शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

कोरोनामुक्त होण्यासाठी कडक उपाययोजना करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:38 IST

खंडाळा : ‘लोकप्रतिनिधींनी निवडणुकीसारखे काम कोरोनाकाळात गावात करणे गरजेचे असून, गावात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण असताना नियम ...

खंडाळा : ‘लोकप्रतिनिधींनी निवडणुकीसारखे काम कोरोनाकाळात गावात करणे गरजेचे असून, गावात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण असताना नियम पाळा हे सांगायला लागणे लाजीरवाणे आहे. गावातील सर्वांनी शासकीय नियम पाळून गावकऱ्यांनी गाव कोरोनामुक्त करण्यासाठी कडक उपाययोजना कराव्यात,’ असे प्रतिपादन खंडाळ्याचे तहसीलदार दशरथ काळे यांनी केले.

अंदोरी (ता. खंडाळा) गावात आजवर एकूण ७३ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, त्यापैकी ४५ रुग्ण बरे झाले आहेत तर २७ रुग्ण ॲक्टिव्ह असून, २ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे गावामध्ये तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद सदस्य यांनी गावात बैठक घेऊन ग्रामस्थ व आपत्ती व्यवस्थापन समितीस मार्गदर्शन केले, यावेळी ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य दीपाली साळुंखे, गटविकास अधिकारी माणिकराव बिचुकले, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश पाटील, सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, डॉ. प्रशांत बागडे, सरपंच प्रदीप होळकर, उपसरपंच छाया हाडंबर, श्यामराव धायगुडे, नानासो ननावरे, डॉ. नानासो हाडंबर, दत्तात्रय धायगुडे, संजय जाधव, सदस्य किसन ननावरे, बाळासो होवाळ, संध्या खुंटे, नर्मदा कोकरे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. अविनाश पाटील म्हणाले, ‘‘गावात कोरोनाला रोखण्यासाठी कडक उपाययोजना करून मास्क न वापरणाऱ्यांवर कडक कारवाई करणे गरजेचे आहे, सर्व गाव कंटेन्मेट झोन करून त्याचे पालन करा, त्रास होणाऱ्या प्रत्येक ग्रामस्थाने तपासणी करून घ्या.’’

यावेळी दीपाली साळुंखे म्हणाल्या, ‘‘कोरोनाला हद्दपार करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे असून, सर्वांनी शासनाच्या नियमाचे काटेकोर पालन करून प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे, तसेच ४५ वर्षांवरील सर्व ग्रामस्थांनी लस घ्यावी.’’

१६खंडाळा

फोटो : अंदोरी(ता. खंडाळा) येथे कोरोनाबाबत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये उपस्थिताना तहसीलदार दशरथ काळे यांनी मार्गदर्शन केले.