शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

ऊसतोड मजुरांना करावा लागतोय संघर्ष!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:31 IST

कुडाळ : पश्चिम महाराष्ट्रात ऊस उत्पादन अधिक असल्याने साखर कारखान्याची संख्याही जास्त आहे. कारखान्यांना लागणारा कच्चा माल शेतकऱ्यांच्या शेतातून ...

कुडाळ : पश्चिम महाराष्ट्रात ऊस उत्पादन अधिक असल्याने साखर कारखान्याची संख्याही जास्त आहे. कारखान्यांना लागणारा कच्चा माल शेतकऱ्यांच्या शेतातून कारखान्यांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी पेलणारा ऊसतोड मजूर मात्र वर्षानुवर्षे संघर्षमय जीवन जगत आहे. त्यांच्या जीवनसंघर्षाला पूर्णविराम मिळून त्यांच्या व्यथा कोण जाणणार. अजूनही जगण्यासाठी अशीच परवड होत राहणार, अशी वेदनायी व्यथा त्यांच्याकडून व्यक्त होत आहे.

निसर्गाची नेहमीच अवकृपा होत असलेल्या बीड, उस्मानाबाद, नगर, लातूर आदी जिल्ह्यांतून हे मजूर कुटुंबासह ऊसतोडणीसाठी येत असतात. कारखान्यांचा आवारात अथवा ज्या भागात ऊसतोडणी सुरू आहे, अशा ठिकाणी आपली झोपडी उभारून तात्पुरता संसार थाटतात. ऊसतोडणीसाठी भल्या पहाटेपासून ते रात्री उशिरापर्यंत यांचे काम सुरू असते. कुटुंबातील महिलावर्गाची त्यात मोठी साथ मिळते. उसाच्या फडात वाडे बांधणीचे काम त्या करत असतात. लहान लेकरांना बरोबर घेऊन शेतातच बांधावर साडीच्या छोट्याशा पाळणात त्यांचा सांभाळ होत राहतो. या वेदनादायी संघर्षमय परिस्थितीतच त्याचा दिवस व्यथित होत असतो. त्यांच्या लेकरांना ऊन, वारा, विंचवा काट्याचे भय त्यांना कधी वाटतच नाही. उसाच्या फडातच ती लहानाची मोठी होतात. कडाक्याच्या थंडीतही भल्या पहाटे यांचा दिवस सुरू होतो. कोयत्याची पाती हातात घेऊन फडात साऱ्यांची लगीनघाई सुरू होते. आर्थिक परिस्थितीअभावी आगामी उचल अगोदरच घेऊन यांचा उदरनिर्वाह चालत असतो. वर्षातील काही दिवस गावी तर काही दिवस कारखान्यावर जात असल्याने मुलांच्या शिक्षणाची मात्र यामध्ये अपरिमित हानी होते. आपल्या वस्तीवर ही मुले एकटीच बागडत असतात. अशातच कारखान्यावर सुरू असणाऱ्या साखरशाळाही आता शासनाने बंद केल्या आहेत.

कोरोनाच्या भयावह परिस्थितीतही पोटाची खळगी भरण्यासाठी हा ऊसतोड मजूरवर्ग ऊसतोडणीसाठी झटत आहे. कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस तोडून बैलगाडी किंवा ट्रॅक्टरमध्ये भरायचा आणि कारखान्यांपर्यत पोचवायचा. यामध्ये त्यांची सुरक्षा मात्र रामभरोसेच असते. गेली कित्येक वर्षे त्यांचा जीवनप्रवास असाच सुरू आहे. जगण्यासाठीचा त्यांचा संघर्ष कधी संपणार, त्याच्या व्यथांवर फुंकर कोण घालणार, हा प्रश्नच आजही तसाच अनुत्तरित आहे.

चौकट :

शासनाने ठोस पावले उचलणे गरजेचे...

ऊसतोड कामगारांच्या व्यथा समजावून घेऊन यावर कायमस्वरूपी उपाययोजना होणे आवश्यक आहे. शासन आणि कारखान्यांनी त्यांच्या कुटुंब, मुलांच्या शिक्षणासाठी ठोस पावले उचलली पाहिजेत. याकरिता नियोजनपूर्वक कार्यक्रम राबविला पाहिजे.

कोट :

आमचा भाग दुष्काळी असल्याने पाण्याअभावी शेती फारशी पिकत नाही. यामुळे उदरनिर्वाहासाठी ऊसतोडणी करावी लागत आहे. दसऱ्यापासूनच आम्ही या भागात आलो आहे. कारखाना सुरू होईपर्यंत मिळेल ते काम करून कुटुंब चालविले आहे. कोरोनामुळे मुलेही आमच्याबरोबच आहेत. आमचा हा संसार असाच उघड्यावर मांडलेला आहे.

-शिवाजी माने, ऊसतोडणी कामगार

०३कुडाळ

फोटो : जावळी तालुक्यात ऊसतोडणी कामगार आभाळाच्या छताखाली आपला संसार मांडून आहेत. (छाया : विशाल जमदाडे)