शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
5
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
6
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
7
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
8
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
9
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
10
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
11
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
12
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
13
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
14
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
15
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
16
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
17
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
18
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
19
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
20
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी

कऱ्हाडकर म्हणे.. नियम पाळून कारवाई करा!

By admin | Updated: February 11, 2016 00:36 IST

अतिक्रमणाबाबत आज निकाल : पालिका आणि हातगाडा संघटनेचा न्यायालयीन लढा; पालिकेने कारवाई थांबवली

कऱ्हाड : सर्वसोयी सुविधांनियुक्त असलेल्या कऱ्हाड शहरात रस्त्याकडेला अनधिकृतपणे लावण्यात आलेल्या अतिक्रमणावर पालिकेकडून गेल्या आठ दिवसांपासून कारवाई केली. पालिकेकडून व्यावसायिकांचे अगोदर पुनर्वसन केले असते तर योग्य झाले असते. बेधडकपणे न्यायालयाच्या नियमांचे पालन न करता कारवाई केल्याने शहरातील हातगाडा संघटना न्यायालयात गेली. पालिकेने शहरातील अतिक्रमणे काढल्यानंतर पुन्हा एकदा शहराने मोकळा श्वास घेतला. मात्र, यामध्ये एकीकडे व्यावसायिकांचे नुकसान झाले आहे तर दुसरीकडे अतिक्रमणाची कारवाई ही योग्य असल्याचे कऱ्हाडकरांमधून मत व्यक्त केले जात आहे.कऱ्हाड शहरात पालिकेच्या वतीने पहिल्यांदाच एवढी मोठी अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली आहे. पालिकेकडून सुरू करण्यात आलेल्या कारवाईमुळे पुन्हा एकदा शहरातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला. शहरातील रस्त्याकडेला असलेल्या फूटपाथवरून नागरिकांना देखील आता चालण्यासाठी जागा उपलब्ध झाली असल्याने याबाबत नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे. तर दुसरीकडे संघटना अतिक्रमण हटाव मोहिमेविरोधात आक्रमक झाली आहे. पालिकेकडून यापूर्वी करण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेवेळी स्वत: संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनीही सहकार्य केले होते. मात्र, यावेळी करण्यात आलेली कारवाई ही नियमांच्या विरोधात असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. शहरातील प्रत्येक चांगल्या गोष्टीमध्ये सहभागी होत असल्याचे व्यावसायिकांकडून सांगितले जाते. मग ती स्वच्छता मोहीम असो अथवा उत्सव, उपक्रम. यामध्ये शहरातील हातगाडाधारक व लोक शहरातील एक जबाबदार नागरिक म्हणून सहभागी होतात. मात्र, यावेळच्या कारवाईबाबत व्यावसायिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.पालिकेच्या वतीने वीस कर्मचारी, तीन अभियंते, दोन ट्रॅक्टर, आरोग्य निरीक्षक तसेच जेसाबी, एक डंपर यांच्या साह्याने आतापर्यंत तीन झोपड्या, चाळीसहून अधिक खोकी तसेच वीसहून अधिक हातगाडे, अनधिकृतपणे लावण्यात आलेले फलक काढण्यात आले. त्यामध्ये व्यावसायिकांसह काही कुटुंबाचे नुकसानही झाले. याविरोधात सुरक्षा दल, भीमशक्ती संघटना तसेच झोपडपट्टी सुरक्षा संघटना, चारचाकी हातगाडाधारक संघटनेकडून पालिकेविरोधात मोर्चा, आंदोलनही काढण्यात आला. त्यास शहरातील व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. मात्र, दुसरीकडे याच व्यावसायिकांमुळे फूटपाथ, रस्त्याकडेला अतिक्रमण केले जात असल्याने नागरिकांनाही मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता. त्यातून पालिकेने शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबवावी, अशी नागरिकांकडूनही मागणी केली जात आहेत. सध्या करण्यात आलेली कारवाई ही योग्य असल्याचे नागरिकांतून सांगितले जाते.पालिकेच्या वतीने तीन टप्यांत अतिक्रमण कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, हे प्रकरण न्यायालयात गेल्याने पालिकेला ही मोहीम थांबवावी लागली आहे. (प्रतिनिधी)पालिकेने पूर्वी संघटनेला सहकार्य करू असे सांगितले. त्यामुळे सुरुवातीला संघटनेतील व्यावसायिकांनीही पालिकेस सहकार्य करत आपली अतिक्रमणे स्वत:हून काढून घेतली. मात्र, पुन्हा पालिकेने सरसकट सर्वांचीच अतिक्रमणे काढल्याने संघटनेला न्यायालयात जावे लागले. कऱ्हाड शहरातील एक जबाबदार नागरिक म्हणून आम्ही स्वत:ला मानतो. त्याप्रमाणे पालिकेस यापूर्वी अनेकवेळा सहकार्यही केले आहे. मात्र, यावेळी पालिकेने चुकीच्या पद्धतीने ही कारवाई केली.- जावेद नायकवडीतालुकाध्यक्ष, हॉकर्स संघटना, कऱ्हाडकऱ्हाड शहरात पालिकेकडून राबविण्यात आलेली अतिक्रमण हटाव मोहीम ही योग्यच आहे. मात्र दुसरीकडे पालिकेने ही कारवाई करण्यापूर्वी व्यावसायिकांचे पुनर्वसन करणे गरजेचे होते. त्यांचे पुनर्वसन केले असते तर आज व्यावसायिकांचे नुकसान झाले नसते.-सागर बर्गेशहराध्यक्ष, मनसे, कऱ्हाड