शहरं
Join us  
Trending Stories
1
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
2
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
3
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा
4
IPL 2025: लखनौच्या अडचणीत वाढ, दुखापतीमुळं मयांक यादव आयपीएलमधून बाहेर!
5
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
6
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
7
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
8
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
9
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
10
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
11
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
12
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
13
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
14
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
15
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
16
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
17
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
18
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
19
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
20
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग

पोषण आहार शिजवत नसल्याने विद्यार्थी उपाशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : शासनाच्या सूचनेनुसार पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या आहेत. कोरोनामुळे तीन तास शाळा घेण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : शासनाच्या सूचनेनुसार पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या आहेत. कोरोनामुळे तीन तास शाळा घेण्यात येत आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून शाळेत पोषण आहार शिजवण्यास बंदी आहे. त्यामुळे मुलांना भूक लागूनही उपाशीच राहावे लागत आहे. काही शिक्षक मात्र डबे आणतात तर शहरातील काही शिक्षक हॉटेलमध्ये जावून खात आहेत.

प्रत्येक शाळेचे वेळापत्रक वेगवेगळे आहे. मात्र, घरापासून शाळा लांब असल्याने शाळेच्या वेळेपेक्षा आधी मुलांना घराबाहेर पडावे लागते. साहजिकच शाळा सुटल्यानंतर घरी पोहोचण्यास विलंब होत असल्यामुळे मुलांना भूक लागत आहे. पोषण आहार शिजवण्यास बंदी असल्यामुळे पालकांना शाळेत बोलावून तांदूळ, डाळी, कडधान्याचे वाटप करण्यात येत आहे. शासनाच्या धोरणानुसार प्रत्येक मुलासाठी धान्य, तांदूळ दिले जात आहेत. परंतु, शाळेत उपलब्ध होणारा गरमागरम डाळभात असो वा खिचडी तूर्तास मिळत नसल्याने मुलं भुकेने व्याकूळ होत आहेत.

घरातून शाळेसाठी निघताना चपाती-भाजी किंवा चहा-बिस्कीट खाऊन काही मुले बाहेर पडतात. परंतु, घरापासून शाळा लांब असल्याने येण्या-जाण्यासाठी अधिक वेळ लागतो. भर उन्हातून घरी गेल्यानंतर मुलांना जेवणच जात नसल्याचे पालक सांगत आहेत. काही पालकांनी तर धान्य, तांदूळ वाटप करण्यापेक्षा शाळेतच पोषण आहार शिजवून मुलांना वाढावा, अशी मागणी केली आहे.

काही शाळा घड्याळी तीन तास अध्यापन करत असल्या, तरी काही शाळांमध्ये विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेण्यात येत असल्याने मुलांना शाळा संपल्यानंतर जादा वेळ शाळेत थांबावे लागते. परिणामी जास्त वेळ थांबावे लागत असल्याने काही जागरुक पालक मुलांना खाऊचा डबा सोबत देत आहेत. त्यामुळे हात धुवून फावल्या वेळेत मुले डबा खात आहेत. मात्र, त्यामुळे केवळ भूकेचे क्षमन होत आहे. पोषण आहार दिला जात नसल्याने मुलांना पाण्याच्या बाटलीबरोबर किमान डबा आणण्यास तरी परवानगी द्यावी, अशी मागणी पालकांमधून होत आहे.

कोरोनापूर्वी आम्ही डबा दिला तरी मुलांना शाळेतील खिचडी, डाळ-भात आवडायचा. परंतु, आता पोषण आहार शिजवण्याऐवजी तांदूळ, डाळीचे वाटप केले जाते. शाळा तीन तासांची असली तरी येण्या-जाण्यासाठी वेळ जास्त लागतो, त्यामुळे पोषण आहार गरजेचा आहे.

- अश्विनी जाधव, पालक

माझी मुलगी सातवीला आहे. सकाळी १०.३०ची शाळा असल्याने घरातून दहा वाजता बाहेर पडते. दुपारी २ वाजता शाळा सुटत असली तरी घरी येईपर्यंत अडीच वाजतात. घरातून बाहेर पडताना चपाती-भाजी खावून बाहेर पडत असली तरी येईपर्यंत भूक लागते. ऊन्हातून घरी आल्यानंतर पाणी गटागटा पिते. मुलं थकत असून, त्यांना भूक लागत नाही. त्यामुळे पोषण आहार शाळेतच शिजवून द्यावा.

- रूक्सार बागवान, पालक