शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

नोंदणी कार्यालयात सनईचे सूर

By admin | Updated: July 25, 2015 01:13 IST

वाग्दत्तांसाठी वातावरणनिर्र्मिती : पश्चिम महाराष्ट्रात पहिलाच यशस्वी प्रयोग

प्रगती जाधव-पाटील - सातारा -नोंदणी पद्धतीने विवाह करताना विवाह इच्छुकांबरोबरच आलेल्या वऱ्हाडींना टिपिकल शासकीय वातावरणाचा अनुभव येऊ नये, यासाठी साताऱ्यात नामी शक्कल लढविण्यात आली आहे. येथील विवाह नोंदणी कार्यालयात विवाह सुरू असताना मंगल सनई चौघड्यांचा संगीत लावले जाते. त्यामुळे शासकीय कार्यालयाचे वातावरण जाऊन मंगल कार्यालयाचा फिल येतो. असा प्रयोग करणारे सातारा हे पहिले केंद्र ठरले आहे.विवाह हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय प्रसंग असतो. तो सर्वांच्याच स्मृतीत राहावा, यासाठी कुटुंबे प्रयत्न करतात. डामडौल करून लग्न साजरे करण्याच्या प्रथेला फाटा देत काही कुटुंबीय नोंदणी पद्धतीने विवाह करण्याचा मार्ग स्वीकारतात. अशा वऱ्हाडींना विवाह नोंदणी कार्यालय अनेकदा रुक्ष वाटते. आधुनिक विचारसरणीचा अवलंब केलेल्या या कुटुंबीयांना विवाह प्रसंग साजरा केल्यासारखा वाटावा, यासाठी ही सोय करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, जेव्हा लग्नाची नोंदणी सुरू असते, त्यावेळी कार्यालयातील अन्य विभागांचे काम थोड्या वेळासाठी थांबविण्यात येते. विवाह नोंदणी सुरू झाल्यापासून गळ्यात मंगळसूत्र घालेपर्यंत संगणकावर मंद आवाजात चनईसे सूर वाजत असतात. काहीजण जागेच्या नोंदीसाठी आलेले लोकही वऱ्हाडी बनून लग्नात सहभागी होतात. शासकीय कार्यालयाचा बाज सोडून अधिकारी आणि कर्मचारीही वऱ्हाडींपैकी एक होऊन जातात. त्यामुळे लग्न लावताना येथे खूपच मोकळे वातावरण असल्याचे पाहायला मिळते. भविष्यात शहरी भागातील सुशिक्षितांनीही नोंदणी पद्धतीने विवाह करण्यास प्रवृत्त व्हावे, अशी अपेक्षा कार्यालयातून व्यक्त केली जात आहे.दोनशे रुपयांत लग्ननोंदणी पद्धतीने विवाह करण्यासाठी केवळ दोनशे रुपयांचा खर्च येतो. लग्न जिल्ह्यातील व्यक्तींचे होणार असेल तर नोटीसचा खर्च पन्नास रुपये येतो. दोन जिल्ह्याात नोटीस पाठवायच्या असतील तर शंभर रुपये लागतात. विवाहनोंदणी कार्यालयाचे शुल्क १५० रुपये असते. अशा पद्धतीने केवळ दोनशे रुपयांत हे लग्न लागू शकते. कार्यालयाबाहेर जाऊन विवाह नोंदणी करण्यासाठी एक हजार रुपयांचे शुल्क आकारले जाते. ग्रामीण भागातील टक्का मोठा नोंदणी विवाह करण्यासाठी ९९ टक्के लोक हे ग्रामीण भागातून येत असल्याची माहिती पुढे आली आहे. अशिक्षित म्हणून ग्रामीण भागातील लोकांकडे पाहून नाके मुरडणारे फक्त एक टक्का शहरी लोक नोंदणी पद्धतीने विवाह करतात. पारंपरिक पद्धतींना बाजूला सारून आधुनिक विचारसरणीची कास धरलेले सुजाण नागरिक ग्रामीण भागात असल्याचे वास्तव यानिमित्ताने अधोरेखित झाले आहे. शहरी भागातूनही नोंदणी विवाह वाढणे अपेक्षित आहे.