शहरं
Join us  
Trending Stories
1
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
2
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
3
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
4
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
5
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
6
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
7
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
8
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
9
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
10
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
11
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
12
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
13
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
14
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
15
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
16
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
17
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
18
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
19
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
20
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी

प्रेमसंबंधातून युवकाची मुचंडीमध्ये आत्महत्या

By admin | Updated: May 22, 2016 00:32 IST

रावळगुंडवाडीत खळबळ : लग्नाला विरोध

जत : तालुक्यातील रावळगुंडवाडी येथील राघवेंद्र चन्नाप्पा हिरगोंड (वय २०) याने प्रेमसंबंधातून मुचंडी (ता. जत) येथील वन विभागात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी आठच्या दरम्यान घडली. या घटनेमुळे रावळगुंडवाडी गावात खळबळ माजली आहे. राघवेंद्र हिरगोंड शेतमजूर होता. त्याचे मेंढेगिरी येथील एका सतरा वर्षाच्या दहावीत शिक्षण घेत असलेल्या मुलीसोबत मागील दोन वर्षापासून प्रेमसंबंध होते. एक-दोन महिन्यांपासून या प्रेमप्रकरणाची माहिती दोघांच्या घरातील लोकांना झाली होती. त्यांनी या प्रेमप्रकरणाला विरोध केला. त्यानंतरही या प्रेमीयुगुलाने घरात लग्नाचा प्रस्ताव ठेवला. त्यालाही नातेवाईकांनी विरोध केला. त्यामुळे राघवेंद्र नाराज होता. शुक्रवार, दि. २० रोजी सकाळी राघवेंद्रच्या प्रेयसीने जत पोलिस ठाण्यात समक्ष येऊन ‘आपले राघवेंद्रवर प्रेम असून, माझे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर आम्ही दोघे लग्न करणार आहोत’, अशा आशयाचा लेखी अर्ज दिला. याची माहिती तिच्या नातेवाईकांना समजल्यानंतर त्यांनी तिला मारहाण केली. मारहाण केल्याची माहिती तिने राघवेंद्रला मोबाईलवरून सांगितली. त्यानंतर संबंधित मुलीचे नातेवाईक शुक्रवारी सायंकाळपासून राघवेंद्रचा शोध घेत होते. त्यामुळे राघवेंद्र दडपणाखाली होता. शनिवारी सकाळी सातच्यादरम्यान राघवेंद्र घरातून आंघोळ करून बाहेर पडला. त्यानंतर तो मुचंडी येथे वन विभागाच्या जागेत आला. आपण आत्महत्या करणार असल्याची माहिती त्याने स्वत: घरी मोबाईलवरून सांगितली. त्यानंतर झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याचे नातेवाईक तेथे पोहोचेपर्यंत तो मृत झाला होता. याप्रकरणी पोलिस पाटील रोहिदास शिवशरण यांनी जत पोलिसात फिर्याद दिली आहे.