शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

एसटीचे ‘सीमाेल्लंघन’; प्रवासी मात्र घरातच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:26 IST

सातारा : आजवर ‘गरिबांचा रथ’ म्हणून ओळखला जात असलेली एसटी खरोखरच दिवसेंदिवस गरीब होत आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या ...

सातारा : आजवर ‘गरिबांचा रथ’ म्हणून ओळखला जात असलेली एसटी खरोखरच दिवसेंदिवस गरीब होत आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा विभागाने आंतरजिल्हा, जिल्ह्यांर्गत तसेच परराज्यात एसटीच्या फेऱ्या वाढविल्या आहेत. मात्र प्रवासी घरात बसून असल्याने एसटीच्या उत्पन्नात फारसा फरक पडलेला दिसत नाही. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

सातारा जिल्ह्यात मार्च २०२० मध्ये कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने सार्वजनिक प्रवासी वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. मार्चपासून ऑक्टोबरपर्यंत ‘गरीबरथा’ची चाके एकाच ठिकाणी खिळली होती. या काळात काहीच उत्पन्न न मिळाल्याने एसटी महामंडळ अडचणीत आले होते. कर्मचाऱ्यांचा पगार करण्याएवढेही उत्पन्न न मिळाल्याने राज्य शासनाने अनेक वेळा मदत घेण्याची वेळ आली होती.

आता एसटीला चांगले दिवस येतील, असे वाटत होते. यासाठी एसटीने नियोजन केले आहे. गाड्या सॅनिटाइझ करुन सोडल्या जातात. आंतरजिल्हा, जिल्हा अंतर्गत तसेच हैदराबाद, पणजी येथे एसटी सुरू केली आहे. पण कोरोनाबाधितांचे आकडे वाढत असल्याने प्रवासी घरातच बसून आहेत. त्यामुळे एसटीच्या तिजोरीत म्हणावे त्या प्रमाणात भरणा झालेला पाहायला मिळत नाही.

चौकट

उत्पन्नात फरक पडेना

राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा विभागाने सातारा जिल्ह्यातील प्रमुख शहरांना जोडले असून राज्यातील प्रमुख शहरांतही एसटी धावत आहे. त्याचप्रमाणे प्रवाशांच्या मागणीनुसार एसटी सोडण्याचा संकल्प केला आहे. तरी निम्मे प्रवासी वाहतुकीलाच अधिकृत परवानगी असल्याने उत्पन्नात फारसा फरक पडत नाही. त्यामुळे अडचणीत वाढ होत आहे.

चौकट

दुसऱ्या राज्यातील प्रवासी मिळेनात

सातारा जिल्ह्यातून हैदराबाद, पणजी येथे एसटी सुरू केली आहे. ही सुरू करताना प्रवाशांच्या सोयीच्या वेळेचाही विचार महामंडळाने केला आहे.

nगोव्याला शक्यतो पर्यटनासाठीच लोक जात असतात. तेथे फारसे निर्बंधही नाहीत. तरीही अजूनही लोकांची घरातून बाहेर पडण्याची मानसिकता नसल्याचे दिसत असून प्रवासी मिळत नाहीत.

चौकट

ग्रामीण भागाकडे जास्त लक्ष देण्याची गरज

nएसटी महामंडळाने जादा उत्पन्न देणाऱ्या पुणे, मुंबई, बोरिवली, मुंबईकडे जास्त लक्ष दिले आहे.

nसातारा शहरात दररोज विविध कामानिमित्ताने ग्रामीण भागातून लोक येत असतात.

nत्यांचा विचार करुन सातारा शहर तसेच विभागातील अकरा आगारातून ग्रामीण भागाकडेही विशेष लक्ष देण्याची गरज आहे.

nशाळा, महाविद्यालये बंद असले तरी शिक्षकांना, नोकरदारांना सकाळी कामावर जावेच लागते.

nत्यामुळे प्रमुख बसस्थानकातून ग्रामीण भागात सकाळी एसटी सुरू केल्यास निश्चित प्रवासी वाढतील.

चौकट

मुंबई, पुणे मार्गावर वाढली प्रवाशांची गर्दी

सातारा जिल्ह्याच्या तुलनेत मुंबई, पुणे येथे कोरोनाबाधितांचे प्रमाण कमी आहे. मृत्यूदरही कमी आहे.

यामुळे या शहरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातारकरांची वर्दळ वाढली आहे. त्याचा फायदा होतो.

एकापाठोपाठ एक गाडी सोडण्याचे नियोजन केल्याने ऑनलाईन आरक्षणापेक्षा जागेवर येऊन प्रवास करणे पसंत करत आहेत.