शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
2
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
3
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
4
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
5
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
6
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
7
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
8
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
9
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
10
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
11
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
12
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
13
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
14
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
15
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
16
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
17
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
18
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
19
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
20
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...

नियमांचे काटेकोर पालन करणे हाच एकमेव उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:35 IST

वडूज : लॉकडाऊन करायचा की नाही याचा निर्णय घ्यायच्या उंबरठ्यावर राज्य सरकार आहे. राज्यात वाढत चाललेली कोरोनाची आकडेवारी आणि ...

वडूज : लॉकडाऊन करायचा की नाही याचा निर्णय घ्यायच्या उंबरठ्यावर राज्य सरकार आहे. राज्यात वाढत चाललेली कोरोनाची आकडेवारी आणि जनतेचा हलगर्जीपणा यामुळे सरकारने लॉकडाऊन जाहीर केला तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीही नसावे; पण वर्ष झाले तरी कोरोनाचे युद्ध संपलेले नाही. मध्यंतरी ते संपल्यासारखे वाटू लागले असताना आणि लसही हातात आली असताना दिलासा देणारी स्थिती निर्माण झाली होती. सध्या एकमेव पर्याय म्हणजे नियमांचे काटेकोर पालन करणे हेच त्रिवार सत्य आहे.

कोरोनावर लस आली हाच तो काय मागील वर्षात मिळालेला दिलासा; मात्र आताही परिस्थिती हाताबाहेर जात आहे. सरकार, प्रशासन आणि रुग्णालये, तेथील कर्मचारी त्यांचे काम तेव्हाही करीत होते, आजही करीत आहेत व कोरोनाचा नायनाट होईपर्यंत त्यांना ते करावेच लागणार आहे. त्यातून त्यांना उसंत मिळणार नाही अशीच स्थिती आहे. इतर देशांतील बातम्यांचा आढावा घेतला तर निर्बंध उठविल्यानंतर ढिलेपणामुळे पुन्हा परिस्थिती हाताबाहेर जाण्याची वेळ आली आहे. जगातील इतर देशाबरोबरीने महाराष्ट्रातील रुग्ण संख्या जवळपास पोहोचली आहे. कोरोनाला हरवायचे असेल तर नियमांचे काटेकोर पालन करणे हाच एकमेव उपाय आहे. आताही गत तीन महिन्यांपासून रुग्णसंख्येत वाढ होण्यास सुरुवात दिसू लागली होती. फेब्रुवारीत ते प्रमाण आणखी वाढले. मार्चमध्ये तर हाताबाहेर गेले आणि आता एप्रिलमध्ये पुन्हा गेल्या वेळेपेक्षाही भयावह अशी स्थिती निर्माण झाली आहे.

काही महिन्यांपूर्वीच खटाव तालुक्यातील ९० ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकाही झाल्यात. त्यात कोरोनाची सगळी आचारसंहिता खुंटीला टांगून ठेवण्यात आली होती. या काळात सार्वजनिक वाहने, सार्वजनिक ठिकाणे, हॉटेल्स, बार एवढेच नव्हे, तर चौक आणि मुख्य बाजारपेठांचे रस्ते सगळेच गजबजलेले होते. आपल्या स्वतःच्या सुरक्षिततेसाठी असणारा मास्क तर गायबच झाला होता. सोशल डिस्टन्स कधीच गुंडाळून ठेवलेले. ज्यांना लक्षणे दिसत होती किमान त्यांनी तरी खबरदारी घेत इतरांपासून लांब राहणे आवश्‍यक होते. त्यांनीही आपली लक्षणे आणि आपल्या घरात कोणीतरी पॉझिटिव्ह सापडला आहे. या बाबी लपविण्यातच धन्यता मानली. कोरोना म्हणजे साधा सर्दी, खोकला झाला आहे. या नव्या ज्ञानाची भर टाकणारेही महाभाग आजूबाजूला होतेच. त्यामुळे विषाणूची खिरापत सगळीकडे वाटत ठेवली गेली.

चौकट..

स्वतःची आणि कुटुंबाची जबाबदारी स्वीकारा...

जिल्ह्यातील परिस्थिती हाताबाहेर जाण्याच्या मार्गावर आहे. रोज पाचशेच्या आसपास रुग्ण वाढत आहेत. ग्रामीण भागात रुग्ण वाढले तर परिस्थिती काय होते हे आपण सगळ्यांनीच अनुभवले आहे. त्यामुळे सध्याची परिस्थिती पाहता सगळ्यांनीच तारतम्याने वागून स्वतःची आणि कुटुंबाची जबाबदारी स्वीकारून नियमांचे काटेकोरपणे पालन केले तरच कोरोनाला आपल्यापासून आणि आपल्या कुटुंबापासून दूर ठेवण्यात आपण यशस्वी होऊ शकू हा दृढ विश्वास सर्वांच्या मनात रुजणे काळाची गरज बनली आहे.