शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
2
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
3
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
4
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
5
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
6
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
7
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
8
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
9
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
10
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
11
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
12
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
13
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
14
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
15
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
16
केस कलर करण्याची हौस बेतली जीवावर; तरुणीसोबत घडलं भयंकर, अवस्था पाहून बसेल धक्का
17
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
18
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
19
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा

पुरेसे पर्जन्यमान झाल्याने जिल्ह्यातील टँकर बंद...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:26 IST

सातारा : जिल्ह्यात पुरेसे पर्जन्यमान झाल्याने सर्व तालुक्यांतील टँकर बंद करण्यात आले आहेत. तर यावर्षी जिल्ह्यात टंचाईची स्थिती एकदम ...

सातारा : जिल्ह्यात पुरेसे पर्जन्यमान झाल्याने सर्व तालुक्यांतील टँकर बंद करण्यात आले आहेत. तर यावर्षी जिल्ह्यात टंचाईची स्थिती एकदम कमी राहिली आहे.

जिल्ह्यात तीन-चार वर्षांतून दुष्काळ पडतो. त्यातच पाऊस झाला तरी माण, खटाव, फलटणसारख्या तालुक्यांत डिसेंबरनंतर टँकर सुरू करायला लागायचे. पण, गेल्या काही वर्षांत हे चित्र बदलले आहे. याला कारण म्हणजे जलसंधारणाची कामे. त्याचबरोबर वॉटर कप स्पर्धेमुळे तर पाणी साठवण्याचे तुफान आलेले. यामुळे माण, खटाव आणि कोरेगाव तालुक्यात जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात झालेली. परिणामी पावसाचे पडलेले पाणी अडून राहिले व त्याचा फायदाही झाला. परिणामी जिल्ह्यातील टंचाईही कमी झाली.

जिल्ह्यात यावर्षी ऐन उन्हाळ्यात १३८ गावांना टंचाई भासण्याचा अंदाज होता. त्यासाठी ४६ टँकर लागणार होते. तर अडीच कोटींचा खर्च अपेक्षित होता. असे असले तरी यंदा टंचाई कमी जाणवली. यावर्षी मार्च महिन्यात जिल्ह्यात पहिला टँकर सुरू झाला. वाई, माण, पाटण आणि कऱ्हाड या तालुक्यात सुरुवातीला टँकर सुरू झाले. त्यानंतर काही तालुक्यांत सुरुवात झाली. यावर अनेक गावचे ग्रामस्थ तसेच पशुधनही अवलंबून होते.

जून महिन्याच्या उत्तरार्धात १२ गावे आणि १४ वाड्यांसाठी ७ टँकर सुरू होते. या टँकरवर ९ हजार नागरिक आणि १७८० पशुधन अवलंबून होते. मात्र, त्यानंतर पुरेसे पर्जन्यमान झाल्याने मागील आठवड्यापासून जिल्ह्यातील टँकर बंद करण्यात आले आहेत. यामुळे टंचाईवरील खर्च वाचला आहे.

चौकट :

विहिरींचे अधिग्रहण...

जिल्ह्यात पाऊस झाल्याच्या कारणामुळे टँकर बंद झाले आहेत. असे असले तरी वाई आणि खटाव तालुक्यात विहीर अधिग्रहण सुरू आहे. अधिग्रहण केलेल्या विहिरींच्या माध्यमातून ग्रामस्थांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

..........................................................