शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

पोषण आहार शिजवत नसल्याने विद्यार्थी उपाशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : शासनाच्या सूचनेनुसार पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या आहेत. कोरोनामुळे तीन तास शाळा घेण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : शासनाच्या सूचनेनुसार पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या आहेत. कोरोनामुळे तीन तास शाळा घेण्यात येत आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून शाळेत पोषण आहार शिजवण्यास बंदी आहे. त्यामुळे मुलांना भूक लागूनही उपाशीच राहावे लागत आहे. काही शिक्षक मात्र डबे आणतात तर शहरातील काही शिक्षक हॉटेलमध्ये जावून खात आहेत.

प्रत्येक शाळेचे वेळापत्रक वेगवेगळे आहे. मात्र, घरापासून शाळा लांब असल्याने शाळेच्या वेळेपेक्षा आधी मुलांना घराबाहेर पडावे लागते. साहजिकच शाळा सुटल्यानंतर घरी पोहोचण्यास विलंब होत असल्यामुळे मुलांना भूक लागत आहे. पोषण आहार शिजवण्यास बंदी असल्यामुळे पालकांना शाळेत बोलावून तांदूळ, डाळी, कडधान्याचे वाटप करण्यात येत आहे. शासनाच्या धोरणानुसार प्रत्येक मुलासाठी धान्य, तांदूळ दिले जात आहेत. परंतु, शाळेत उपलब्ध होणारा गरमागरम डाळभात असो वा खिचडी तूर्तास मिळत नसल्याने मुलं भुकेने व्याकूळ होत आहेत.

घरातून शाळेसाठी निघताना चपाती-भाजी किंवा चहा-बिस्कीट खाऊन काही मुले बाहेर पडतात. परंतु, घरापासून शाळा लांब असल्याने येण्या-जाण्यासाठी अधिक वेळ लागतो. भर उन्हातून घरी गेल्यानंतर मुलांना जेवणच जात नसल्याचे पालक सांगत आहेत. काही पालकांनी तर धान्य, तांदूळ वाटप करण्यापेक्षा शाळेतच पोषण आहार शिजवून मुलांना वाढावा, अशी मागणी केली आहे.

काही शाळा घड्याळी तीन तास अध्यापन करत असल्या, तरी काही शाळांमध्ये विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेण्यात येत असल्याने मुलांना शाळा संपल्यानंतर जादा वेळ शाळेत थांबावे लागते. परिणामी जास्त वेळ थांबावे लागत असल्याने काही जागरुक पालक मुलांना खाऊचा डबा सोबत देत आहेत. त्यामुळे हात धुवून फावल्या वेळेत मुले डबा खात आहेत. मात्र, त्यामुळे केवळ भूकेचे क्षमन होत आहे. पोषण आहार दिला जात नसल्याने मुलांना पाण्याच्या बाटलीबरोबर किमान डबा आणण्यास तरी परवानगी द्यावी, अशी मागणी पालकांमधून होत आहे.

कोरोनापूर्वी आम्ही डबा दिला तरी मुलांना शाळेतील खिचडी, डाळ-भात आवडायचा. परंतु, आता पोषण आहार शिजवण्याऐवजी तांदूळ, डाळीचे वाटप केले जाते. शाळा तीन तासांची असली तरी येण्या-जाण्यासाठी वेळ जास्त लागतो, त्यामुळे पोषण आहार गरजेचा आहे.

- अश्विनी जाधव, पालक

माझी मुलगी सातवीला आहे. सकाळी १०.३०ची शाळा असल्याने घरातून दहा वाजता बाहेर पडते. दुपारी २ वाजता शाळा सुटत असली तरी घरी येईपर्यंत अडीच वाजतात. घरातून बाहेर पडताना चपाती-भाजी खावून बाहेर पडत असली तरी येईपर्यंत भूक लागते. ऊन्हातून घरी आल्यानंतर पाणी गटागटा पिते. मुलं थकत असून, त्यांना भूक लागत नाही. त्यामुळे पोषण आहार शाळेतच शिजवून द्यावा.

- रूक्सार बागवान, पालक