शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
2
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
3
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
4
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
5
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
6
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
7
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
8
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
9
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
10
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
11
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
12
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
13
विमानांच्या इंजिन फ्यूल स्विचची तात्काळ तपासणी करावी; DGCA चा सर्व कंपन्यांना आदेश
14
याला म्हणतात ढासू शेअर...! 1 लाखाचे केले 3.7 कोटी, 5 वर्षांत दिला 36900% चा बंपर परतावा; करतोय मालामाल
15
IND vs ENG: लॉर्ड्सवर अक्षय कुमारसोबत मॅच बघायला आली 'ही' अभिनेत्री, एकेकाळी गाजवलंय बॉलिवूड
16
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
17
हिंदी-मराठी वादामुळे वाढलेला तणाव कमी करण्यासाठी काँग्रेसकडून आम्ही मराठी, आम्ही भारतीय भाषा, कार्यक्रमाचं मिरारोड येथे आयोजन
18
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
19
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
20
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण

कोयनेतून कर्नाटकला जाणारे पाणी थांबवा

By admin | Updated: April 13, 2017 18:55 IST

कोयना धरणातून कर्नाटक राज्याला पाणी सोडण्याचा निर्णय शासनाने तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी

आॅनलाईन लोकमत
सातारा, दि. 13 - कोयना धरणातून कर्नाटक राज्याला पाणी सोडण्याचा निर्णय शासनाने तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी जिल्ह्यातील सर्वच आमदारांनी जिल्हा टंचाई आढावा बैठकीत केली. अडीच टीएमसी पाणी गेल्यास कोयना धरणाच्या काठी असणा-या गावांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. 
 
पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी जिल्हा नियोजन भवनामध्ये टंचाई आढावा बैठक घेण्यात आली. याप्रसंगी सहपालकमंत्री सदाभाऊ खोत, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. 
 
कर्नाटक राज्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी कोयना धरणातून २.६४ टीएमसी पाणी कर्नाटकला देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला. मंगळवारी रात्री ९ वाजल्यापासून कोयना धरणाच्या रिव्हर स्लुईस गेटमधून ९०७ क्युसेक पाणी कोयना नदी पात्रात सोडायला सुरुवात झाली. याचे पडसाद गुरुवारी झालेल्या जिल्हा टंचाई आढावा बैठकीत उमटले. 
 
‘कोयनेतून कर्नाटला पाणी सोडायचा निर्णय हा लोकप्रतिनिधींनी अंधारात ठेवून घेतला आहे. कोयनेत मागील वर्षीपेक्षा दुप्पट पाणी साठा असल्याची दिशाभूल करणारी माहिती मुख्यमंत्र्यांना देण्यात आली. त्यातूनच मुख्यमंत्र्यांनी हे आदेश काढले आहेत. या आदेशामुळे कोयना धरणाच्या काठावर असणारी गावे दुष्काळग्रस्त होतील,’ अशी भीती पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांनी व्यक्त केली. 
 
यावर पालकमंत्र्यांनी खुलासा करताना ‘कोयना धरणातील जितके पाणी आपण कर्नाटक राज्याला देणार आहोत, तितकेच पाणी येत्या पावसाळ्यानंतर कर्नाटक आपल्याला देणार आहे, त्याचा रितसर करार सरकारने केला आहे,’ असे सांगितले. मात्र, ‘आपल्याला पुरेसे पाणी उरणार नाही. उन्हाळ्यात गावांना टंचाईला सामोरे जावे लागेल. यासाठी पाणी सोडण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा,’ असे मत आमदार देसाई यांनी व्यक्त केले. त्यांना आमदार मकरंद पाटील यांच्यासह इतर आमदारांनीही पाठिंबा दिला. ‘आमच्याकडे जास्त पाऊस पडतो. मात्र, इतरांना पाणी देण्याच्या नादात आम्ही दुष्काळी व्हायला लागलोय,’ अशी खंत आमदार मकरंद पाटील यांनी व्यक्त केली. 
 
प्रभावित गावांबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश
 या निर्णयामुळे कोयना काठच्या किती पाणी योजना प्रभावित होतील, याची माहिती घेऊन अहवाल सादर करण्याचे आदेश पालकमंत्री विजय शिवतारे यांनी संबंधित यंत्रणेला दिले.