शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मानधनातून सुकन्या योजना आळजापूर ग्रामपंचायतीचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:11 IST

आदर्की : स्त्रीभ्रूण हत्या, हुंडाबळी यासारखे मुलींबाबत होणारे प्रकार थांबविण्यासाठी आळजापूर (ता. फलटण) ग्रामपंचायतीने सरपंच, उपसरपंच, सदस्यांना वर्षाकाठी मिळणाऱ्या ...

आदर्की : स्त्रीभ्रूण हत्या, हुंडाबळी यासारखे मुलींबाबत होणारे प्रकार थांबविण्यासाठी आळजापूर (ता. फलटण) ग्रामपंचायतीने सरपंच, उपसरपंच, सदस्यांना वर्षाकाठी मिळणाऱ्या मानधनातून गावात जन्माला येणाऱ्या मुलींच्या नावे पाच हजार रुपयांची अठरा वर्षांची ठेव पावती बनविण्याचा निर्णय घेतला आहे. ही रक्कम त्या मुलीच्या विवाह सोहळ्यावेळी मिळणार असल्याने या अभिनव उपक्रमाबद्दल परिसरातून आळजापूर ग्रामपंचायतीचे कौतुक होत आहे.

आळजापूर (ता. फलटण) ग्रामपंचायतीची निवडणूक होऊन सरपंच, उपसरपंचांची निवड झाली. त्यानंतर ८ मार्च रोजी महिला दिनी मासिक बैठक होऊन गावाच्या विकासासोबतच पायाभूत सुविधांवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांना वर्षाकाठी मिळणारी मानधनाची रक्कम आळजापूर गावाच्या कार्यक्षेत्रात दिनांक ८ मार्च २०२१ ते २८ फेब्रुवारी २०२२पर्यंत जन्माला येणाऱ्या मुलींच्या नावे प्रत्येकी पाच हजार रुपयेप्रमाणे ठेवून अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर मुलीच्या विवाह सोहळ्याला ही रक्कम देण्यासाठी आळजापूर ग्रामपंचायतीने ‘सुकन्या ठेव योजना’ राबविण्याचा एकमुखी निर्णय घेतला आहे.

यावेळी सरपंच दिलीपराव नलवडे, उपसरपंच राजकुंवर नलवडे, शुभम नलवडे, सचिन मसुगडे, सुनील पवार, छाया नलवडे, पुष्पा पवार, गीतांजली नलवडे, उज्ज्वला भंडलकर आदी सदस्य उपस्थित होते.

कोट..

स्त्रीभ्रूण हत्या, हुंडाबळी, मुलींची घटती संख्या, आदी प्रकार वाढत आहेत. मुलगी शिकून मोठी होते; तिच्या विवाहाच्या वेळी असणाऱ्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून आपल्या मानधनातून गावात मुलगी जन्माला आली की, तिच्या नावावर पाच हजार रुपये ठेवण्याचा निर्णय सर्व सदस्यांनी घेतला आहे.

- दिलीप नलवडे, सरपंच, आळजापूर