शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

राज्यातील ५१ गडकोट होणार ‘राज्य संरक्षित स्मारक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 01:00 IST

सातारा : जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा समृद्ध करण्यासाठी गडसंवर्धन समिती आणि पुरातत्त्व विभागाच्या समन्वयाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. त्यानुसार ...

सातारा : जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा समृद्ध करण्यासाठी गडसंवर्धन समिती आणि पुरातत्त्व विभागाच्या समन्वयाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. त्यानुसार राज्यातील ५१, तर जिल्ह्यातील १५ गडकोटांना ‘राज्य संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित करण्यात येणार असून, याबाबतची प्रक्रियाही गतिमान झाली आहे.साताऱ्यात मंदिरे, गडकोट, इमारती, स्मारके यांसह विविध वास्तू आजही इतिहासाची साक्ष देत उभे आहेत; परंतु जाज्वल्य पराक्रमाचे साक्षीदार असलेले जिल्ह्यातील बहुतांश गड, किल्ले संवर्धनाअभावी अखेरची घटका मोजत आहेत.गेली अनेक वर्षे देखभाल, दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या या गडकोटांना आता नवसंजीवनी मिळणार आहे. जागतिक वारसा दिनाचे औचित्य साधून गडसंवर्धन समिती आणि पुरातत्त्व विभाग यांच्या समन्वयाने गडकोटांचे संवर्धन करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. त्यानुसार राज्यातील ८३ किल्ल्यांची यादी जाहीर करण्यात आली असून, यापैकी ५१ गडकोटांना राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले जाणार आहे. या ५१ गडकोटांमध्ये सातारा जिल्ह्यातील १५ गटकोटांचा समावेश आहे. साताºयासह पुणे, नगर, नाशिक, ठाणे, रत्नागिरी, रायगड, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील गडकोटांचाही यामध्ये समावेश आहे. या निर्णयामुळे उपेक्षित गडकोटांच्या जतन-संवर्धनाचा मार्ग सुकर होणार असून, याबातची प्रक्रियाही गतिमान झाली आहे.संरक्षित स्मारक म्हणजे काय?महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व विभागामार्फत सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी काही महाराष्ट्रातील काही ऐतिहासिक वास्तू, इमारती, स्मारके, जागा संरक्षित केल्या जातात. अशा ठिकाणांना राज्य संरक्षित स्मारके म्हटले जाते. या ठिकाणांची देखभाल आणि संरक्षणाचे काम राज्य शासनाच्या पुरातत्त्व विभागामार्फत केले जाते. संरक्षित स्मारकांना हानी होऊ नये, यासाठी ऐतिहासिक वास्तू व स्मारके जतन कायदा लागू करण्यात आला आहे. या कायद्यानुसार आता गटकोटांवर अतिक्रमण करणाऱ्यांवर व हानी पोहोचविणाºयांवर चाप बसणार आहे.या किल्ल्यांचा समावेशचंदन-वंदन, वैराटगड, पांडवगड, अजिंक्यतारा, वारुगड, संतोषगड, भूषणगड, वर्धनगड, वसंतगड, दातेगड, कमळगड, वासोटा, नांदगिरी, केंजळगड, भैरवगड.