शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अटल भूजल योजनेचा लाभ घ्या : मल्लिनाथ कलशेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:39 IST

दहीवडी : ‘संपूर्ण गावाला पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करू शकणाऱ्या अटल भूजल योजनेचा लाभ घ्या’, असे आवाहन भूजल सर्वेक्षण आणि ...

दहीवडी : ‘संपूर्ण गावाला पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करू शकणाऱ्या अटल भूजल योजनेचा लाभ घ्या’, असे आवाहन भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा महाराष्ट्राचे संचालक मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले.

अटल भूजल योजनेत माणमधील ३२ ग्रामपंचायतींचा (३८ महसुली गावे) समावेश करण्यात आला आहे. या गावांमधील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व सदस्य यांची बैठक माण पंचायत समितीच्या बचत भवन सभागृहात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी उपसंचालक पुणे मिलिंद देशपांडे, वरिष्ठ भूवैज्ञानिक टोणपे, गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील, नामदेव ननावरे, आबा लाड, कनिष्ठ भूवैज्ञानिक गडकरी, संजय साबळे, स्वप्निल अंबुरे आदी मान्यवर उपस्थित होते.

कलशेट्टी म्हणाले, ‘संपूर्ण गावाची भूजलची पातळी वाढवावी म्हणून या योजनेची निर्मिती करण्यात आली आहे.

भूजल पातळी मोजणे, त्याचा अभ्यास करून भूजल पातळीतील घट-वाढ याचा आलेख दर्शनी भागावर लावणे. जलसुरक्षा आराखडा लोकसहभागातून तयार करणे. जलाशय शोधणे, पाणी पातळी मोजणे, पाण्याचा ताळेबंद, जलसुरक्षा आराखडा तयार करणे ही कामे संबंधित ग्रामपंचायतींनी करायची आहेत. पाणी पातळी वाढविण्यासाठी आवश्यक ते जलसंधारणाचे उपचार करणे. उपलब्ध पाण्याचा काळजीपूर्वक वापर करणे हे अतिशय महत्त्वाचे आहे.’

नामदेव ननावरे म्हणाले, ‘संपूर्ण गावाचे सर्वेक्षण करून गावाला शाश्वत पाणी मिळावे, ही यातील मुख्य भूमिका आहे. आबा लाड म्हणाले, ‘ग्रामस्थांनी प्रशासनाला सोबत घेऊन ही योजना आपल्या गावात प्रभावीपणे राबवावी.

गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील यांनी प्रस्तावना केली. या योजनेत प्रशासन पूर्ण क्षमतेने ग्रामस्थांच्या सोबत असेल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

१७दहीवडी

फोटो : दहीवडी येथे अटल भूजल योजनेबाबत मल्लिनाथ कलशेट्टी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मान्यवर अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.