शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
जर्मनीतील म्युनिक विमानतळावर ड्रोन दिसला, १७ उड्डाणे रद्द; युरोपमध्ये घबराट पसरली
3
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
4
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
5
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
6
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
7
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
8
‘अनैतिकते’मुळे अफगाणमध्ये ब्लॅकआउट! इंटरनेटबंदीमागे तालिबानचा नेमका हेतू काय?
9
तेजीचे दिवस; अर्थव्यवस्थेची मरगळ झटकली, नोकऱ्या आणि गिग कामगारांसाठी 'अच्छे दिन' का?
10
सोने खरेदीची लगीनघाई; दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईतील बाजारात संध्याकाळी तेजी; चांदी फॉर्मात
11
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
12
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
13
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
14
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
15
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
16
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
17
आता पाहा, मित्र-मित्रच एकमेकांना कापताना दिसतील!
18
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
19
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
20
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

सूरज मोहितेंचे स्मारक सरताळेत व्हावे

By admin | Updated: March 30, 2015 00:16 IST

ग्रामस्थांची मागणी : पराक्रमाचा इतिहास जागृत ठेवण्यासाठी प्रयत्न

कुडाळ : जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जावळी तालुक्यातील सरताळे (गणेशवाडी) येथील वीर जवान सूरज मोहिते यांचे यथोचित स्मारक त्यांच्या जन्मगावी सरताळे येथे व्हावे, अशी मागणी सरताळे ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतची लेखी निवेदने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री विजय शिवतारे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी यांना देण्यात आली आहेत. सूरज मोहिते हे देशासाठी धारातीर्थ पडले असून, त्यांच्या अतुलनीय पराक्रमाचा इतिहास सतत जागृत ठेवण्यासाठी जावळी तालुक्यातील सर्वच स्तरातील नागरिकांनी स्मारकाच्या उभारणीसाठी सहकार्य करावे, असे आवाहनही सरताळे ग्रामस्थांनी केले आहे. हुतात्मा मोहिते यांचा जन्म जावळी तालुक्यातील वैराटगडाच्या पायथ्याशी अवघी तीस ते चाळीस घरे व जेमतेम १५० लोकसंख्या असलेल्या गणेशवाडी येथे झाला असून, त्यांचे बालपण गणेशवाडी, सरताळे येथेच झाले आहे. त्यांचे माध्यमिक शिक्षण गगनगिरी माध्यमिक विद्यालय कापसेवाडी येथे झाले आहे. बालपणी ते नित्यनेमाने वैराटगडावर दर्शनाला जात असायचे. गावच्या डोंगरदऱ्यात निसर्गरम्य वातावरणात बागडत असताना शिक्षणाचे धडे गिरवताना मोहिते यांना देशसेवा करण्याची प्रेरणा मिळाली. २० मार्च २०१३ मध्ये ते सैन्यदलात दाखल झाले. नोकरी लागताना मोहिते यांनी जी कागदपत्रे सादर केली ती सुद्धा जावळी तालुक्यातीलच आहेत.गुढीपाडव्याच्या आदल्यादिवशी सूरज माहिते हे हुतात्मा झाले. गावच्या सुपुत्रास अखेरची मानवंदना देण्यासाठी गावातील ग्रामस्थांनी गुडीपाडव्याच्या दिवशी गुड्या न उभारता सणच साजरा केला नाही.सूरज मोहिते यांनी देशासाठी आपल्या प्राणांची परवा न करता आपल्या छातीवर दहशतवाद्यांच्या गोळ््या निडरपणे झेलून आपल्या सहकार्यांचे प्राण वाचवले, म्हणून या भारतमातेच्या थोर सुपुत्रास मरणोत्तर वीर पुरस्कार देऊन सन्मानित करावे, तसेच हुतात्मा सूरज, त्यांची वीरमाता, गणेशवाडी ग्रामस्थांना योग्य न्याय मिळून हीच खरी श्रद्धांजली ठरेल म्हणून त्यांचे यथोचित स्मारक त्यांच्या जन्मगावी व्हावे, अशी मागणी गणेशवाडी (सरताळे) ग्रामस्थांनी पत्रकार परिषदेत केली आहे. यावेळी सरताळे येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)सरताळेची यात्रा साधेपणानेसरताळे (गणेशवाडी)च्या ग्रामदैवतांची वार्षिक यात्रा गुरूवार दि. १६ ते १८ एप्रिलला होणार आहे. याही यात्रेत कोणत्याही प्रकारचे मनोरंजनाचे कार्यक्रम न करता केवळ साधेपणाने धार्मिक विधी करून साजरी करणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. आजही सूरज आपल्यात नाही, यावर ग्रामस्थांचा विश्वास बसत नसून ग्रामस्थांचा शोक अजूनही टिकून आहे. सुरज यांच्या आठवणीने आजूनही गावात युवा वर्ग व ग्रामस्थांमध्ये त्यांच्या शौर्याची चर्चा करताना दिसत आहेत.