शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
3
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
4
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
5
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
6
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
7
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
8
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
9
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
10
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
11
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
13
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
14
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
15
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
16
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
17
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
18
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
19
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
20
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली

विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाचा ध्यास लागायला हवा : बेंद्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:44 IST

नागठाणे : ‘विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचे कार्य महाविद्यालय करते. परंतु विद्यार्थ्यांना जीवनात यश मिळवायचे असेल, तर जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास ...

नागठाणे : ‘विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचे कार्य महाविद्यालय करते. परंतु विद्यार्थ्यांना जीवनात यश मिळवायचे असेल, तर जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास आणि परिश्रम आदी गुणांबरोबरच विद्यार्थ्यांनी शिस्त, आदर, हुशारी, दूरदृष्टी, कार्यक्षमपणा आणि जबाबदारी या गुणांचा अंगिकार केल्यास आयुष्यात कधीही पाठीमागे वळून पाहण्याची गरज भासणार नाही. हे गुण आत्मसात करण्यासाठी शिक्षण आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाचा ध्यास असला पाहिजे,’ असे प्रतिपादन नागठाणेच्या सरपंच डाॅ. रूपाली बेंद्रे यांनी केले.

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित आर्टस् ॲड काॅमर्स काॅलेज, नागठाणे या ठिकाणी गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात त्या बोलत होत्या.

बेंद्रे म्हणाल्या, ‘जो विद्यार्थी ‘विद्या हेच धन’ समजून जो विद्येची कमाई करतो, तोच खरा विद्यार्थी. तसेच अनेक युगपुरुषांनी आयुष्यात शिक्षणाचे महत्त्व ओळखून आपणास शिक्षणाची दारे खुली करून दिली आहेत. मात्र शिक्षणातून आपणास काय साध्य करायचे आहे, हे निश्चित करणे आवश्यक आहे.’

मनोहर साळुंखे म्हणाले, ‘नागठाणे महाविद्यालय हे स्थापनेपासूनच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचे कार्य करीत आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच शारीरिक आणि मानसिक विकास साधून ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्नशील राहावे.’

प्राचार्य डॉ. जे. एस. पाटील म्हणाले, ‘विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महाविद्यालयातील गुरुदेव कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे बँकेत ठेवलेल्या ठेवीच्या व्याजातून गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक दिले जाते. विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले जाते. विद्यार्थ्यांनी वाचनसंस्कृती वाढवून अविरत प्रयत्नाने यश संपादित करावे.’

सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. एस. के आतार यांनी प्रास्ताविक केले. प्रा. जयमाला उथळे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अजितकुमार जाधव यांनी प्रमाणपत्राचे वाचन केले. डॉ. सुरेश पाटील यांनी आभार मानले.

प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह, दिवंगत कॉ. गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ हे पुस्तक व रोख रक्कम देऊन गौरव करण्यात आला. सरपंच, उपसरपंच तसेच मनोहर साळुंखे यांची शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या सल्लागारपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी उपसरपंच अनिल साळुंखे, विद्यार्थी -विद्यार्थिनी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.