शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

सूरज मोहितेंचे स्मारक सरताळेत व्हावे

By admin | Updated: March 30, 2015 00:16 IST

ग्रामस्थांची मागणी : पराक्रमाचा इतिहास जागृत ठेवण्यासाठी प्रयत्न

कुडाळ : जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जावळी तालुक्यातील सरताळे (गणेशवाडी) येथील वीर जवान सूरज मोहिते यांचे यथोचित स्मारक त्यांच्या जन्मगावी सरताळे येथे व्हावे, अशी मागणी सरताळे ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतची लेखी निवेदने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री विजय शिवतारे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी यांना देण्यात आली आहेत. सूरज मोहिते हे देशासाठी धारातीर्थ पडले असून, त्यांच्या अतुलनीय पराक्रमाचा इतिहास सतत जागृत ठेवण्यासाठी जावळी तालुक्यातील सर्वच स्तरातील नागरिकांनी स्मारकाच्या उभारणीसाठी सहकार्य करावे, असे आवाहनही सरताळे ग्रामस्थांनी केले आहे. हुतात्मा मोहिते यांचा जन्म जावळी तालुक्यातील वैराटगडाच्या पायथ्याशी अवघी तीस ते चाळीस घरे व जेमतेम १५० लोकसंख्या असलेल्या गणेशवाडी येथे झाला असून, त्यांचे बालपण गणेशवाडी, सरताळे येथेच झाले आहे. त्यांचे माध्यमिक शिक्षण गगनगिरी माध्यमिक विद्यालय कापसेवाडी येथे झाले आहे. बालपणी ते नित्यनेमाने वैराटगडावर दर्शनाला जात असायचे. गावच्या डोंगरदऱ्यात निसर्गरम्य वातावरणात बागडत असताना शिक्षणाचे धडे गिरवताना मोहिते यांना देशसेवा करण्याची प्रेरणा मिळाली. २० मार्च २०१३ मध्ये ते सैन्यदलात दाखल झाले. नोकरी लागताना मोहिते यांनी जी कागदपत्रे सादर केली ती सुद्धा जावळी तालुक्यातीलच आहेत.गुढीपाडव्याच्या आदल्यादिवशी सूरज माहिते हे हुतात्मा झाले. गावच्या सुपुत्रास अखेरची मानवंदना देण्यासाठी गावातील ग्रामस्थांनी गुडीपाडव्याच्या दिवशी गुड्या न उभारता सणच साजरा केला नाही.सूरज मोहिते यांनी देशासाठी आपल्या प्राणांची परवा न करता आपल्या छातीवर दहशतवाद्यांच्या गोळ््या निडरपणे झेलून आपल्या सहकार्यांचे प्राण वाचवले, म्हणून या भारतमातेच्या थोर सुपुत्रास मरणोत्तर वीर पुरस्कार देऊन सन्मानित करावे, तसेच हुतात्मा सूरज, त्यांची वीरमाता, गणेशवाडी ग्रामस्थांना योग्य न्याय मिळून हीच खरी श्रद्धांजली ठरेल म्हणून त्यांचे यथोचित स्मारक त्यांच्या जन्मगावी व्हावे, अशी मागणी गणेशवाडी (सरताळे) ग्रामस्थांनी पत्रकार परिषदेत केली आहे. यावेळी सरताळे येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)सरताळेची यात्रा साधेपणानेसरताळे (गणेशवाडी)च्या ग्रामदैवतांची वार्षिक यात्रा गुरूवार दि. १६ ते १८ एप्रिलला होणार आहे. याही यात्रेत कोणत्याही प्रकारचे मनोरंजनाचे कार्यक्रम न करता केवळ साधेपणाने धार्मिक विधी करून साजरी करणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. आजही सूरज आपल्यात नाही, यावर ग्रामस्थांचा विश्वास बसत नसून ग्रामस्थांचा शोक अजूनही टिकून आहे. सुरज यांच्या आठवणीने आजूनही गावात युवा वर्ग व ग्रामस्थांमध्ये त्यांच्या शौर्याची चर्चा करताना दिसत आहेत.