शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
5
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
6
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
7
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
8
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
9
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
10
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
15
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
16
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
19
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
20
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे

विद्यार्थ्यांनी जमविले ३० हजार--भारतमाता मंडळाकडूनही बोलेंना मदत

By admin | Updated: September 17, 2014 22:28 IST

दुर्गोत्सव साधेपणाने : पत्नी आणि चार मुली अशा त्यांच्या परिवाराला आधार देण्यासाठी ‘लोकमत’ने मदतीचे आवाहन केल्यावर निधीचा ओघ सुरू

सातारा : यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट आॅफ सायन्सच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी बोले कुटुंबीयांसाठी तब्बल तीस हजार रुपयांची मदत गोळा करून आदर्श निर्माण केला आहे. दरम्यान, सदर बझार येथील भारतमाता मंडळाने दुर्गोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेऊन बोले कुटुंबीयांना आर्थिक मदत दिली. अनंत चतुर्दशीच्या रात्री भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत चंद्रकांत बोले यांना प्राण गमवावे लागले होते. पत्नी आणि चार मुली अशा त्यांच्या परिवाराला आधार देण्यासाठी ‘लोकमत’ने मदतीचे आवाहन केल्यावर निधीचा ओघ सुरू झाला. बोले यांच्या मुली त्यांची वडापावची गाडी पुन्हा सुरू करण्याची जिद्द बाळगून आहेत. त्यांना उभारी देण्यासाठी सायन्स कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला. कॉलेजमध्ये लाकडी पेटी तयार करून त्यांनी सर्वांकडून मदत गोळा केली. विद्यार्थ्यांबरोबरच, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने या अभियानात सहभाग नोंदविला आणि तब्बल तीस हजार रुपये जमा झाले. ही रक्कम बुधवारी बोले कुटुंबीयांना देण्यात आली. सदर बझार येथील भारतमाता मंडळ नेहमी सामाजिक बांधिलकीचे भान राखून उत्सव साजरा करीत असते. या मंडळाने डॉल्बीसारख्या गोष्टींना कधीच थारा दिला नाही. मंडळाचे अध्यक्ष प्रदीप ससे यांच्यासह विकास धुमाळ, धनेश भोसले, सुजित जाधव, सुनील भुतकर, राजेंद्र रजपूत, अमय भुतकर, नितीन संकपाळ आदींनी यंदा दुर्गोत्सव साधेपणाने आणि काटकसरीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि बोले कुटुंबीयांना बुधवारी मदतीची रक्कम सुपूर्द केली. याखेरीज आयुर्विमा महामंडळाच्या प्रशिक्षण केंद्रातील कर्मचाऱ्यांनीही बुधवारी मदत दिली. विविध संस्था, संघटनांनी याकामी निधीचे संकलन सुरू केले आहे. (प्रतिनिधी)