शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
2
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
3
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
4
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
5
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
6
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
7
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
8
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
9
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
10
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
11
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
12
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
13
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
14
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
15
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
16
'मदर्स डे'निमित्त मराठी कलाकारांनी व्यक्त केलं आईवरचं प्रेम, शेअर केले खास फोटो
17
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
18
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
19
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
20
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक

एसटी बंद; शेकडो विद्यार्थ्यांचे पेपर बुडाले!

By admin | Updated: April 7, 2015 01:13 IST

जावळी खोऱ्यात हतबलता : सत्तर गावांतील विद्यार्थ्यांची अनेक मैल पायपीट; शैक्षणिक नुकसानीला जबाबदार कोण?

बामणोली : साताऱ्याच्या मुख्य बसस्थानकावरून सोमवारी सकाळी सुटणाऱ्या दोन बस अचानक रद्द केल्याने कास परिसरातील प्रवासी व विद्यार्थ्यांना याचा चांगला फटका बसला. एसटी न आल्याने अनेक विद्यार्थ्यांना वार्षिक पेपर देता आले नाहीत. तर गावोगावी जाणारे प्रवासी एसटी आता येईल नंतर येईल म्हणत तासन्तास ताटकळत बसले. राज्य परिवहन महामंडळाच्या या कारभाराचा सर्वांनीच निषेध केला. याबाबत माहिती अशी की, सातारा येथील मध्यवर्ती बसस्थानकातून बामणोली, कास, तापोळा या जावळी खोऱ्यातील गावांसाठी एसटी सुटतात. सातारा बसस्थानकातून सोमवार, दि. ६ रोजी सकाळी साडेसातला सुटणारी वांजळवाडी, घाटाई तसेच सकाळी आठलाच सुटणारी बामणोली, तेटली बसच्या फेऱ्या अचानकपणे रद्द करण्यात आल्या. त्यामुळे ही बस सातारच्या पुढे आलीच नाही. परिणामी यवतेश्वर, सांबरवाडी, अनावळे, जांभळमुरे, आटाळी, पेट्री बंगला, कासाणी, घाटाई, अंधारी येथील विद्यार्थ्यांना वेळेवर बस मिळाली नाही. त्यामुळे त्यांना सोमवारी होणारा वार्षिक परीक्षेचा पेपर देता आला नाही. हे विद्यार्थी बसथांब्यावर थांबून राहिले होते. सकाळी नऊला त्यांना बस मिळाली; पण तोपर्यंत अर्धा पेपर संपला होता. यामुळे या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. बस रद्द झाल्याने प्रवाशांनाही याचा फटका बसला. त्यामुळे विद्यार्थी, पालकांसाह प्रवाशांनी याचा तीव्र शब्दांत निषेध केला. तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीला जबाबदार कोण? असा प्रश्नही केला आहे. दरम्यान, बसबद्दल सातारा येथील राज्य परिवहन महामंडळाच्या नियंत्रण कक्षात दूरध्वनी केला तरी उचलला जात नव्हता. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळ प्रवाशांच्या सोयीसाठी की गैरसोयीसाठी, असा प्रश्न विद्यार्थ्यांसह पालकांना पडला आहे. (वार्ताहर) पेपरचे काय ? बसमुळे काही विद्यार्थी शाळेत गेलेच नाहीत. तर काहीजण उशिरा पोहोचले. उशिरा शाळेत गेले त्यांना पेपर सोडविण्यासाठी कमी वेळ मिळाला. काही विद्यार्थ्यांना आपले गाऱ्हाणे मुख्याध्यापकासमोर मांडावे लागले. ऐन परीक्षेच्या काळात घडलेल्या या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणाम झाला आहे. सत्तर गावांचा आहे प्रश्न... जावळी व सातारा तालुक्यांतील सुमारे सत्तर गावांना सातारा बसस्थानकातून बस सोडली जाते. ही सत्तर गावे कास, बामणोली, तापोळा परिसरात आहेत. या भागातील प्रवासी संख्याही अधिक आहे. तरीही परिवहन महामंडळ वेळेवर बस सोडण्याबाबत उदासीन आहे. बस वेळेवर सोडण्यासाठी वारंवार सांगूनही संबंधित लक्ष देत नाहीत. त्यामुळे न्याय मागायचा कोणाकडे, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. बामणोली-गोगवेकडे जाणाऱ्या बसच्या फेऱ्या अनेकवेळा रद्द करण्यात येतात. तसेच उशिरानेही बस सोडल्या जातात. काही बस घाटातच बंद पडत असतात. त्यामुळे विद्यार्थी व प्रवाशांचे हाल होत आहेत. यामार्गावर वेळेवर व चांगल्या स्थितीतील बस सोडण्याची गरज आहे. - विजय जाधव, सरपंच उंबरीवाडी, ता. जावळी