शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

पोषण आहार शिजवत नसल्याने विद्यार्थी उपाशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : शासनाच्या सूचनेनुसार पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या आहेत. कोरोनामुळे तीन तास शाळा घेण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : शासनाच्या सूचनेनुसार पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या आहेत. कोरोनामुळे तीन तास शाळा घेण्यात येत आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून शाळेत पोषण आहार शिजवण्यास बंदी आहे. त्यामुळे मुलांना भूक लागूनही उपाशीच राहावे लागत आहे. काही शिक्षक मात्र डबे आणतात तर शहरातील काही शिक्षक हॉटेलमध्ये जावून खात आहेत.

प्रत्येक शाळेचे वेळापत्रक वेगवेगळे आहे. मात्र, घरापासून शाळा लांब असल्याने शाळेच्या वेळेपेक्षा आधी मुलांना घराबाहेर पडावे लागते. साहजिकच शाळा सुटल्यानंतर घरी पोहोचण्यास विलंब होत असल्यामुळे मुलांना भूक लागत आहे. पोषण आहार शिजवण्यास बंदी असल्यामुळे पालकांना शाळेत बोलावून तांदूळ, डाळी, कडधान्याचे वाटप करण्यात येत आहे. शासनाच्या धोरणानुसार प्रत्येक मुलासाठी धान्य, तांदूळ दिले जात आहेत. परंतु, शाळेत उपलब्ध होणारा गरमागरम डाळभात असो वा खिचडी तूर्तास मिळत नसल्याने मुलं भुकेने व्याकूळ होत आहेत.

घरातून शाळेसाठी निघताना चपाती-भाजी किंवा चहा-बिस्कीट खाऊन काही मुले बाहेर पडतात. परंतु, घरापासून शाळा लांब असल्याने येण्या-जाण्यासाठी अधिक वेळ लागतो. भर उन्हातून घरी गेल्यानंतर मुलांना जेवणच जात नसल्याचे पालक सांगत आहेत. काही पालकांनी तर धान्य, तांदूळ वाटप करण्यापेक्षा शाळेतच पोषण आहार शिजवून मुलांना वाढावा, अशी मागणी केली आहे.

काही शाळा घड्याळी तीन तास अध्यापन करत असल्या, तरी काही शाळांमध्ये विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेण्यात येत असल्याने मुलांना शाळा संपल्यानंतर जादा वेळ शाळेत थांबावे लागते. परिणामी जास्त वेळ थांबावे लागत असल्याने काही जागरुक पालक मुलांना खाऊचा डबा सोबत देत आहेत. त्यामुळे हात धुवून फावल्या वेळेत मुले डबा खात आहेत. मात्र, त्यामुळे केवळ भूकेचे क्षमन होत आहे. पोषण आहार दिला जात नसल्याने मुलांना पाण्याच्या बाटलीबरोबर किमान डबा आणण्यास तरी परवानगी द्यावी, अशी मागणी पालकांमधून होत आहे.

कोरोनापूर्वी आम्ही डबा दिला तरी मुलांना शाळेतील खिचडी, डाळ-भात आवडायचा. परंतु, आता पोषण आहार शिजवण्याऐवजी तांदूळ, डाळीचे वाटप केले जाते. शाळा तीन तासांची असली तरी येण्या-जाण्यासाठी वेळ जास्त लागतो, त्यामुळे पोषण आहार गरजेचा आहे.

- अश्विनी जाधव, पालक

माझी मुलगी सातवीला आहे. सकाळी १०.३०ची शाळा असल्याने घरातून दहा वाजता बाहेर पडते. दुपारी २ वाजता शाळा सुटत असली तरी घरी येईपर्यंत अडीच वाजतात. घरातून बाहेर पडताना चपाती-भाजी खावून बाहेर पडत असली तरी येईपर्यंत भूक लागते. ऊन्हातून घरी आल्यानंतर पाणी गटागटा पिते. मुलं थकत असून, त्यांना भूक लागत नाही. त्यामुळे पोषण आहार शाळेतच शिजवून द्यावा.

- रूक्सार बागवान, पालक