शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

साठवलेला कांदा वातावरणातील बदलामुळे होतोय खराब...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:26 IST

खटाव : नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उन्हाळी कांद्याला आगामी काळात चांगला भाव मिळेल, या अपेक्षेने कांदा चाळीत ...

खटाव : नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उन्हाळी कांद्याला आगामी काळात चांगला भाव मिळेल, या अपेक्षेने कांदा चाळीत साठवून ठेवलेला कांदा आता वातावरणातील बदलामुळे खराब होऊ लागल्यामुळे शेतकरी आता मिळेल त्या भावात कांदा विक्री करण्याच्या लगबगीत दिसून येत आहे.

शेतकऱ्यांनी बियाणे मिळवण्यासाठी धडपड करून बियाणे मिळवले, रोपे तयार करेपर्यंत त्यानंतर कांदा लागवडीपासून ते काढणीपर्यंत नैसर्गिक विविध संकटांना तोंड द्यावे लागले आहे. बहुतांश शेतकऱ्यांची रोपे उगवण्याअधीच खराब झाली. त्यामुळे त्यांना दुबार रोपे तयार करण्यासाठी हाती बिया नसल्यामुळे बाजारात उपलब्ध असलेल्या बियाण्याची मिळेल त्या भावात खरेदी करून पुन्हा रोपे तयार केली. परंतु, त्याचा उगवण क्षमतेवर परिणाम होऊन उत्पादन कमी आले. यातच अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा पाऊस यामुळे कांद्यावर करपा रोगाने थैमान घातले. त्यामुळे उत्पादनात घट आल्यामुळे उरलेल्या कांद्याला चांगला भाव मिळेल, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कांदा चाळीत साठवून ठेवला आहे. परंतु, गारपीट व अवकाळी पावसामुळे नरम झालेला कांदा चाळीत टाकल्यानंतर एक ते दीड महिन्यात खराब होण्यास सुरुवात झाली. आता कांदा बाहेर काढून निवडून विक्रीसाठी देण्याच्या गडबडीत कांदा उत्पादक शेतकरी आहेत.

उन्हाळी कांदा लागवडीसाठी महागडे कांदा बी, तणनाशके, रासायनिक खते, रोपांची लागवड कांदा काढणी आदींसाठी मोठ्या प्रमाणावर खर्च झाला आहे. त्यातच अगदी शेवटच्या टप्प्यात अवकाळी पाऊस व रोपांवर पडलेल्या करपा रोगामुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे. उरलेल्या कांद्याला चांगला दर मिळेल, या अपेक्षेपोटी बहुतांश शेतकऱ्यांनी कांदा चाळीत भरला होता. बऱ्याच दिवसांपासून कांद्याचा भाव स्थिर आहे.

कोट..

सध्या १८ रुपयांनी कांदा मार्केटमध्ये खरेदी केला जात आहे. तर किरकोळ बाजारामध्ये २२ ते २५ रुपयांप्रमाणे विकला जात आहे. चाळीतील कांदा वास्तविक ऑगस्ट महिन्यापर्यंत चाळीत सुरक्षित राहतो; परंतु अवकाळी पावसामुळे कांदा पिकावरदेखील परिणाम झाल्यामुळे साठवून ठेवलेला चाळीतील कांदाही खराब होत आहे. कांदा भरणीवेळी खराब निघत आहेत.

- हणमंत यादव, कांदा व्यापारी

फोटो कॅप्शन : खटाव तालुक्यात शेतकरी कांदा चाळीतून निवडक कांदा भरून ठेवत आहेत. (छाया : नम्रता भोसले )