शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

साठवलेला कांदा वातावरणातील बदलामुळे होतोय खराब...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:26 IST

खटाव : नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उन्हाळी कांद्याला आगामी काळात चांगला भाव मिळेल, या अपेक्षेने कांदा चाळीत ...

खटाव : नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उन्हाळी कांद्याला आगामी काळात चांगला भाव मिळेल, या अपेक्षेने कांदा चाळीत साठवून ठेवलेला कांदा आता वातावरणातील बदलामुळे खराब होऊ लागल्यामुळे शेतकरी आता मिळेल त्या भावात कांदा विक्री करण्याच्या लगबगीत दिसून येत आहे.

शेतकऱ्यांनी बियाणे मिळवण्यासाठी धडपड करून बियाणे मिळवले, रोपे तयार करेपर्यंत त्यानंतर कांदा लागवडीपासून ते काढणीपर्यंत नैसर्गिक विविध संकटांना तोंड द्यावे लागले आहे. बहुतांश शेतकऱ्यांची रोपे उगवण्याअधीच खराब झाली. त्यामुळे त्यांना दुबार रोपे तयार करण्यासाठी हाती बिया नसल्यामुळे बाजारात उपलब्ध असलेल्या बियाण्याची मिळेल त्या भावात खरेदी करून पुन्हा रोपे तयार केली. परंतु, त्याचा उगवण क्षमतेवर परिणाम होऊन उत्पादन कमी आले. यातच अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा पाऊस यामुळे कांद्यावर करपा रोगाने थैमान घातले. त्यामुळे उत्पादनात घट आल्यामुळे उरलेल्या कांद्याला चांगला भाव मिळेल, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कांदा चाळीत साठवून ठेवला आहे. परंतु, गारपीट व अवकाळी पावसामुळे नरम झालेला कांदा चाळीत टाकल्यानंतर एक ते दीड महिन्यात खराब होण्यास सुरुवात झाली. आता कांदा बाहेर काढून निवडून विक्रीसाठी देण्याच्या गडबडीत कांदा उत्पादक शेतकरी आहेत.

उन्हाळी कांदा लागवडीसाठी महागडे कांदा बी, तणनाशके, रासायनिक खते, रोपांची लागवड कांदा काढणी आदींसाठी मोठ्या प्रमाणावर खर्च झाला आहे. त्यातच अगदी शेवटच्या टप्प्यात अवकाळी पाऊस व रोपांवर पडलेल्या करपा रोगामुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे. उरलेल्या कांद्याला चांगला दर मिळेल, या अपेक्षेपोटी बहुतांश शेतकऱ्यांनी कांदा चाळीत भरला होता. बऱ्याच दिवसांपासून कांद्याचा भाव स्थिर आहे.

कोट..

सध्या १८ रुपयांनी कांदा मार्केटमध्ये खरेदी केला जात आहे. तर किरकोळ बाजारामध्ये २२ ते २५ रुपयांप्रमाणे विकला जात आहे. चाळीतील कांदा वास्तविक ऑगस्ट महिन्यापर्यंत चाळीत सुरक्षित राहतो; परंतु अवकाळी पावसामुळे कांदा पिकावरदेखील परिणाम झाल्यामुळे साठवून ठेवलेला चाळीतील कांदाही खराब होत आहे. कांदा भरणीवेळी खराब निघत आहेत.

- हणमंत यादव, कांदा व्यापारी

फोटो कॅप्शन : खटाव तालुक्यात शेतकरी कांदा चाळीतून निवडक कांदा भरून ठेवत आहेत. (छाया : नम्रता भोसले )