शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
2
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
3
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर
4
'रोमान्स' पडला महागात! ४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा
5
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
6
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
7
दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण
8
संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस नकार, राजनाथ सिंहांनी चीन, पाकिस्तानचा तो कुटील डाव पाडला हाणून, अशी आहे Inside story 
9
नौसेनेतील अधिकाऱ्याला पैशांची होती गरज, पाकिस्तानच्या आयएसआय एजंटने संपर्क साधला, देशासोबत गद्दारी केली
10
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
11
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
12
२४ तास नव्हे, अवघ्या 'इतक्या' मिनिटांचा असतो अवकाशातील दिवस! किती वेळा दिसतो सूर्योदय?
13
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
14
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
15
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
16
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
17
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
18
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?
19
७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?

तार्इंच्या प्रवेशावर ‘स्वाभिमानी’गप्प

By admin | Updated: July 27, 2014 23:03 IST

दुसऱ्या हप्त्याची लढाई तीव्र करणार : आॅगस्टमध्ये ठरणार रणनीती

सातारा : माजी आमदार शालिनीताई पाटील यांचा पक्षप्रवेश आणि कोरेगावातून उमेदवारी यावर स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनी थेट बोलणे टाळले. दरम्यान, दुसरा हप्ता पाचशे रुपये मिळावा म्हणून आम्ही तीव्र आंदोलन उभे करणार असून, आॅगस्टमध्ये जिल्ह्यात होणाऱ्या मेळाव्यात पुढील रणनीती स्पष्ट करणार असल्याची माहिती संजय भगत, मनोज घोरपडे यांनी दिली.शालिनीताई पाटील यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश द्यावा आणि कोरेगावातून विधानसभेची उमेदवारी द्यावी, अशी मागणी जरंडेश्वर कारखाना गटाच्या काही कार्यकर्त्यांनी खा. राजू शेट्टी यांच्याकडे केली आहे. त्याचाच संदर्भ देत पत्रकारांनी भगत आणि घोरपडे यांना छेडले असता त्यांनी या विषयावर थेट बोलणे टाळले. स्वाभिमानीचा उमेदवार कोण राहील, याचा निर्णय वरिष्ठ पातळीवरून होणार असला तरी कार्यकर्ते म्हणून या मतदारसंघातून निष्कलंक आणि सहकार वाचविणाऱ्या उमेदवाराच आमचे प्राधान्य राहील, असे सांगण्यासही भगत आणि घोरपडे विसरले नाहीत.दरम्यान, दुसऱ्या हप्त्याची लढाई स्वाभिमानीने आणखी तीव्र करण्याचा निर्धार केला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. भगत म्हणाले, ‘दि. २ आॅगस्ट रोजी कोरेगाव आणि उंब्रज येथे खासदार राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत दुसऱ्या हप्त्याच्या लढाईची अंतिम घोषणा होणार आहे. जरंडेश्वर शेतकऱ्यांच्या मालकीचा व्हावा आणि दुष्काळी भागासाठी आवश्यक असणारे; मात्र रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करावेत, महाराष्ट्रात दुष्काळ निवारण आयोग स्थापन करावा, अशी मागणीही यावेळी करण्यात येणार आहे.’ यावेळी सुर्यकांत भुजबळ, शंकर शिंदे, संजय साबळे, अल्लाउद्दीन इनामदार, हणमंत जगदाळे, संभाजी केंजळे, जीवन शिर्के, उपस्थित होते. (प्रतिनिधी)