शहरं
Join us  
Trending Stories
1
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
2
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
3
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
4
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
5
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
6
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
7
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
8
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
9
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
10
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
11
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
12
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
13
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
14
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
15
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
16
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
17
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
18
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
19
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
20
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)

शिक्षण विभाग राज्यात नावारुपाला आणा

By admin | Updated: September 5, 2014 23:21 IST

शशिकांत शिंदे : जिल्हा परिषदेच्या वतीने १२ शिक्षकांना पुरस्कार

सातारा : अलीकडील काळात स्पर्धा वाढली आहे, आव्हाने उभी आहेत. अशावेळी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील शाळा टिकणार का हा प्रश्न निर्माण झाला आहे. या आव्हानांच्या स्पर्धेत सातारा जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग राज्यात एक आदर्श म्हणून नावारुपाला आणावा, असे आवाहन पालकमंत्री शशिकांत शिंदे यांनी केले. येथील सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षा अरुणादेवी पिसाळ होत्या. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, शिक्षण समिती सभापती संजय देसाई, कृषी सभापती किरण साबळे-पाटील, समाजकल्याण सभापती आनंदराव शेळके-पाटील, महिला व बालकल्याण सभापती नीलम पाटील-पार्लेकर, माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी संगिता भागवत, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे, उपशिक्षणाधिकारी तानाजी नरळे आदी उपस्थित होते. दरम्यान, यावेळी जिल्हा परिषदेच्या वतीने १२ जणांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. पालकमंत्री शिंदे म्हणाले, गुरुचे स्थान हे मात्या-पित्याबरोबर आहे. आज संस्कृती बदलत असतानाही गुरूला पूर्वीऐवढेच महत्व आहे. स्पर्धेच्या या युगात इंग्रजी शाळा वाढू लागल्या आहेत. त्या तुलनेत जिल्हा परिषदेच्या शाळेतील पटसंख्या टिकविणे अवघड झाले आहे. त्यातच भांडवलदारांचे ग्रामीण भागातील शिक्षणाकडे लक्ष गेले नाही, हे आपले सुदैव आहे. जिल्हा परिषद शाळांतील पटसंख्या का कमी झाली याची दुरूस्ती करण्याची गरज आहे. सातारा जिल्हा परिषदेने पुढाकार घेऊन विद्यार्थींच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करावेत, असे सांगून पालकमंत्री शिंदे म्हणाले, सत्ता व पदापेक्षा आपण काहीतरी वेगळे करून दाखविणे महत्वाचे असते. त्यादृष्टीने आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांनी यापुढेही गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडविण्याचे काम करावे.शिक्षण सभापती देसाई म्हणाले, आपण केलेल्या कामाचा आदर्श सर्वांसमोर यावा म्हणून आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात येत असतो. आता मिळालेल्या पुरस्कारामुळे शिक्षकांची आणखी जबाबदारी वाढलेली आहे. शिक्षणात सध्या अनेक आव्हाने येऊ लागली आहेत. ती पेलण्याची ताकद विद्यार्थ्यात निर्माण करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी शिक्षकांनी देशाचा भावी आधारस्तंभ असणाऱ्या युवा पीढीला बळकट करण्याची गरज आहे.उपाध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी शिक्षणातून गुणवान विद्यार्थी घडवा. त्याचबरोबर त्यांना चांगला नागरिकही बनवावे, असे आवाहन केले.यावेळी कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव शिंदे, सुभाष नरळे, संदीप शिंदे, अमित कदम, माण पंचायत समितीचे सभापती श्रीराम पाटील, अ‍ॅड. भास्करराव गुंडगे, तसेच शिक्षण क्षेत्रातील विविध मान्यवर, जिल्हा परिषदेतील अधिकारी आणि कर्मचारी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)पुरस्कारप्राप्त शिक्षकांची नावे...सुनीता देवकर, अंकुश सपकाळ, वैशाली कदम, राहुल हावरे, दत्तात्रय महांगरे, संजय जाधव, सुरज तुपे, धनंजय कुलकर्णी, श्रीरंग जाधव, संजय नांगरे, जयसिंग कदम आणि सचिन यादव.