शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

इको सेन्सिटिव्हबाबतचे ठराव तत्काळ थांबवा

By admin | Updated: February 20, 2015 23:13 IST

शिवेंद्रसिंहराजे भोसले : सातारा तालुका आमसभेत वनविभागाच्या अधिकाऱ्यांना सुनावले

सातारा : ‘वनविभागाने इको सेन्सिटिव्हमध्ये तालुक्यात येणाऱ्या गावांची आणि लोकप्रतिनिधींची स्वतंत्र बैठक घेतल्याशिवाय गावागावांतून सुरू असलेले ठराव घेण्याचे काम थांबावावे. जोपर्यंत बैठक होत नाही, तोपर्यंत विरोध राहील,’ असा सज्जड इशारा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आमसभेमध्ये दिला. सातारा पंचायत समितीच्या या आमसभा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली दिवंगत अभयसिंहराजे भोसले सभागृहात शुक्रवारी झाली. जीवन प्राधिकरण, महावितरण, एस.टी. आणि वनविभागाच्या कामकाजावर लोकप्रतिनिधींनी सभेत ताशेरे ओढले. या विभागाच्या कामकाजाबाबत अनेक तक्रारी आल्या. सभेला पंचायत समितीच्या सभापती कविता चव्हाण, उपसभापती सूर्यकांत पडवळ, जिल्हा परिषद सदस्य राजू भोसले, किरण साबळे-पाटील, तहसीलदार राजेश चव्हाण, पंचायत समितीचे सदस्य आणि अधिकारी उपस्थित होते.वनविभागाच्या आढाव्यात वनक्षेत्रपालांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना काही गावांनी निधी स्वीकारण्यास नकार दिला आहे, त्याबाबत आपण सांगावे, असे आवाहन केले. त्यावर आमदारांनी जोपर्यंत तुम्ही इको सेन्सिटिव्हचे फायदे-तोटे काय आहेत, हे सांगत नाही. तोपर्यंत आमचा विरोध राहील. वनविभागाचे अधिकारी गावागावांत जाऊन ठराव करून घेत आहेत; परंतु त्याबाबत लोकप्रतिनिधींना काही सांगितले जात नाही. एवढेच काय इको सेन्सिटिव्हचे काय निकष आहेत? याची माहिती नाही. त्यामुळे प्रांताधिकारी, तहसीलदार आणि सातारा तालुक्यातील इको सेन्सिटिव्हमध्ये समावेश झालेल्या गावातील प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी यांची लवकरात लवकर संयुक्त बैठक घ्यावी, तोपर्यंत ठराव घेण्याचे काम थांबवावे आणि जरी ठराव घेतली तरी बैठक होत नाही आणि संपूर्ण माहिती कळत नाही, तोपर्यंत विरोध राहील, असे स्पष्टपणे सांगितले. आमसभेस तालुक्यातील विविध गावांचे सरपंच, ग्रामसेवक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)अनेकांना छंद व्हॉट्स अ‍ॅपचा...सातारा : ‘वेडीच माणसे इतिहास घडवितात...वेडीच माणसे आधुनिक शोध लावतात,’ असं म्हटलं जातं; परंतु शोध लावणाऱ्या तसेच इतिहास घडविणाऱ्यांमध्ये मोजक्या मंडळींचाच समावेश असतो. तुम्ही आम्ही सर्वांनीच ठरवलं वेड पांघरायचं तर पेडगावला जाण्याशिवाय पर्याय उरत नसतो. कुणाला कशाचं वेड असावं, हे ज्याच्या-त्याच्या इच्छेचा प्रश्न. मात्र या वेडामुळे महत्त्वाच्या चर्चेतील गांभीर्यच निघून जात असेल तर त्याचा फायदा होण्यापेक्षा तोटाच होतो. शुक्रवारी सातारा पंचायत समितीच्या आमसभेतही अधिकारी तसेच काही नागरिकांचं ‘वायफाय’ वेड पाहायला मिळालं. सभा सुरू असताना ही ‘व्हॉट्स अ‍ॅप’ वेडी माणसं त्यांच्याच नादात असलेली पाहायला मिळाली.पंचायत समितीच्या सभागृहात आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या अध्यक्षतेखाली आमसभा झाली. यावेळी अनेकांचे मोबाईल मध्येच खणखणत असताना पाहायला मिळाले. सभेत आमदार महत्त्वाच्या सूचना देत असताना काही अधिकारी व सभेला उपस्थित असलेले नागरिक मोबाईलवर खेळताना पाहायला मिळाले. या सभेत काही अधिकारी व नागरिक मोबाईलवर चॅटिंग करताना पाहायला मिळाले. या पामरांना सभेतील कामकाजाचे काही पडले नव्हते. स्मितहास्य करीत त्यांचे हे चॅटिंगचे वेड सुरूच होते. मात्र, यातून आमसभेचे गांभीर्यच त्यांना नसल्याचे यानिमित्ताने पुढे आले.मोबाईल नावाचं ‘पिल्लू’ सर्वच जण खिशामध्ये घेऊन वागवतात. व्हॉट्स अ‍ॅपमुळे हे पिल्लू वारंवार ‘टँवटँव’ करत असतं. सभेत बसलेल्या सर्वांचच लक्ष ते पिल्लू वारंवार वेधून घेतं. मोबाईलचा शोध लागण्यापूर्वीपासून आमसभा घेतली जाते. आमदारांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या सभेत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा सुरू असते. सामान्य नागरिकही आपले प्रश्न उपस्थित करू शकतात. या सभेमध्ये खरंतर मोबाईलची गरजच काय? हा प्रश्न वारंवार उभा राहत आहे. (प्रतिनिधी)मोबाईल सायलेंटवर ठेवला तर...!सभेत महत्त्वाच्या बाबींवर चर्चा सुरू असते. या चर्चेमध्ये अधिकाऱ्यांसह नागरिकांचाही सहभाग असणे आवश्यक असते; परंतु मोबाईलमुळे या सभेत भलताच कल्ला होताना पाहायला मिळत आहे. अचानकपणे मोबाईलची रिंग वाजते आणि वातावरणातील गांभीर्यच निघून जाते. हा वाजणारा मोबाईल सर्वांचे लक्ष वेधून घेतो.