शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
2
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
3
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
4
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
5
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
6
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
7
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
8
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
9
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
10
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
11
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे कंपनीची चांदी! शेअरमध्ये १०% वाढ, ३ महिन्यात ६२ टक्के परतावा
13
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
14
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
15
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
16
गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक चवीचा पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश
17
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
18
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
19
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
20
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...

मानधनातून सुकन्या योजना आळजापूर ग्रामपंचायतीचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:11 IST

आदर्की : स्त्रीभ्रूण हत्या, हुंडाबळी यासारखे मुलींबाबत होणारे प्रकार थांबविण्यासाठी आळजापूर (ता. फलटण) ग्रामपंचायतीने सरपंच, उपसरपंच, सदस्यांना वर्षाकाठी मिळणाऱ्या ...

आदर्की : स्त्रीभ्रूण हत्या, हुंडाबळी यासारखे मुलींबाबत होणारे प्रकार थांबविण्यासाठी आळजापूर (ता. फलटण) ग्रामपंचायतीने सरपंच, उपसरपंच, सदस्यांना वर्षाकाठी मिळणाऱ्या मानधनातून गावात जन्माला येणाऱ्या मुलींच्या नावे पाच हजार रुपयांची अठरा वर्षांची ठेव पावती बनविण्याचा निर्णय घेतला आहे. ही रक्कम त्या मुलीच्या विवाह सोहळ्यावेळी मिळणार असल्याने या अभिनव उपक्रमाबद्दल परिसरातून आळजापूर ग्रामपंचायतीचे कौतुक होत आहे.

आळजापूर (ता. फलटण) ग्रामपंचायतीची निवडणूक होऊन सरपंच, उपसरपंचांची निवड झाली. त्यानंतर ८ मार्च रोजी महिला दिनी मासिक बैठक होऊन गावाच्या विकासासोबतच पायाभूत सुविधांवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांना वर्षाकाठी मिळणारी मानधनाची रक्कम आळजापूर गावाच्या कार्यक्षेत्रात दिनांक ८ मार्च २०२१ ते २८ फेब्रुवारी २०२२पर्यंत जन्माला येणाऱ्या मुलींच्या नावे प्रत्येकी पाच हजार रुपयेप्रमाणे ठेवून अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर मुलीच्या विवाह सोहळ्याला ही रक्कम देण्यासाठी आळजापूर ग्रामपंचायतीने ‘सुकन्या ठेव योजना’ राबविण्याचा एकमुखी निर्णय घेतला आहे.

यावेळी सरपंच दिलीपराव नलवडे, उपसरपंच राजकुंवर नलवडे, शुभम नलवडे, सचिन मसुगडे, सुनील पवार, छाया नलवडे, पुष्पा पवार, गीतांजली नलवडे, उज्ज्वला भंडलकर आदी सदस्य उपस्थित होते.

कोट..

स्त्रीभ्रूण हत्या, हुंडाबळी, मुलींची घटती संख्या, आदी प्रकार वाढत आहेत. मुलगी शिकून मोठी होते; तिच्या विवाहाच्या वेळी असणाऱ्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून आपल्या मानधनातून गावात मुलगी जन्माला आली की, तिच्या नावावर पाच हजार रुपये ठेवण्याचा निर्णय सर्व सदस्यांनी घेतला आहे.

- दिलीप नलवडे, सरपंच, आळजापूर