शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
2
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
3
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
4
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
5
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
6
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
7
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
8
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
9
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
10
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
11
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
12
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
13
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
14
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
15
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
16
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
17
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
18
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
19
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
20
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 

विजेवरील एसटीचे स्वप्न घाट रस्त्यामुळे हवेतच विरणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:23 IST

सातारा : सातारा जिल्हा हा दुर्गम, दऱ्या-खोऱ्यांचा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातून गेलेल्या सह्याद्रीच्या डोंगरामुळे या ठिकाणाहून पावसाळा, हिवाळ्यात प्रवास ...

सातारा : सातारा जिल्हा हा दुर्गम, दऱ्या-खोऱ्यांचा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातून गेलेल्या सह्याद्रीच्या डोंगरामुळे या ठिकाणाहून पावसाळा, हिवाळ्यात प्रवास करताना डोळ्यांचे पारणे फिटते. पाचगणी, महाबळेश्वर, कास परिसरात तर दाट धुक्यात, ढगापासून प्रवास करताना जणू आपण स्वप्नातच प्रवास करत असल्याचा भास होतो. विजेवरील एसटीतून प्रवास करण्याचे सातारकरांचे स्वप्न मात्र घाटरस्त्यामुळे हवेतच विरणार आहे.

राज्य परिवहन महामंडळ बदलत्या काळानुसार नवनवीन बदल करत असतात. कोरोनामुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी एसटी महामंडळ कधी नव्हे ती मालवाहतुकीकडे वळले. त्याचप्रमाणे सातत्याने डिझेलचे दर वाढत असल्याने प्रवासी वाहतुकीवरही मोठा खर्च होत असतो. त्यामुळे एसटी महामंडळाने एसटीच्या ताफ्यात विजेवर चालणाऱ्या गाड्या आणल्या आहेत. त्यामुळे मोठी बचत होणार असली तरी, सातारा विभाग मात्र याला आणखी काही वर्षे तरी अपवादच ठरणार आहे.

सातारा-पुणे मार्गावरील खंबाटकी घाट, जिल्ह्यातील महाबळेश्वर, पाचगणी, वाई, कास, बामणोली ही पर्यटनस्थळे सह्याद्रीच्या डोंगरात असल्याने विजेवर चालणाऱ्या गाड्या कितपत साथ देणार, हा प्रश्न आहे. त्यामुळे सध्या तरी सपाट मार्ग असलेल्या ठिकाणीच गाड्या चालविण्याचा एसटी महामंडळाचा संकल्प आहे. त्यामुळे सातारकरांना काही दिवस थांबावे लागणार आहे.

चौकट

या मार्गावर येणार अडचणी

सातारा जिल्ह्यातून गेलेल्या सह्याद्री घाटमाथ्यामुळे अनेक मार्गावर इलेक्ट्रिक गाड्या जातील का, याची खात्री नाही. त्यामुळे खंबाटकी घाटामुळे सातारा-पुणे, यवतेश्वर घाटांमुळे कास, बामणोली, पसरणी घाटांमुळे पाचगणी, महाबळेश्वर या मार्गावर विद्युत एसटी धावणे अवघड आहे.

चौकट

आणखी काही वर्षे तरी प्रतीक्षाच

राज्य परिवहन महामंडळाने सध्या सपाट रस्ता असलेल्या विभागांमध्ये विजेवर चालणाऱ्या गाड्या प्रायोगिक तत्त्वावर चालविण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये सांगली-कोल्हापूर, सांगली-सोलापूर अशा मार्गांचा समावेश असणार आहे.

राज्यातील इतर विभागांमध्ये अशा गाड्यांना कसा प्रतिसाद मिळतो. एकदा चार्ज केल्यानंतर किती किलोमीटर धावतात. म्हणजे एसटी भरलेली असताना किती किलोमीटर धावतात, त्यावर होणारा खर्च याचा अभ्यास केला जाऊ शकतो. त्यानंतर साताऱ्याचा विचार होऊ शकतो.

चौकट

...तरीही चार्जिंग पॉईंटची गरज

एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणाऱ्या या गाड्या खासगी असणार आहेत. त्यामुळे भविष्यात या गाड्यांना मागणी वाढू शकते. तसेच कोल्हापूर, बारामती या दिशेने येताना फारसा घाट नाही. त्यामुळे बाहेरच्या विभागातूनही काही गाड्या येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील काही ठिकाणी चार्जिंग पॉईंट केल्यास फायदा होऊ शकतो.

जिल्ह्यातील अनेक नागरिक स्वत:च्या वापरासाठी विजेवर चालणाऱ्या दुचाकी, चारचाकी गाड्या घेत आहेत. एसटी महामंडळाने चार्जिंग पॉईंट तयार केल्यास खासगी वाहनधारकांना एकप्रकारे सोय होऊ शकते. त्यातून एसटीलाही उत्पन्नवाढीचा नवा स्त्रोत सुरू होऊ शकतो.

चौकट

पर्यावरण रक्षणासाठी महत्त्वाचे

सातारा जिल्ह्याला निसर्गाने भरभरून दिले आहे. येथे विपुल वनौषधी उगवतात. कास पुष्पपठारावर जगात कोठेही उगवत नाहीत, अशी दुर्मिळ फुले येथे उगवतात. त्यामुळे डिझेलमुळे धूर ओकणाऱ्या गाड्या पर्यावरणावर घाला घालत असतात. त्यामुळे अशाप्रकारच्या गाड्या रस्त्यावर आल्यास धूर कमी झाल्यामुळे पर्यावरणाचे रक्षणच होणार आहे. घाट रस्ते हे किरकोळ अडथळे आहेत. राज्यात इतर ठिकाणी वापर केल्यानंतर तंत्रज्ञानात बदल करून क्षमता वाढविली जाऊ शकते.

कोट

घाटरस्त्याचा अडथळा

राज्य परिवहन महामंडळाने विजेवर चालणाऱ्या गाड्या आणण्याचा विचार केला आहे. मात्र सातारा जिल्ह्यात असलेल्या घाटरस्त्यांवर त्या कितपत चालतील, हा प्रश्न असल्याने सध्या तरी या अनोख्या प्रयोगाला घाटरस्त्याचा अडथळा आहे. तो लवकरच दूरही होऊ शकतो.

- सागर पळसुले,

विभाग नियंत्रक, सातारा.