शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

नियमांचे काटेकोर पालन करणे हाच एकमेव उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:35 IST

वडूज : लॉकडाऊन करायचा की नाही याचा निर्णय घ्यायच्या उंबरठ्यावर राज्य सरकार आहे. राज्यात वाढत चाललेली कोरोनाची आकडेवारी आणि ...

वडूज : लॉकडाऊन करायचा की नाही याचा निर्णय घ्यायच्या उंबरठ्यावर राज्य सरकार आहे. राज्यात वाढत चाललेली कोरोनाची आकडेवारी आणि जनतेचा हलगर्जीपणा यामुळे सरकारने लॉकडाऊन जाहीर केला तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीही नसावे; पण वर्ष झाले तरी कोरोनाचे युद्ध संपलेले नाही. मध्यंतरी ते संपल्यासारखे वाटू लागले असताना आणि लसही हातात आली असताना दिलासा देणारी स्थिती निर्माण झाली होती. सध्या एकमेव पर्याय म्हणजे नियमांचे काटेकोर पालन करणे हेच त्रिवार सत्य आहे.

कोरोनावर लस आली हाच तो काय मागील वर्षात मिळालेला दिलासा; मात्र आताही परिस्थिती हाताबाहेर जात आहे. सरकार, प्रशासन आणि रुग्णालये, तेथील कर्मचारी त्यांचे काम तेव्हाही करीत होते, आजही करीत आहेत व कोरोनाचा नायनाट होईपर्यंत त्यांना ते करावेच लागणार आहे. त्यातून त्यांना उसंत मिळणार नाही अशीच स्थिती आहे. इतर देशांतील बातम्यांचा आढावा घेतला तर निर्बंध उठविल्यानंतर ढिलेपणामुळे पुन्हा परिस्थिती हाताबाहेर जाण्याची वेळ आली आहे. जगातील इतर देशाबरोबरीने महाराष्ट्रातील रुग्ण संख्या जवळपास पोहोचली आहे. कोरोनाला हरवायचे असेल तर नियमांचे काटेकोर पालन करणे हाच एकमेव उपाय आहे. आताही गत तीन महिन्यांपासून रुग्णसंख्येत वाढ होण्यास सुरुवात दिसू लागली होती. फेब्रुवारीत ते प्रमाण आणखी वाढले. मार्चमध्ये तर हाताबाहेर गेले आणि आता एप्रिलमध्ये पुन्हा गेल्या वेळेपेक्षाही भयावह अशी स्थिती निर्माण झाली आहे.

काही महिन्यांपूर्वीच खटाव तालुक्यातील ९० ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकाही झाल्यात. त्यात कोरोनाची सगळी आचारसंहिता खुंटीला टांगून ठेवण्यात आली होती. या काळात सार्वजनिक वाहने, सार्वजनिक ठिकाणे, हॉटेल्स, बार एवढेच नव्हे, तर चौक आणि मुख्य बाजारपेठांचे रस्ते सगळेच गजबजलेले होते. आपल्या स्वतःच्या सुरक्षिततेसाठी असणारा मास्क तर गायबच झाला होता. सोशल डिस्टन्स कधीच गुंडाळून ठेवलेले. ज्यांना लक्षणे दिसत होती किमान त्यांनी तरी खबरदारी घेत इतरांपासून लांब राहणे आवश्‍यक होते. त्यांनीही आपली लक्षणे आणि आपल्या घरात कोणीतरी पॉझिटिव्ह सापडला आहे. या बाबी लपविण्यातच धन्यता मानली. कोरोना म्हणजे साधा सर्दी, खोकला झाला आहे. या नव्या ज्ञानाची भर टाकणारेही महाभाग आजूबाजूला होतेच. त्यामुळे विषाणूची खिरापत सगळीकडे वाटत ठेवली गेली.

चौकट..

स्वतःची आणि कुटुंबाची जबाबदारी स्वीकारा...

जिल्ह्यातील परिस्थिती हाताबाहेर जाण्याच्या मार्गावर आहे. रोज पाचशेच्या आसपास रुग्ण वाढत आहेत. ग्रामीण भागात रुग्ण वाढले तर परिस्थिती काय होते हे आपण सगळ्यांनीच अनुभवले आहे. त्यामुळे सध्याची परिस्थिती पाहता सगळ्यांनीच तारतम्याने वागून स्वतःची आणि कुटुंबाची जबाबदारी स्वीकारून नियमांचे काटेकोरपणे पालन केले तरच कोरोनाला आपल्यापासून आणि आपल्या कुटुंबापासून दूर ठेवण्यात आपण यशस्वी होऊ शकू हा दृढ विश्वास सर्वांच्या मनात रुजणे काळाची गरज बनली आहे.