शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

पुरेसे पर्जन्यमान झाल्याने जिल्ह्यातील टँकर बंद...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:26 IST

सातारा : जिल्ह्यात पुरेसे पर्जन्यमान झाल्याने सर्व तालुक्यांतील टँकर बंद करण्यात आले आहेत. तर यावर्षी जिल्ह्यात टंचाईची स्थिती एकदम ...

सातारा : जिल्ह्यात पुरेसे पर्जन्यमान झाल्याने सर्व तालुक्यांतील टँकर बंद करण्यात आले आहेत. तर यावर्षी जिल्ह्यात टंचाईची स्थिती एकदम कमी राहिली आहे.

जिल्ह्यात तीन-चार वर्षांतून दुष्काळ पडतो. त्यातच पाऊस झाला तरी माण, खटाव, फलटणसारख्या तालुक्यांत डिसेंबरनंतर टँकर सुरू करायला लागायचे. पण, गेल्या काही वर्षांत हे चित्र बदलले आहे. याला कारण म्हणजे जलसंधारणाची कामे. त्याचबरोबर वॉटर कप स्पर्धेमुळे तर पाणी साठवण्याचे तुफान आलेले. यामुळे माण, खटाव आणि कोरेगाव तालुक्यात जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात झालेली. परिणामी पावसाचे पडलेले पाणी अडून राहिले व त्याचा फायदाही झाला. परिणामी जिल्ह्यातील टंचाईही कमी झाली.

जिल्ह्यात यावर्षी ऐन उन्हाळ्यात १३८ गावांना टंचाई भासण्याचा अंदाज होता. त्यासाठी ४६ टँकर लागणार होते. तर अडीच कोटींचा खर्च अपेक्षित होता. असे असले तरी यंदा टंचाई कमी जाणवली. यावर्षी मार्च महिन्यात जिल्ह्यात पहिला टँकर सुरू झाला. वाई, माण, पाटण आणि कऱ्हाड या तालुक्यात सुरुवातीला टँकर सुरू झाले. त्यानंतर काही तालुक्यांत सुरुवात झाली. यावर अनेक गावचे ग्रामस्थ तसेच पशुधनही अवलंबून होते.

जून महिन्याच्या उत्तरार्धात १२ गावे आणि १४ वाड्यांसाठी ७ टँकर सुरू होते. या टँकरवर ९ हजार नागरिक आणि १७८० पशुधन अवलंबून होते. मात्र, त्यानंतर पुरेसे पर्जन्यमान झाल्याने मागील आठवड्यापासून जिल्ह्यातील टँकर बंद करण्यात आले आहेत. यामुळे टंचाईवरील खर्च वाचला आहे.

चौकट :

विहिरींचे अधिग्रहण...

जिल्ह्यात पाऊस झाल्याच्या कारणामुळे टँकर बंद झाले आहेत. असे असले तरी वाई आणि खटाव तालुक्यात विहीर अधिग्रहण सुरू आहे. अधिग्रहण केलेल्या विहिरींच्या माध्यमातून ग्रामस्थांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

..........................................................