शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
2
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
3
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
4
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
5
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
6
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
7
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
8
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
9
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
10
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
11
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
12
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
13
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
14
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
15
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
16
उल्हासनगर महापालिका आयुक्त व आमदारात चर्चा, शहर समस्यांचा वाचला पाडा
17
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
18
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
19
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?
20
पती ५०००० रुपयांचे कर्ज फेडू शकला नाही,पत्नीला विकलं; पण पुढे जे झालं ते ऐकून पोलीसही हैराण 

सूरज मोहितेंचे स्मारक सरताळेत व्हावे

By admin | Updated: March 30, 2015 00:16 IST

ग्रामस्थांची मागणी : पराक्रमाचा इतिहास जागृत ठेवण्यासाठी प्रयत्न

कुडाळ : जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जावळी तालुक्यातील सरताळे (गणेशवाडी) येथील वीर जवान सूरज मोहिते यांचे यथोचित स्मारक त्यांच्या जन्मगावी सरताळे येथे व्हावे, अशी मागणी सरताळे ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतची लेखी निवेदने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री विजय शिवतारे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी यांना देण्यात आली आहेत. सूरज मोहिते हे देशासाठी धारातीर्थ पडले असून, त्यांच्या अतुलनीय पराक्रमाचा इतिहास सतत जागृत ठेवण्यासाठी जावळी तालुक्यातील सर्वच स्तरातील नागरिकांनी स्मारकाच्या उभारणीसाठी सहकार्य करावे, असे आवाहनही सरताळे ग्रामस्थांनी केले आहे. हुतात्मा मोहिते यांचा जन्म जावळी तालुक्यातील वैराटगडाच्या पायथ्याशी अवघी तीस ते चाळीस घरे व जेमतेम १५० लोकसंख्या असलेल्या गणेशवाडी येथे झाला असून, त्यांचे बालपण गणेशवाडी, सरताळे येथेच झाले आहे. त्यांचे माध्यमिक शिक्षण गगनगिरी माध्यमिक विद्यालय कापसेवाडी येथे झाले आहे. बालपणी ते नित्यनेमाने वैराटगडावर दर्शनाला जात असायचे. गावच्या डोंगरदऱ्यात निसर्गरम्य वातावरणात बागडत असताना शिक्षणाचे धडे गिरवताना मोहिते यांना देशसेवा करण्याची प्रेरणा मिळाली. २० मार्च २०१३ मध्ये ते सैन्यदलात दाखल झाले. नोकरी लागताना मोहिते यांनी जी कागदपत्रे सादर केली ती सुद्धा जावळी तालुक्यातीलच आहेत.गुढीपाडव्याच्या आदल्यादिवशी सूरज माहिते हे हुतात्मा झाले. गावच्या सुपुत्रास अखेरची मानवंदना देण्यासाठी गावातील ग्रामस्थांनी गुडीपाडव्याच्या दिवशी गुड्या न उभारता सणच साजरा केला नाही.सूरज मोहिते यांनी देशासाठी आपल्या प्राणांची परवा न करता आपल्या छातीवर दहशतवाद्यांच्या गोळ््या निडरपणे झेलून आपल्या सहकार्यांचे प्राण वाचवले, म्हणून या भारतमातेच्या थोर सुपुत्रास मरणोत्तर वीर पुरस्कार देऊन सन्मानित करावे, तसेच हुतात्मा सूरज, त्यांची वीरमाता, गणेशवाडी ग्रामस्थांना योग्य न्याय मिळून हीच खरी श्रद्धांजली ठरेल म्हणून त्यांचे यथोचित स्मारक त्यांच्या जन्मगावी व्हावे, अशी मागणी गणेशवाडी (सरताळे) ग्रामस्थांनी पत्रकार परिषदेत केली आहे. यावेळी सरताळे येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)सरताळेची यात्रा साधेपणानेसरताळे (गणेशवाडी)च्या ग्रामदैवतांची वार्षिक यात्रा गुरूवार दि. १६ ते १८ एप्रिलला होणार आहे. याही यात्रेत कोणत्याही प्रकारचे मनोरंजनाचे कार्यक्रम न करता केवळ साधेपणाने धार्मिक विधी करून साजरी करणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. आजही सूरज आपल्यात नाही, यावर ग्रामस्थांचा विश्वास बसत नसून ग्रामस्थांचा शोक अजूनही टिकून आहे. सुरज यांच्या आठवणीने आजूनही गावात युवा वर्ग व ग्रामस्थांमध्ये त्यांच्या शौर्याची चर्चा करताना दिसत आहेत.