शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

पोषण आहार शिजवत नसल्याने विद्यार्थी उपाशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : शासनाच्या सूचनेनुसार पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या आहेत. कोरोनामुळे तीन तास शाळा घेण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : शासनाच्या सूचनेनुसार पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या आहेत. कोरोनामुळे तीन तास शाळा घेण्यात येत आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून शाळेत पोषण आहार शिजवण्यास बंदी आहे. त्यामुळे मुलांना भूक लागूनही उपाशीच राहावे लागत आहे. काही शिक्षक मात्र डबे आणतात तर शहरातील काही शिक्षक हॉटेलमध्ये जावून खात आहेत.

प्रत्येक शाळेचे वेळापत्रक वेगवेगळे आहे. मात्र, घरापासून शाळा लांब असल्याने शाळेच्या वेळेपेक्षा आधी मुलांना घराबाहेर पडावे लागते. साहजिकच शाळा सुटल्यानंतर घरी पोहोचण्यास विलंब होत असल्यामुळे मुलांना भूक लागत आहे. पोषण आहार शिजवण्यास बंदी असल्यामुळे पालकांना शाळेत बोलावून तांदूळ, डाळी, कडधान्याचे वाटप करण्यात येत आहे. शासनाच्या धोरणानुसार प्रत्येक मुलासाठी धान्य, तांदूळ दिले जात आहेत. परंतु, शाळेत उपलब्ध होणारा गरमागरम डाळभात असो वा खिचडी तूर्तास मिळत नसल्याने मुलं भुकेने व्याकूळ होत आहेत.

घरातून शाळेसाठी निघताना चपाती-भाजी किंवा चहा-बिस्कीट खाऊन काही मुले बाहेर पडतात. परंतु, घरापासून शाळा लांब असल्याने येण्या-जाण्यासाठी अधिक वेळ लागतो. भर उन्हातून घरी गेल्यानंतर मुलांना जेवणच जात नसल्याचे पालक सांगत आहेत. काही पालकांनी तर धान्य, तांदूळ वाटप करण्यापेक्षा शाळेतच पोषण आहार शिजवून मुलांना वाढावा, अशी मागणी केली आहे.

काही शाळा घड्याळी तीन तास अध्यापन करत असल्या, तरी काही शाळांमध्ये विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेण्यात येत असल्याने मुलांना शाळा संपल्यानंतर जादा वेळ शाळेत थांबावे लागते. परिणामी जास्त वेळ थांबावे लागत असल्याने काही जागरुक पालक मुलांना खाऊचा डबा सोबत देत आहेत. त्यामुळे हात धुवून फावल्या वेळेत मुले डबा खात आहेत. मात्र, त्यामुळे केवळ भूकेचे क्षमन होत आहे. पोषण आहार दिला जात नसल्याने मुलांना पाण्याच्या बाटलीबरोबर किमान डबा आणण्यास तरी परवानगी द्यावी, अशी मागणी पालकांमधून होत आहे.

कोरोनापूर्वी आम्ही डबा दिला तरी मुलांना शाळेतील खिचडी, डाळ-भात आवडायचा. परंतु, आता पोषण आहार शिजवण्याऐवजी तांदूळ, डाळीचे वाटप केले जाते. शाळा तीन तासांची असली तरी येण्या-जाण्यासाठी वेळ जास्त लागतो, त्यामुळे पोषण आहार गरजेचा आहे.

- अश्विनी जाधव, पालक

माझी मुलगी सातवीला आहे. सकाळी १०.३०ची शाळा असल्याने घरातून दहा वाजता बाहेर पडते. दुपारी २ वाजता शाळा सुटत असली तरी घरी येईपर्यंत अडीच वाजतात. घरातून बाहेर पडताना चपाती-भाजी खावून बाहेर पडत असली तरी येईपर्यंत भूक लागते. ऊन्हातून घरी आल्यानंतर पाणी गटागटा पिते. मुलं थकत असून, त्यांना भूक लागत नाही. त्यामुळे पोषण आहार शाळेतच शिजवून द्यावा.

- रूक्सार बागवान, पालक