शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
2
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
3
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
4
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
5
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
6
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
7
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
8
आजचा अग्रलेख: तेलुगू की तामिळ? भारतीय राजकारणाचा उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकणारा लंबक
9
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
10
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
11
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
12
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
13
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
14
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
15
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
16
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
17
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
18
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
19
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
20
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या

एसटी रोज करावी लागतेय बंद-चालू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:28 IST

सातारा : कोणत्याही वस्तूचा नियमित वापर होत नसल्यास गंज चढतो, पुढे काम करणे बंद होते, हा आपल्याला नेहमीच येत ...

सातारा : कोणत्याही वस्तूचा नियमित वापर होत नसल्यास गंज चढतो, पुढे काम करणे बंद होते, हा आपल्याला नेहमीच येत असलेला अनुभव आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्या तर गेल्या वर्षी सात महिने अन् आता सुमारे एक महिन्यापासून बंद आहेत. त्यामुळे या गाड्यांची काय अवस्था होत असेल, असा प्रश्न निर्माण होतो. मात्र हेच नुकसान टाळण्यासाठी कामगार प्रत्येक गाडी दररोज चालू करून बंद करत आहेत.

जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव सर्वसाधारणपणे गेल्या वर्षी मार्चमध्ये झाला. तेव्हा कोरोनाचा आणखी संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने सार्वजनिक प्रवासी वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ऑगस्टनंतर कोरोनाची साथ कमी होऊ लागल्यानंतर एसटी सुरू झाली. पण या काळात जवळपास सात महिने सर्व गाड्या एकाच ठिकाणी होत्या. त्याचप्रमाणे पुन्हा या वर्षी गेल्या महिन्यात कोरोनाची दुसरी लाट आली आणि पुन्हा प्रवासी वाहतूक बंद करावी लागली. त्यामुळे याचा सर्वाधिक फटका एसटीला बसला.

गाड्या एकाच ठिकाणी असल्याने नुकसान होऊ नये म्हणून विभागीय कार्यशाळा तसेच आगारातील कारागीर ठराविक संख्येने कर्तव्यावर येत आहेत. ही मंडळी कामावर आल्यावर एकानंतर एक गाड्या सुरू करून आतमध्येच एखादी चक्कर मारून आणत असतात. तसेच राहिलेली कामे करत असतात. वेळ पडलीच तर काही गाड्यांच्या बॅटऱ्या मात्र सोडवून बाजूला केल्या जातात. त्यामुळे नुकसान टळले जाते.

११

जिल्ह्यातील आगार

७५०

एकूण बससंख्या

वर्षातून तीन महिने रस्त्यावर

n गेल्या वर्षी २२ मार्चपासून एसटीची सेवा बंद होती. ती सर्वसाधारणपणे दसऱ्यापूर्वी ऑक्टोबरमध्ये सुरू झाली. त्यामुळे या वर्षात केवळ ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या महिन्यांत फेऱ्या सुरू होत्या.

n गाड्या एकाच जागी उभ्या असल्याने महामंडळाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. वेतन करण्याएवढेही उत्पन्न नव्हते.

काळजीमुळे

खर्च कमी

n राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा विभागीय कार्यशाळा तसेच आगारातील कर्मचारी वाहनांची वेळीच काळजी घेत आहेत.

n लहानमोठा बिघाड असल्यास तो तत्काळ दुरुस्त केला जात असल्याने यानंतर रस्त्यावर आणण्यास फारसा खर्च येणार नाही.

लाॅकडाऊन असले तरी ठराविक संख्येने कर्मचारी येत असतात. ते वाहनांची देखभाल दररोज पाहतात. त्यांच्या कामाचे वार्षिक नियोजन तयार असते. त्यानुसार ते ते कामे सुरू आहेत. सध्या पावसाळ्यापूर्वीची कामे सुरू आहेत.

- संजय भोसले, प्रभारी, यंत्र अभियंता चालन

कोट्यवधीचे नुकसान

राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा विभागात अकरा आगार आहेत. यातील सर्वच आगारांतून चांगली वाहतूक केली जाते. मात्र गेल्या वर्षी झालेल्या लाॅकडाऊनमुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. हे कधीच भरून निघणारे नाही.