शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
3
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
4
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
5
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
6
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
7
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
8
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
9
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
10
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
11
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
12
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
13
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
14
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
15
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
16
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
17
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
18
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
19
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी : कांबळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:25 IST

म्हसवड : चालू खरीप हंगामामध्ये सर्व शेतकरी बांधवांनी बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी, असे आवाहन कृषी सहाय्यक राहुल कांबळे यांनी ...

म्हसवड : चालू खरीप हंगामामध्ये सर्व शेतकरी बांधवांनी बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी, असे आवाहन कृषी सहाय्यक राहुल कांबळे यांनी केले.

वीरकरवाडी व पुळकोटी येथे तालुका कृषी अधिकारी प्रकाश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम बीजप्रक्रिया मोहीम सन २०२१ - २२ अंतर्गत बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक शिबिर आयोजित करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी मंडल कृषी अधिकारी कार्यालय, म्हसवड येथील कृषी पर्यवेक्षक हरिभाऊ वेदपाठक, जयवंत लोखंडे, गणेश माळी उपस्थित होते.

बीजप्रक्रिया व त्याचे फायदे याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना राहुल कांबळे पुढे म्हणाले, जमिनीतून व बियाण्यातून पसरणारे विविध रोग व किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी, बियाण्याची उगवण क्षमता वाढविण्यासाठी व रोपे जोमदार वाढण्यासाठी बियाण्यास रासायनिक व जैविक औषधांची प्रक्रिया केली जाते. याला बीजप्रक्रिया असे म्हणतात. रासायनिक घटकांमध्ये बुरशीनाशक व कीडनाशकांची, तर जैविक घटकांमध्ये अझोटोबॅक्टर किंवा ॲझोस्पिरीलम (तृणधान्य वर्गीय पिकांसाठी), स्फुरद विरघळणारे जिवाणू, रायझोबियम (कडधान्यवर्गीय पिकांसाठी) या जीवाणूंची बियाण्यास प्रक्रिया केली जाते.

बियाण्याला विविध कीड व रोगांपासून वाचविण्यासाठी बीज प्रक्रिया करणे अत्यंत आवश्यक आहे. चालू खरीप हंगामामध्ये सर्व शेतकरी बांधवांनी बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले. हरिभाऊ वेदपाठक व जयवंत लोखंडे यांनी बाजरी बियाण्यास जिवाणू संवर्धकाच्या बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिक करून दाखविले. यावेळी कृषिमित्र राधेश वीरकर, शंकर वीरकर व शेतकरी उपस्थित होते.

===Photopath===

180621\img-20210617-wa0045.jpg

===Caption===

विरकरवाडी- शेतक-यांना बीजप्रक्रियाचे प्रात्यक्षिक करुन दाखविताना राहूल कांबळे,हरिभाऊ वेदपाठक, जयवंत लोखंडे,