शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

ऊसतोड मजुरांना करावा लागतोय संघर्ष!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:31 IST

कुडाळ : पश्चिम महाराष्ट्रात ऊस उत्पादन अधिक असल्याने साखर कारखान्याची संख्याही जास्त आहे. कारखान्यांना लागणारा कच्चा माल शेतकऱ्यांच्या शेतातून ...

कुडाळ : पश्चिम महाराष्ट्रात ऊस उत्पादन अधिक असल्याने साखर कारखान्याची संख्याही जास्त आहे. कारखान्यांना लागणारा कच्चा माल शेतकऱ्यांच्या शेतातून कारखान्यांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी पेलणारा ऊसतोड मजूर मात्र वर्षानुवर्षे संघर्षमय जीवन जगत आहे. त्यांच्या जीवनसंघर्षाला पूर्णविराम मिळून त्यांच्या व्यथा कोण जाणणार. अजूनही जगण्यासाठी अशीच परवड होत राहणार, अशी वेदनायी व्यथा त्यांच्याकडून व्यक्त होत आहे.

निसर्गाची नेहमीच अवकृपा होत असलेल्या बीड, उस्मानाबाद, नगर, लातूर आदी जिल्ह्यांतून हे मजूर कुटुंबासह ऊसतोडणीसाठी येत असतात. कारखान्यांचा आवारात अथवा ज्या भागात ऊसतोडणी सुरू आहे, अशा ठिकाणी आपली झोपडी उभारून तात्पुरता संसार थाटतात. ऊसतोडणीसाठी भल्या पहाटेपासून ते रात्री उशिरापर्यंत यांचे काम सुरू असते. कुटुंबातील महिलावर्गाची त्यात मोठी साथ मिळते. उसाच्या फडात वाडे बांधणीचे काम त्या करत असतात. लहान लेकरांना बरोबर घेऊन शेतातच बांधावर साडीच्या छोट्याशा पाळणात त्यांचा सांभाळ होत राहतो. या वेदनादायी संघर्षमय परिस्थितीतच त्याचा दिवस व्यथित होत असतो. त्यांच्या लेकरांना ऊन, वारा, विंचवा काट्याचे भय त्यांना कधी वाटतच नाही. उसाच्या फडातच ती लहानाची मोठी होतात. कडाक्याच्या थंडीतही भल्या पहाटे यांचा दिवस सुरू होतो. कोयत्याची पाती हातात घेऊन फडात साऱ्यांची लगीनघाई सुरू होते. आर्थिक परिस्थितीअभावी आगामी उचल अगोदरच घेऊन यांचा उदरनिर्वाह चालत असतो. वर्षातील काही दिवस गावी तर काही दिवस कारखान्यावर जात असल्याने मुलांच्या शिक्षणाची मात्र यामध्ये अपरिमित हानी होते. आपल्या वस्तीवर ही मुले एकटीच बागडत असतात. अशातच कारखान्यावर सुरू असणाऱ्या साखरशाळाही आता शासनाने बंद केल्या आहेत.

कोरोनाच्या भयावह परिस्थितीतही पोटाची खळगी भरण्यासाठी हा ऊसतोड मजूरवर्ग ऊसतोडणीसाठी झटत आहे. कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस तोडून बैलगाडी किंवा ट्रॅक्टरमध्ये भरायचा आणि कारखान्यांपर्यत पोचवायचा. यामध्ये त्यांची सुरक्षा मात्र रामभरोसेच असते. गेली कित्येक वर्षे त्यांचा जीवनप्रवास असाच सुरू आहे. जगण्यासाठीचा त्यांचा संघर्ष कधी संपणार, त्याच्या व्यथांवर फुंकर कोण घालणार, हा प्रश्नच आजही तसाच अनुत्तरित आहे.

चौकट :

शासनाने ठोस पावले उचलणे गरजेचे...

ऊसतोड कामगारांच्या व्यथा समजावून घेऊन यावर कायमस्वरूपी उपाययोजना होणे आवश्यक आहे. शासन आणि कारखान्यांनी त्यांच्या कुटुंब, मुलांच्या शिक्षणासाठी ठोस पावले उचलली पाहिजेत. याकरिता नियोजनपूर्वक कार्यक्रम राबविला पाहिजे.

कोट :

आमचा भाग दुष्काळी असल्याने पाण्याअभावी शेती फारशी पिकत नाही. यामुळे उदरनिर्वाहासाठी ऊसतोडणी करावी लागत आहे. दसऱ्यापासूनच आम्ही या भागात आलो आहे. कारखाना सुरू होईपर्यंत मिळेल ते काम करून कुटुंब चालविले आहे. कोरोनामुळे मुलेही आमच्याबरोबच आहेत. आमचा हा संसार असाच उघड्यावर मांडलेला आहे.

-शिवाजी माने, ऊसतोडणी कामगार

०३कुडाळ

फोटो : जावळी तालुक्यात ऊसतोडणी कामगार आभाळाच्या छताखाली आपला संसार मांडून आहेत. (छाया : विशाल जमदाडे)