शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मध्य रेल्वेची ठाणे ते सीएसएमटी दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद
2
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
3
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
4
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
5
'हिंदुस्तान झिदाबाद...' तिरंग्यासाठी लंडनमध्ये पाकिस्तानींशी भिडल्या भारतीय तरुणी, पाहा VIDEO
6
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
7
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
8
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
9
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
10
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
11
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
12
चिपळुणात वाशिष्ठी नदीने ओलांडली इशारा पातळी; पूरसदृश स्थितीमुळे कामाशिवाय घराबाहेर न पडण्याची सूचना
13
"२६ जुलैचा जलप्रलय, तुम्ही मला...", वीणा जामकरने सांगितली ज्योती चांदेकरांची भावुक आठवण
14
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
15
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
16
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी
17
AI क्राईम प्रिडिक्शन सिस्टम: गुन्हेगारांना पकडण्यासाठी आता 'हा' देश घेणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत
18
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
19
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
20
आयटी कंपनीने ८०% कर्मचाऱ्यांना एकाचवेळी कामावरुन काढलं; कारण वाचून हैराण व्हाल

ग्रामस्थांच्या तक्रारीनंतरही खडी फोडण्याचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 17:23 IST

अधिकारीही येईनात : कामाच्या दजार्चे काय; बनपुरी-वडूज रस्ता

आॅनलाईन लोकमतमायणी (जि. सातारा), दि. २४ : खटाव तालुक्यातील बनपुरी-येरळवाडी-वडूज या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाबाबत अनेक तक्रारी आहेत. असे असतानाही रस्त्याचे काम सुरू आहे. ऐन पावसामध्ये मुरुमीकरण व खडी फोडण्याचे काम सुरू असताना एकही अधिकारी या कामाचा दर्जा तपासणीसाठी येत नाही. त्यामुळे नेमके पाणी कोठे मुरत आहे, असा सवाल येरळवाडी व परिसरातील ग्रामस्थ करीत आहेत. बनपुरी, येरळवाडी ग्रामस्थांना कातरखटाव मार्गे वडूजला जावे लागत असल्यामुळे तेथील ग्रामस्थांचा वेळ व पैसा दोन्ही खर्च होत होते. म्हणून या मागार्साठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून वडूज, गणेशवाडी व बनपुरी या मागार्साठी निधी मंजूर करण्यात आला आहे. हे काम करताना प्रथम मातीकाम, खडीकरण करणे यासह अनेक स्तरांची माहिती येथील फलकावर लिहली आहे. पण खरेच या पद्धतीने काम होत आहे का, हे अधिकाऱ्यांनी वेळच्यावेळी पाहणे गरजेचे आहे. असे असताना अधिकारी काय करतात, हा प्रश्न आहे. ग्रामस्थांनी तक्रार करूनही अधिकारी का येत नाहीत, या रस्त्याचे काम ऐन पावसाळ्यात सुरू झाले, मुरुमीकरण झालेल्या रस्त्यावर पावसामुळे ठिकठिकाणे खड्डे पडून त्याठिकाणी रस्ताही खचला आहे. या रस्त्यावरून दररोज ये-जा करणाऱ्या अनेक ग्रामस्थांनी अनेकवेळा ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तोंडी तक्रार केली आहे. तरीही या कामाकडे अधिकारी फिरकले नाहीत, अशी तक्रार ही ग्रामस्थ बोलून दाखवत आहेत. त्यामुळे नेमके पाणी मुरतंय कोठे हे काही कळेना, असे झाले आहे. काही असो अशी कामे अनेक वर्षांतून मंजूर होतात. त्यासाठीही एकदाच निधी दिला जातो. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी या कामाच्या दजार्बाबत लक्ष देणे गरजेचे आहे. इतर तालुक्याच्या दृष्टीने खटाव तालुक्यातील रस्त्याची वाईट अवस्था आहे. रस्त्यावर खड्डा आला की खटाव तालुका आला, असे प्रवासी बोलतात. त्यामुळे रस्त्याचे काम चांगले होणे आवश्यक आहे. सध्या या रस्त्याबाबत ठेकेदाराची चूक आहे का? त्यावर लक्ष ठेवणाऱ्या संबंधित विभागाची हे कोडे उलगडत नाही. त्यामुळे याबाबत वरिष्ठांनीच लक्ष घालणे महत्त्वाचे ठरत आहे. संबंधित ठेकेदाराने या रस्त्यावरील खडी बाजूला केली नाही तर येत्या दोन दिवसांत येरळवाडीतील युवकांच्या सहकायार्तून व ग्रामस्थांची मदत घेऊन खडी बाजूला करण्याचे काम हाती घेणार आहोत. त्यानंतर रस्ता पूर्ववत करून विद्यार्थ्यांची होणारी पायपीट थांबवणार आहे. राज्य परिवहन महामंडळाने एसटीची सेवा सुरू करावी, यासाठी विनंती करणार आहे. - योगेश जाधव, सामाजिक कार्यकर्ता, येरळवाडी