शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

धोकादायक चढ काढण्यास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 23:16 IST

धोकादायक चढ काढण्यास प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कखंडाळा : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या खंबाटकी घाटातील दुसऱ्या वळणावरील धोकादायक चढ काढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे या घाटातील वळणावरील धोका टळल्याने वाहन चालकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.घाटाच्या सहापदरीकरणात या वळणावर रस्ता रुंदावला गेला. मात्र, येथील वळण तांत्रिकदृष्ट्या चुकीचे बनले गेल्याने अपघात घडत होते. याबाबत ‘लोकमत’ने यापूर्वी वृत्त प्रसिद्ध करून हायवे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर वस्तुस्थिती लक्षात घेऊन या ठिकाणी उपाययोजना सुरू करण्यात आली आहे. खंबाटकीचा मुख्य घाट चढताना दुसऱ्या वळणावर उभ्या चढणीसह तीव्र वळण घेण्यात आले होते. वास्तविक या ठिकाणी रस्ता रुंदीकरण करताना ‘बँकिंग आॅफ रोड’ बिघडला होता. रस्ता बनवताना तांत्रिकदृष्ट्या राहिलेल्या या चुकीमुळे वाहने वळताना अचानक पलटी होत होती. त्यामुळे या वळणावर सातत्याने अपघात होत होते. लाखो रुपये खर्चून बनवलेल्या या रस्त्यावरील त्रुटींमुळे वाहनांचे नाहक नुकसान होत होते. घाटासारख्या मुख्य रस्त्यावर केलेले दुर्लक्ष ‘लोकमत’ने उजेडात आणले होते.खंबाटकी घाटाच्या सहापदरीकरणाच्या कामात अनेक ठिकाणी त्रुटी राहिलेल्या आहेत. त्याचा त्रास वाहनचालकांना सहन करावा लागत आहे. दुसऱ्या वळणावरील धोकादायक चढण व जागोजागी संरक्षक कठड्यांची दुरवस्था याबाबत वारंवार दुरुस्तीची मागणीही केली जात होती. अखेर हायवे प्रशासनाला रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मुहूर्त सापडला असून, वळणावरील चढण कमी करण्यासाठी रस्ता खोदला आहे. या जागी चढण कमी करून योग्य वळण देण्याची उपाययोजना सुरू केली आहे. खर्च कोणाच्या माथी...रस्ता बनविण्यासाठी लाखो रुपये खर्ची पडल्यानंतर केवळ तांत्रिक मुद्द्यांवर भर दिला गेला नसल्याने पुन्हा काम करण्याची वेळ वर्षभरातच ओढवली आहे. त्यामुळे या अतिरिक्त खर्चाचा बोजा कोणाच्या माथी पडणार अशीही चर्चा जनतेमध्ये केली जात आहे.