शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
3
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
4
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
5
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
6
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
7
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
8
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
9
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
10
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
11
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
12
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
13
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
14
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
15
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
16
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
17
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
18
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
19
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
20
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 

तोडणीला विलंब झाल्याने उसाचे तुरे झडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:39 IST

रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर परिसरातील अनेक गावांतील १८-१९ महिने कालावधी होत आलेले आडसाली ऊस अद्याप तोडणीच्या प्रतीक्षेत आहे. ...

रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर परिसरातील अनेक गावांतील १८-१९ महिने कालावधी होत आलेले आडसाली ऊस अद्याप तोडणीच्या प्रतीक्षेत आहे. उसाला आलेले तुरे झडून गेले अन् वजनात घट होऊ लागली तरी उसाला तोड येत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

रहिमतपूर परिसर हा ऊसाचे आगर म्हणून ओळखला जातो. या परिसरातील अनेक गावांमधील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी गतवर्षी जून-जुलै महिन्यामध्ये आडसाली उसाच्या लागणी केल्या आहेत. प्रामुख्याने आडसाली उसाच्या लागणीसाठी विविध वानाला शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे. पाऊस दमदार कोसळल्यामुळे उसाचे फड अगदी जोमदार आले आहेत. या बरोबरच हंगामी ऊस लागवड म्हणून २०१९ मधील ऑक्टोबर-नोव्हेबर या महिन्यांमध्ये वेगवेगळ्या वानांच्या उसाच्या लागवडी करण्यात आल्या. हंगामी लागवडीतील ऊस ही चांगले दमदार आले आहेत. यंदा उसाचा हंगाम नेहमीप्रमाणे सुरू झाला. परंतु साखर कारखानदारांनी पुरेशा ऊस मजूर टोळ्या गावोगावी उपलब्ध करून न दिल्यामुळे अनेक आडसाली उसाचे फड तोडणीच्या प्रतीक्षेत आहेत.

आडसाली उसाला सध्या १९ महिन्यांचा कालावधी पूर्ण होत आला आहे. त्यामध्येच शेवटच्या टप्प्यात झालेल्या अति पावसामुळे उसाला तुरे आले व उसाची वाढ खुंटली. लवकर ऊसतोड न मिळाल्याने आलेले तुरे ही झडून गेले अन् उभ्या उसाला कोंब फुटून उसाची केरसुनी होऊ लागली आहे. रहिमतपूर परिसरातील गावांमध्ये काही कारखान्यांच्या मोजक्याच ऊसतोड मजूर टोळ्या ऊसतोडणीचे काम करत आहेत, तर काही ऊसतोडणी मशीन ऊसतोडणीचे काम करत आहेत. परंतु उसाचे कार्यक्षेत्र बघता तोडणीसाठी उपलब्ध असलेली यंत्रणा तोकडी पडत आहे. त्यामुळेच परिसरातील अनेक गावांत अद्याप जून-जुलै दरम्यान लागणी केलेल्या आडसाली उसाची तोडणी बाकी आहे. या उसाला आलेले तुरे झडून गेले. उभ्या उसाला कोंबारे फुटले असून, आतून ऊस पोकळ होऊ लागला आहे. वजनात घट होण्याची भीती शेतकऱ्यांना भेडसावत आहे.

चौकट

खोडवा आणि रडव्याला तोड कधी?

उसाच्या लागणीच लटकल्यामुळे खोडवा आणि रडवा उसाला तोड कधी येणार? असा विचार करून उसाचे फडमालकावर डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांचे अधिक नुकसान टाळण्यासाठी रहिमतपूर परिसरात जिल्ह्याबाहेरील इतर ऊस कारखानदारांनीही आपल्या ऊस मजूर टोळ्या पाठवून ऊसतोडणीस घेऊन जाण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा रसरशीत व दमदार असलेल्या उसाच्या फुकण्या होण्यास वेळ लागणार नाही. तरी जास्तीजास्त कारखानदारांनी या भागात ऊस मजूर टोळ्या पाठवून ऊस तोडून न्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

फोटो : २३रहिमतपूर-शुगर केन

रहिमतपूर येथील आडसाली उसाचे तुरे झडू लागले आहेत. (छाया : जयदीप जाधव)