व त्याचा फायदाही झाला. परिणामी जिल्ह्यातील टंचाईही कमी झाली.

जिल्ह्यात यावर्षी ऐन उन्हाळ्यात १३८ गावांना टंचाई भासण्याचा अंदाज होता. त्यासाठी ४६ टँकर लागणार होते. तर अडीच कोटींचा खर्च अपेक्षित होता. असे असले तरी यंदा टंचाई कमी जाणवली. यावर्षी मार्च महिन्यात जिल्ह्यात पहिला टँकर सुरू झाला. वाई, माण, पाटण आणि कऱ्हाड या तालुक्यात सुरुवातीला टँकर सुरू झाले. त्यानंतर काही तालुक्यांत सुरुवात झाली. यावर अनेक गावचे ग्रामस्थ तसेच पशुधनही अवलंबून होते.

जून महिन्याच्या उत्तरार्धात १२ गावे आणि १४ वाड्यांसाठी ७ टँकर सुरू होते. या टँकरवर ९ हजार नागरिक आणि १७८० पशुधन अवलंबून होते. मात्र, त्यानंतर पुरेसे पर्जन्यमान झाल्याने मागील आठवड्यापासून जिल्ह्यातील टँकर बंद करण्यात आले आहेत. यामुळे टंचाईवरील खर्च वाचला आहे.

चौकट :

विहिरींचे अधिग्रहण...

जिल्ह्यात पाऊस झाल्याच्या कारणामुळे टँकर बंद झाले आहेत. असे असले तरी वाई आणि खटाव तालुक्यात विहीर अधिग्रहण सुरू आहे. अधिग्रहण केलेल्या विहिरींच्या माध्यमातून ग्रामस्थांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

..........................................................