शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
2
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
3
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
4
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
5
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
6
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
7
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
8
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
9
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
10
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
11
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
12
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
13
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
14
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
15
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
16
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
17
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
18
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
19
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
20
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी

ऊसतोड मजुरांना करावा लागतोय संघर्ष!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:31 IST

कुडाळ : पश्चिम महाराष्ट्रात ऊस उत्पादन अधिक असल्याने साखर कारखान्याची संख्याही जास्त आहे. कारखान्यांना लागणारा कच्चा माल शेतकऱ्यांच्या शेतातून ...

कुडाळ : पश्चिम महाराष्ट्रात ऊस उत्पादन अधिक असल्याने साखर कारखान्याची संख्याही जास्त आहे. कारखान्यांना लागणारा कच्चा माल शेतकऱ्यांच्या शेतातून कारखान्यांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी पेलणारा ऊसतोड मजूर मात्र वर्षानुवर्षे संघर्षमय जीवन जगत आहे. त्यांच्या जीवनसंघर्षाला पूर्णविराम मिळून त्यांच्या व्यथा कोण जाणणार. अजूनही जगण्यासाठी अशीच परवड होत राहणार, अशी वेदनायी व्यथा त्यांच्याकडून व्यक्त होत आहे.

निसर्गाची नेहमीच अवकृपा होत असलेल्या बीड, उस्मानाबाद, नगर, लातूर आदी जिल्ह्यांतून हे मजूर कुटुंबासह ऊसतोडणीसाठी येत असतात. कारखान्यांचा आवारात अथवा ज्या भागात ऊसतोडणी सुरू आहे, अशा ठिकाणी आपली झोपडी उभारून तात्पुरता संसार थाटतात. ऊसतोडणीसाठी भल्या पहाटेपासून ते रात्री उशिरापर्यंत यांचे काम सुरू असते. कुटुंबातील महिलावर्गाची त्यात मोठी साथ मिळते. उसाच्या फडात वाडे बांधणीचे काम त्या करत असतात. लहान लेकरांना बरोबर घेऊन शेतातच बांधावर साडीच्या छोट्याशा पाळणात त्यांचा सांभाळ होत राहतो. या वेदनादायी संघर्षमय परिस्थितीतच त्याचा दिवस व्यथित होत असतो. त्यांच्या लेकरांना ऊन, वारा, विंचवा काट्याचे भय त्यांना कधी वाटतच नाही. उसाच्या फडातच ती लहानाची मोठी होतात. कडाक्याच्या थंडीतही भल्या पहाटे यांचा दिवस सुरू होतो. कोयत्याची पाती हातात घेऊन फडात साऱ्यांची लगीनघाई सुरू होते. आर्थिक परिस्थितीअभावी आगामी उचल अगोदरच घेऊन यांचा उदरनिर्वाह चालत असतो. वर्षातील काही दिवस गावी तर काही दिवस कारखान्यावर जात असल्याने मुलांच्या शिक्षणाची मात्र यामध्ये अपरिमित हानी होते. आपल्या वस्तीवर ही मुले एकटीच बागडत असतात. अशातच कारखान्यावर सुरू असणाऱ्या साखरशाळाही आता शासनाने बंद केल्या आहेत.

कोरोनाच्या भयावह परिस्थितीतही पोटाची खळगी भरण्यासाठी हा ऊसतोड मजूरवर्ग ऊसतोडणीसाठी झटत आहे. कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस तोडून बैलगाडी किंवा ट्रॅक्टरमध्ये भरायचा आणि कारखान्यांपर्यत पोचवायचा. यामध्ये त्यांची सुरक्षा मात्र रामभरोसेच असते. गेली कित्येक वर्षे त्यांचा जीवनप्रवास असाच सुरू आहे. जगण्यासाठीचा त्यांचा संघर्ष कधी संपणार, त्याच्या व्यथांवर फुंकर कोण घालणार, हा प्रश्नच आजही तसाच अनुत्तरित आहे.

चौकट :

शासनाने ठोस पावले उचलणे गरजेचे...

ऊसतोड कामगारांच्या व्यथा समजावून घेऊन यावर कायमस्वरूपी उपाययोजना होणे आवश्यक आहे. शासन आणि कारखान्यांनी त्यांच्या कुटुंब, मुलांच्या शिक्षणासाठी ठोस पावले उचलली पाहिजेत. याकरिता नियोजनपूर्वक कार्यक्रम राबविला पाहिजे.

कोट :

आमचा भाग दुष्काळी असल्याने पाण्याअभावी शेती फारशी पिकत नाही. यामुळे उदरनिर्वाहासाठी ऊसतोडणी करावी लागत आहे. दसऱ्यापासूनच आम्ही या भागात आलो आहे. कारखाना सुरू होईपर्यंत मिळेल ते काम करून कुटुंब चालविले आहे. कोरोनामुळे मुलेही आमच्याबरोबच आहेत. आमचा हा संसार असाच उघड्यावर मांडलेला आहे.

-शिवाजी माने, ऊसतोडणी कामगार

०३कुडाळ

फोटो : जावळी तालुक्यात ऊसतोडणी कामगार आभाळाच्या छताखाली आपला संसार मांडून आहेत. (छाया : विशाल जमदाडे)