शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्यांना कर्जातून सावरण्यासाठी बाजारपेठ सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:24 IST

महाबळेश्वर : महाबळेश्वरमधील बाजारपेठ अनेक दिवसांपासून बंद असल्याने व्यापारी कर्जबाजारी होत आहेत. या विळख्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी निर्बंध शिथील ...

महाबळेश्वर : महाबळेश्वरमधील बाजारपेठ अनेक दिवसांपासून बंद असल्याने व्यापारी कर्जबाजारी होत आहेत. या विळख्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी निर्बंध शिथील करावेत, अशी मागणी महाबळेश्वर येथील उपनगराध्यक्ष अफजल सुतार व माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर यांच्या नेतृत्वाखालील व्यापारी प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, काही महिन्यांचा उपवाद वगळता महाबळेश्वर व पाचगणी ही जुळी पर्यटनस्थळे कोरोनामुळे बंद आहेत. अलीकडे जिल्हाधिकाऱ्यांनी नुकतीच ही दोन्ही पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी खुली केली आहेत. एकीकडे पर्यटनासाठी महाबळेश्वर खुले करण्यात आले आहे. परंतु, बाजारपेठ बंद आहे. यामुळे सर्वसामान्य व्यापाऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. व्यवसाय बंद असल्याने कर्जबाजारी झालेला व्यापारी आता या कर्जाच्या विळख्यात अधिकच गुंतत चालला आहे. या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी बाजारपेठ सुरू होणे आवश्यक आहे. पर्यटनावर येथील सर्वच घटकांचा चरितार्थ अवलंबून आहे, म्हणून आता लवकरात लवकर बाजारपेठ सुरू करण्याची मागणी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांकडून केली जात आहे.

जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी महाबळेश्वर व पाचगणी ही दोन्ही पर्यटनस्थळे सुरू करावीत. येथील लाॅज व हाॅटेल व्यवसाय सुरू आहेत. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरूच आहेत परंतु सर्वसाधारण गरजेची परंतु जीवनावश्यक नसलेल्या वस्तूंची दुकानेही सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी द्यावेत. बाजारपेठेप्रमाणेच येथील टॅक्सी व्यवसाय, घोडे व्यवसाय सुरू करण्याची आवश्यकता आहे.

या शिष्टमंडळात ॲड. संजय जंगम, अतुल सलागरे, विशाल तोष्णीवाल, तौफिक पटवेकर, सचिन वागदरे, रवींद्र कुंभारदरे व टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष अंकुश बावळेकर यांचा समावेश होता.