शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

मजुरांकडून ऊस तोडणीचा घोडेबाजार !

By admin | Updated: May 11, 2015 23:26 IST

शेतकऱ्यांची अडवणूक : चिपाड झालेला ऊस तोडण्यासाठी उकळले जातायत पैसे; एकरी तीन ते चार हजारांचा भुर्दंड

कार्वे : कऱ्हाड तालुक्यातील शिवारात ठिकठिकाणी अद्यापही ऊस उभा आहे. उसाला तोड मिळविण्यासाठी शेतकरी धडपडत आहेत. मात्र, मजुरांनी शेतकऱ्यांना अक्षरश: जेरीस आणले आहे. ऊस तोडणीसाठी कारखान्याचे मजूर शेतकऱ्यांकडून पैसे उकळत असल्याने ‘तोड नको; पण मजुरांना आवरा,’ असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.तालुक्यातील कारखान्यांचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. मात्र, कार्वेसह परिसरातील शिवारात अद्यापही ऊस उभा असल्याचे दिसते. मध्यंतरी झालेला पाऊस व मजुरांचा तुटवडा यामुळे ऊसतोडणी रखडल्या आहेत. काही शेतकऱ्यांनी कारखान्याच्या ऊसतोडणीची वाट न पाहता गुऱ्हाळांना ऊस घातला आहे. कोणत्याही पद्धतीने लवकर उसाला तोड मिळावी व शेत मोकळे व्हावे, यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असते. सध्याही शेतकरी त्यासाठीच धावपळ करीत आहेत. अशातच दोन दिवसांपूर्वी पुन्हा वळवाचा तडाखा बसला. वादळी वाऱ्यामुळे उर्वरित उसाचे फड भुईसपाट झाले आहेत. परिणामी, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. काहीही करून उसाला लवकर तोड मिळावी, व मशागतीसाठी शेत लवकरात लवकर मोकळे व्हावे, असे शेतकऱ्यांना वाटत आहे. त्यामुळे ते कारखान्यांच्या गट कार्यालयात हेलपाटे मारत आहेत. मात्र, मजुरांच्या टोळ्या कमी असल्याने शेतकऱ्यांना फक्त तारखा दिल्या जात आहेत. त्यामुळे शेतकरी अक्षरश: धायकुतीला आले आहेत.काही दिवसांपासून ऊसतोड मजुरांनी शेतकऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न चालविला आहे. एखाद्या शेतकऱ्याच्या उसाला तोड मिळालीच तरी त्याला सुरुवातीला मजुरांची फर्माईश पूर्ण करावी लागत आहे. मजूर शेतकऱ्यांकडून पैसे उकळत आहेत. बैलगाडीस २०० ते ४०० रुपये तर ट्रॅक्टरला प्रतिटन १०० ते २०० असा मजुरांनी दर ठरविला आहे. शेतकऱ्याकडून पैसे घेतल्याशिवाय उसाला कोयता लावणार नसल्याची मजुरांची अडेलतट्टू भूमिका असते. अगोदरच उसाचे चिपाड झाल्याने शेतकरी नुकसानीत आहेत. त्यातच या चिपाडाची तोड करण्यासाठी मजूर पैसे मागत असल्याने शेतकऱ्यांना ‘इकडे आड अन् तिकडे विहीर’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नाईलाजास्तव मजुरांची ही मागणी शेतकऱ्यांना पूर्ण करावी लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्याला प्रतिएकरी तीन ते चार हजारांचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.शेतकऱ्यांना कारखान्याकडून प्रतिटनास १ हजार ९०० रुपये पहिली उचल दिली जाते. ते पैसे एका महिन्यांनी मिळतात. मात्र, तोडणी मजूर शेतकऱ्यांकडून पैसे उकळून शेतकऱ्यांना वेठीस धरीत आहेत. या गंभीर बाबीचा कारखान्याने विचार करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवावी, अशी मागणी केली जात आहे. (वार्ताहर) उसाच्या फडाला आधी काडी, मग तोडउन्हाच्या तडाख्यामुळे शिवारातील उरलेले सर्वच ऊसक्षेत्र वाळले आहे. चिपाड झालेल्या उसाचे वाढेही वैरणीयोग्य राहिलेले नाही. तसेच पाला वाळल्याने फडात मोठी अडचण निर्माण झाली आहे. परिणामी, काही शेतकरी स्वत:च ऊस पेटवून देत आहेत. जळीत ऊस कारखान्याकडून अग्रक्रमाने तोडला जातो. त्यामुळे काही शेतकरी ही क्लृप्ती लढवतात. तर काही ठिकाणी ऊसतोड मजूरच तोडणी सोपी व्हावी म्हणून आधी काडी टाकून; मगच उसाला कोयता लावत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.यावर्षी उसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. कालावधी उलटून गेला तरी तोडी मिळालेल्या नाहीत. त्यामुळे कोणत्याही मार्गाने उसाची तोड करून घेऊन शेत रिकामे करण्यासाठी शेतकरी धडपडत आहेत. याचाच गैरफायदा ऊसतोडणी मजूर घेत आहेत. - माणिकराव थोरात, शेतकरी, कार्वे