शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठ-कॉलेजच्या विसंवादात विद्यार्थ्यांचा ‘निकाल’

By admin | Updated: January 30, 2015 23:13 IST

रक्तदाब वाढला : कऱ्हाडच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचा प्रथम सत्राचा निकाल जाहीर न झाल्याने तेराशे विद्यार्थी लटकले

संजय पाटील - कऱ्हाड -शिवाजी विद्यापीठांतर्गत येणाऱ्या सर्वच अभियांत्रिकी महाविद्यालयांचा प्रथम सत्राचा निकाल ‘आॅनलाईन’ जाहीर झालाय; फक्त कऱ्हाडच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा निकाल अद्याप लागलेला नाही. या महाविद्यालयाचे प्राध्यापक पेपर तपासणीसाठी आले नसल्यामुळे निकाल राखून ठेवण्यात आल्याचे कारण विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना दिल जातंय, तर यामध्ये आमची काहीच चूक नाही, असं महाविद्यालय व्यवस्थापनाचं म्हणणं आहे. विद्यापीठ व कॉलेजच्या या ओढाताणीत विद्यार्थी मात्र लटकलेत. कऱ्हाडच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात विविध शाखांमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय व अखेरच्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे १ हजार ३०० आहे. या विद्यार्थ्यांची प्रथम सत्राची परीक्षा १७ ते २० डिसेंबर २०१४ दरम्यान संपली आहे. साधारणपणे परीक्षा संपल्यानंतर ४५ दिवसांंत शिवाजी विद्यापीठाकडून सर्वच महाविद्यालयांच्या प्रथम, द्वितीय, तृतीय व अखेरच्या वर्षाचा, प्रत्येक शाखेचा निकाल ‘आॅनलाईन’ जाहीर केला जातो. (पान ७ वर)विद्यार्थी चोवीस तास ‘आॅनलाईन’कऱ्हाडच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणाऱ्या जवळपास सर्वच विद्यार्थ्यांकडे ‘स्मार्टफोन’ आहेत. सर्वच विद्यार्थी सध्या प्रथम सत्राचा निकाल जाहीर झालाय का, हे पाहण्यासाठी चोवीस तास ‘आॅनलाईन’ राहत आहेत. प्रत्येक तासाला ते विद्यापीठाची अधिकृत वेबसाईट तपासून खातरजमा करीत आहेत. मात्र, प्रत्येक वेळी त्यांची निराशाच होत आहे.प्राध्यापक पेपर तपासणीसाठी आले नसल्याचे कारण देऊन विद्यापीठाने आमच्या महाविद्यालयाचा प्रथम सत्राचा निकाल अडवून ठेवला आहे. विद्यापीठाशी आमचा त्याबाबत पत्रव्यवहार झाला असून, प्राध्यापक पेपर तपासणीसाठी आले होते, हे आम्ही विद्यापीठाला कळविले आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षामध्येही डिसेंबरमध्ये प्रथम सत्र संपल्यानंतर निर्धारित कालावधित सर्वच महाविद्यालयांचा निकाल जाहीर झाला. मात्र, कऱ्हाडच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा निकाल अद्याप जाहीर झालेला नाही. याबाबत विद्यार्थ्यांनी महाविद्यालय व्यवस्थापनाकडे विचारणा केली असता त्यांना विद्यापीठात चौकशी करण्याचा सल्ला देण्यात आला. विद्यार्थ्यांनी दोन दिवसांपूर्वी विद्यापीठात चौकशी केली. त्यावेळी ‘तुमच्या महाविद्यालयाचे प्राध्यापक पेपर तपासणीसाठी आले नसल्यामुळे निकाल राखून ठेवलाय,’ असे विद्यापीठाकडून सांगण्यात आले. विद्यार्थ्यांनी पुन्हा महाविद्यालय व्यवस्थापनाला याबाबत विचारले. मात्र, निकालाबाबत विद्यापीठाकडे पत्रव्यवहार सुरू असल्याचे महाविद्यालयाकडून आता सांगण्यात येत आहे.महाविद्यालय व विद्यापीठामध्ये सुरू असलेल्या या ओढाताणीमुळे विद्यार्थी हतबल झाले असून, पहिल्या सत्राचा निकाल जाहीर होण्यासच विलंब झाल्यामुळे दुसऱ्या सत्रात विद्यार्थ्यांना मोठा फटका बसणार आहे. या वादावर तोडगा काढून विद्यार्थ्यांचा निकाल तातडीने जाहीर करण्यात यावा, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.त्याचे पुरावेही दिलेत. निकाल त्वरित जाहीर व्हावा, यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. - पी. एम. खोडके, प्राचार्य, अभियांत्रिकी महाविद्यालय, कऱ्हाड