शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
2
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
3
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
4
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
5
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
6
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
7
दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला...
8
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
9
अपघाताच्या एक दिवस आधी एअर इंडियाच्या सीईओंचा पगार ४६% वाढवला; आता किती पैसे मिळतात?
10
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
11
प्रेक्षकांची प्रतीक्षा आज संपणार; काही तासात सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो येणार; पाहा झलक
12
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
13
केदारनाथला देवाकडे काय मागितलं? चाहत्याचा प्रश्न, अमृताचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाली- "खरं सांगू..."
14
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...
15
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
16
ज्या कतारवर हल्ला केला, त्याच कतारच्या शेखने फोन केला...; अन् इराण सीझफायरसाठी तयारही झाला...
17
"अमेरिकेला गुडघे टेकायला लावले, इराण बनला मुस्लिम जगताचा नेता’’, महबूबा मुफ्ती यांनी केलं कौतुक  
18
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
19
युद्धबंदीच्या बातमीनंतर सेन्सेक्स-निफ्टी वधारले, पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
20
लग्नानंतर दरमहा १०,००० फिक्स! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त एकदाच करा गुंतवणूक!

कऱ्हाडातील चौक वडापने घेरले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:43 IST

कऱ्हाड : येथील बसस्थानक आणि कर्मवीर भाऊराव पाटील पुतळा परिसरात मनमानी पद्धतीने रिक्षा लावल्या जात आहेत. तेथे वाहतूक पोलीस ...

कऱ्हाड : येथील बसस्थानक आणि कर्मवीर भाऊराव पाटील पुतळा परिसरात मनमानी पद्धतीने रिक्षा लावल्या जात आहेत. तेथे वाहतूक पोलीस तैनात असतानाही रिक्षा अस्ताव्यस्त लावल्या जात असून, वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. सध्या शहरातील चौक वडापने घेरल्याचे दिसत आहे.

शहरातील कर्मवीर चौक, दत्त चौकासह भेदा चौकात काही रिक्षा चालकांकडून रिक्षा मुद्दाम आडव्या लावल्या जात आहेत. त्यासंदर्भात नागरिकांनी विचारणा केली तर त्यांना उलट उत्तरे दिली जात आहेत. पालिका, पोलीस आणि आरटीओ यांनी संयुक्तपणे मोहीम राबवून बसस्थानक परिसरात बिघडलेल्या वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी कारवाईचा दंडुका हाती घेणे गरजेचे आहे. बसस्थानकात दररोज हजारो प्रवासी ये-जा करतात. अनेकदा प्रवासी ये-जा करण्यासाठी रिक्षांचा वापर करतात. मात्र, स्वत:च्या वाहनाने, दुचाकीने बसस्थानकावर येणाऱ्या प्रवाशांची संख्याही मोठी आहे. अशा विविध मार्गांनी येणाऱ्या प्रवाशांना बसस्थानकात जाण्यासाठी दररोज अस्ताव्यस्त उभ्या होणाऱ्या रिक्षांचा सामना करावा लागतो. त्याचबरोबर कर्मवीर भाऊराव पाटील पुतळ्याच्या परिसरातील रिक्षा व्यावसायिकांचाही उद्योग अशाच प्रकारे चालला आहे.

मलकापूर परिसरात जाणाऱ्या रिक्षा तर त्यांचा थांबा सोडून रस्त्यावरच प्रवाशांना घेतात. त्याचबरोबर पुतळ्यासमोर असलेल्या रिक्षा थांब्यावर अनेकदा रिक्षांच्या दोन-दोन रांगा केल्या जातात. तेथेच सिग्नलही असल्याने या सर्व रिक्षांचा अन्य वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

- चौकट

वाहतूक पोलिसांसमोर मनमानी

वाहतूक पोलिसांसमोरच हा प्रकार घडत असताना त्यांच्याकडून काहीच उपाययोजना होत नसल्याने वाहनधारकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे आता बसस्थानकाबाहेरील बिघडलेल्या रिक्षाचालकांना शिस्त लावण्यासाठी पालिका, पोलीस आणि आरटीओ यांनीच पुढाकार घेण्याची गरज आहे.

- चौकट

पादचारी मार्गालगत यांचीच सत्ता

कऱ्हाड शहरातील बसस्थानक परिसरातील पादचारी मार्गावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे. अनेक व्यावसायिकांनी पादचारी मार्गावरच आपले व्यवसाय थाटले आहेत. त्यातच फूटपाथला घासून वडापची वाहने उभी केली जात असल्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून प्रवास करावा लागतो.

फोटो : २७केआरडी०३

कॅप्शन : जिजामातानगर - विमानतळ, ता. कऱ्हाड येथे जिजामाता चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.