शहरं
Join us  
Trending Stories
1
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
2
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
3
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
4
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
5
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
6
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
7
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
8
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
9
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
10
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
11
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
12
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
13
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
14
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
15
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
16
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
17
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
18
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
19
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
20
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू

नोकरीची हमी नसल्याने विद्यार्थ्यांची डी.एड्.कडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांची गरज आहे. मात्र, त्यांच्या भरतीबाबत राज्य सरकारकडून कोणतेही ठोस पाऊल उचलले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांची गरज आहे. मात्र, त्यांच्या भरतीबाबत राज्य सरकारकडून कोणतेही ठोस पाऊल उचलले जात नसल्याने विद्यार्थ्यांनी डीएडकडे पाठ फिरविली आहे. दोन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून आणि भरतीसाठी आवश्यक असणारी टीईटी परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरीची हमी नसल्याने विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमाला प्रवेश घेणे टाळले आहे.

अध्यापक शिक्षण पदविका अर्थात डी.एड. अभ्यासक्रमासाठी प्रवेश अर्जासाठी पूर्वी संघर्ष करावा लागत होता. मात्र गुरुजी बनविणाऱ्या या विद्यालयांच्या वाट्याला आता मात्र एकटेपण आले आहे. जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये डी.एड. अभ्यासक्रमाला अल्प प्रतिसाद मिळत असल्याने ही महाविद्यालयेही अडचणीत आली आहेत. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी शिक्षक होतात. मात्र नंतर नोकरी मिळविण्यासाठी पुन्हा सीईटी देणे अनिवार्य असते. या काही कारणांमुळे विद्यार्थी डी.एड.च्या अभ्यासक्रमाकडे पाठ फिरवू लागले आहेत.

डी.एड.चा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर हमखास नोकरी मिळते, असा गेल्या दोन दशकांचा समज मोडीत निघाला आहे. शिक्षकभरतीबाबत जोपर्यंत राज्य शासनाकडून ठोसपणे कार्यवाही झाली नसल्याने गेल्या सहा वर्षांपासून या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल कमी होऊ लागला आहे.

चौकट :

वशिला अन् अपेक्षापूर्तीनेच दमछाक

शिक्षण घेताना डोनेशनच्या रूपाने आणि नोकरी लागतानाही वशिल्याच्या नावाने बहुतांश विद्यार्थ्यांना आर्थिक आव्हानांना सामोरे जावे लागते. सीईटी भरती प्रक्रियेवेळी संस्थाचालकांची अपेक्षापूर्ती करताना दमछाक होते. संस्थांमध्ये वशिला व पैसा नसल्याने डिग्री घेऊनही फायदा नसल्याने फक्त नावापुढे एक पदवी इतकाच उपयोग असल्याची भावना झाल्याने या अभ्यासक्रमाकडे कोणी फिरकण्याचे धाडस करीत नाहीत.

डी.एड.साठी मुलींच्या संख्येत वाढ

शिक्षक म्हणून नोकरी करण्यासाठी प्रवेश घेणाऱ्यांमध्ये मुलींच्या संख्या जास्तीची दिसते. लग्न करताना डी.एड. ही पदवी मुलींना उपयुक्त ठरते. दुसरे म्हणजे अद्यापही कुटुंबात महिलांचा पगार हा दुय्यम मानला जातो. त्यामुळे डी.एड.ची पुंगी वाजली तर वाजली नाही तर नुसतीच मिरविली हे मुलींना करणं शक्य होतं; पण आर्थिक सक्षमता ही मुलांच्या लग्नासाठी प्राथमिक अट असल्याने मुले मात्र याकडे पाठ करीत आहेत.

म्हणून फिरविली जाते पाठ

शिक्षकभरतीवरील मर्यादा

खासगी संस्थांच्या शाळांमधील देणगी पद्धती

सीईटी व टीईटीची वेळखाऊ प्रक्रिया

बेरोजगारांची फौज

नोकरीची हमी नसणे

डी. एड. कॉलेजला मोठ्या प्रमाणात दिलेली मान्यता. टीईटीसारख्या पात्रता परीक्षा घेऊन निव्वळ तोंडाला पाने पुसणे, शासनाच्या अशा निर्णयाचे हे परिणाम आहेत. शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत; पण शिक्षण भरतीत सातत्य न ठेवल्यामुळे बेरोजगारांची फौज तयार झाली आहे. भविष्यातील त्यांची परिस्थिती अधिक विदारक असणार आहे.

- अतुल शहा, शिक्षणतज्ज्ञ, सातारा

चांगल्या मार्कांनी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नोकरी मिळेल याची खात्री नाही. सहा वर्षांत शिक्षकांची भरतीच झाली नाही. खासगी संस्थांकडे नोकरीसाठी किमान १० लाख रुपयांपर्यंतची मागणी केली जाते. शेतकरी कुटुंबातील आमच्यासारख्यांना उच्चतम शिक्षण घेऊन ही रक्कम भरणे अजिबात शक्य नाही.

- जीवन जाधव, सातारा