शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

एसटी बंद; शेकडो विद्यार्थ्यांचे पेपर बुडाले!

By admin | Updated: April 7, 2015 01:13 IST

जावळी खोऱ्यात हतबलता : सत्तर गावांतील विद्यार्थ्यांची अनेक मैल पायपीट; शैक्षणिक नुकसानीला जबाबदार कोण?

बामणोली : साताऱ्याच्या मुख्य बसस्थानकावरून सोमवारी सकाळी सुटणाऱ्या दोन बस अचानक रद्द केल्याने कास परिसरातील प्रवासी व विद्यार्थ्यांना याचा चांगला फटका बसला. एसटी न आल्याने अनेक विद्यार्थ्यांना वार्षिक पेपर देता आले नाहीत. तर गावोगावी जाणारे प्रवासी एसटी आता येईल नंतर येईल म्हणत तासन्तास ताटकळत बसले. राज्य परिवहन महामंडळाच्या या कारभाराचा सर्वांनीच निषेध केला. याबाबत माहिती अशी की, सातारा येथील मध्यवर्ती बसस्थानकातून बामणोली, कास, तापोळा या जावळी खोऱ्यातील गावांसाठी एसटी सुटतात. सातारा बसस्थानकातून सोमवार, दि. ६ रोजी सकाळी साडेसातला सुटणारी वांजळवाडी, घाटाई तसेच सकाळी आठलाच सुटणारी बामणोली, तेटली बसच्या फेऱ्या अचानकपणे रद्द करण्यात आल्या. त्यामुळे ही बस सातारच्या पुढे आलीच नाही. परिणामी यवतेश्वर, सांबरवाडी, अनावळे, जांभळमुरे, आटाळी, पेट्री बंगला, कासाणी, घाटाई, अंधारी येथील विद्यार्थ्यांना वेळेवर बस मिळाली नाही. त्यामुळे त्यांना सोमवारी होणारा वार्षिक परीक्षेचा पेपर देता आला नाही. हे विद्यार्थी बसथांब्यावर थांबून राहिले होते. सकाळी नऊला त्यांना बस मिळाली; पण तोपर्यंत अर्धा पेपर संपला होता. यामुळे या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. बस रद्द झाल्याने प्रवाशांनाही याचा फटका बसला. त्यामुळे विद्यार्थी, पालकांसाह प्रवाशांनी याचा तीव्र शब्दांत निषेध केला. तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीला जबाबदार कोण? असा प्रश्नही केला आहे. दरम्यान, बसबद्दल सातारा येथील राज्य परिवहन महामंडळाच्या नियंत्रण कक्षात दूरध्वनी केला तरी उचलला जात नव्हता. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळ प्रवाशांच्या सोयीसाठी की गैरसोयीसाठी, असा प्रश्न विद्यार्थ्यांसह पालकांना पडला आहे. (वार्ताहर) पेपरचे काय ? बसमुळे काही विद्यार्थी शाळेत गेलेच नाहीत. तर काहीजण उशिरा पोहोचले. उशिरा शाळेत गेले त्यांना पेपर सोडविण्यासाठी कमी वेळ मिळाला. काही विद्यार्थ्यांना आपले गाऱ्हाणे मुख्याध्यापकासमोर मांडावे लागले. ऐन परीक्षेच्या काळात घडलेल्या या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणाम झाला आहे. सत्तर गावांचा आहे प्रश्न... जावळी व सातारा तालुक्यांतील सुमारे सत्तर गावांना सातारा बसस्थानकातून बस सोडली जाते. ही सत्तर गावे कास, बामणोली, तापोळा परिसरात आहेत. या भागातील प्रवासी संख्याही अधिक आहे. तरीही परिवहन महामंडळ वेळेवर बस सोडण्याबाबत उदासीन आहे. बस वेळेवर सोडण्यासाठी वारंवार सांगूनही संबंधित लक्ष देत नाहीत. त्यामुळे न्याय मागायचा कोणाकडे, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. बामणोली-गोगवेकडे जाणाऱ्या बसच्या फेऱ्या अनेकवेळा रद्द करण्यात येतात. तसेच उशिरानेही बस सोडल्या जातात. काही बस घाटातच बंद पडत असतात. त्यामुळे विद्यार्थी व प्रवाशांचे हाल होत आहेत. यामार्गावर वेळेवर व चांगल्या स्थितीतील बस सोडण्याची गरज आहे. - विजय जाधव, सरपंच उंबरीवाडी, ता. जावळी