शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

मुलांच्या खांद्यावर ‘कुणाचे’ ओझे?

By admin | Updated: June 22, 2015 00:25 IST

‘लोकमत’ने केलं सत्यशोधन : वीस किलोचा विद्यार्थी पाठीवर वागवतोय साडेचार किलोचं दप्तर-- लोकमत विशेष

सातारा : इंटरनेटमुळे जग लहान झालं आणि मोबाइच्या रूपाने खिशात जाऊन बसलं. कार्यालये ‘पेपरलेस’ होऊन फायलींचे गठ्ठे ‘हार्ड डिस्क’मध्ये सामावले. पण मोठ्यांचं जग असं हळूहळू ‘मायक्रो’ होत असताना लहानग्यांचं दप्तर मात्र अजून गलेलठ्ठच आहे. वीस ते बावीस किलो वजनाचा विद्यार्थी पाठीवर वागवतोय साडेचार ते पाच किलोचं दप्तर. या दप्तरात डोकावलं असता चिमुकल्यांच्या पाठीवर अपेक्षांबरोबरच काही ठिकाणी पालकांचं अज्ञान आणि काही ठिकाणी चक्क दुराग्रहाचंही ओझं जाणवतं. प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या पाठीवरचं दप्तराचं ओझं कसं कमी करता येईल, याविषयी शासनाने एक समिती नेमली असून, पुढील वर्षीपर्यंत या समितीच्या सूचना अमलात येण्याची अपेक्षा आहे. या पार्श्वभूमीवर सध्या या चिमुकल्यांच्या पाठीवर किती ओझं आहे, ते कशामुळे आहे, त्याचे आरोग्यावरील परिणाम कोणते, शाळांची भूमिका काय, त्यांनी स्वत: काही उपाय योजले आहेत का, पालकांच्या चुका कोणत्या, याचा सर्वसमावेशक आढावा ‘लोकमत टीम’ने शुक्रवारी घेतला. यासाठी तीन शाळांची निवड करण्यात आली. यात एक इंग्रजी माध्यमाची, एक मराठी माध्यमाची तर एक नगरपालिकेची शाळा निवडण्यात आली. अण्णासाहेब राजेभोसले प्राथमिक विद्यालय, नगरपालिका शाळा क्र. ७ आणि सातारा इंग्लिश मीडियम स्कूल या शाळांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आलं. प्रत्येक शाळेतील तिसरी आणि चौथीच्या वर्गातील सर्वसामान्य प्रकृतीचा प्रत्येकी एक मुलगा आणि एक मुलगी निवडून त्यांचं आणि त्यांच्या दप्तराचं वजन करण्यात आलं. यावेळी असं दिसून आलं की, तिसरी आणि चौथीच्या विद्यार्थ्यांचं सरासरी वजन वीस ते साडेबावीस किलोच्या दरम्यान असून, त्यांच्या दप्तराचं सरासरी वजन साडेचार ते सव्वापाच किलोच्या दरम्यान आहे. काही विद्यार्थ्यांचं वजन पंचवीस किलोपर्यंत भरलं. परंतु असे विद्यार्थी तुरळकच आढळले. एकंदरीत प्रत्येक विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी स्वत:च्या वजनाच्या वीस ते पंचवीस टक्के (एक पंचमांश ते एक चतुर्थांश) वजनाचं दप्तर पाठीवर वागवतो/ वागवते, असं दिसून आलं. सामान्यत: प्राथमिक शाळांमध्ये दररोज आठ ते नऊ तासिका घेण्यात येतात. दोन शिफ्ट असल्यास नऊ तासिका शक्य होत नाहीत. दररोज दोन ते तीन तासिका कार्यानुभव, व्यवसाय शिक्षण, शारीरिक शिक्षण यांसारख्या विषयांच्या असतात. त्यामुळे सामान्यत: दररोज पाच ते सहा विषयांची पुस्तके आणि आवश्यक वह्या दप्तरात असाव्यात अशी अपेक्षा असते. तथापि, मुलांच्या दप्तरात याहून अधिक वह्या-पुस्तकं आढळतात. याखेरीज कंपासपेटी, इतर साहित्य, टिफिन आणि वॉटरबॅग प्रत्येक मुला-मुलीसोबत दिसते. टिफिन-वॉटरबॅगचं वजन दप्तराव्यतिरिक्त आहे. थोडा विचार, पालक-शाळांमध्ये सुसंवाद, पालकांचं अज्ञान, अवास्तव भीती दूर करणं, शाळेनं दिलेल्या सूचनांचं काटेकोर पालन असे उपाय योजले गेल्यास शासकीय समितीच्या सूचना येण्यापूर्वीच दप्तराचं वजन काही प्रमाणात का होईना, कमी करणं शक्य आहे, असं दिसून आलं. (लोकमत चमू) न पेलवणारं ओझं... दप्तराच्या ओझ्यानं मुलं सायंकाळी घरी परतल्यानंतर पुरती थकलेली असतात. त्यांच्यातील उत्साह मावळलेला दिसतो. चिमुरड्यांची अवस्था एखाद्या हमालासारखी होते. दप्तराचं ओझं कमी काय म्हणून त्यांना खासगी शिकवण्यांना जुंपलं जातं. सायंकाळी शाळेतून घरी आल्यानंतर फ्रेश होऊन लगेच क्लास गाठावा लागतो. त्याचं दप्तर वेगळंच असतं. एकूणच सध्याचं शिक्षण हे मुलांना ‘न पेलवणारं’ असल्याचं बोललं जात आहे. ‘सॅक’ला बंदी साताऱ्यातील निर्मला कॉन्व्हेंट स्कूलमध्ये सॅक आणायला बंदी आहे. या शाळेत पहिलीपासून विद्यार्थ्यांना शाळेचे दप्तर सक्तीचे करण्यात आले आहे. वैद्यकीय तज्ज्ञांनुसार सॅकमध्ये सगळी पुस्तके उभी आणि समोर बसतात, त्यामुळे त्याचे पूर्ण ओझे पाठीच्या मणक्यावर येते. याने विद्यार्थ्यांना बालवयातच पाठीचे विकार जडतात. या उलट दप्तरात वह्या पुस्तके आडवी बसतात. दप्तराचे ओझे दोन्ही खांद्यांवर विभागले आणि मणक्यावर ताण येत नाही. ही वैद्यकीय बाब लक्षात घेऊन निर्मला कॉन्व्हेंट स्कूलमध्ये दप्तर सक्तीचे करण्यात आले आहे. अबब..! अडीच किलोच्या वह्या मुलांच्या दप्तरात दडलंय काय, याची माहिती घेण्यासाठी काही शाळांची‘लोकमत टीम’ने पाहणी केली. यात काही धक्कादायक माहिती पुढे आले. वेळा पत्रकानुसार दप्तर न भरलेल्या चौथीच्या एका विद्यार्थ्याच्या फक्त वह्यांचे वजन होते तब्बल अडीच किलो! अन्य एका विद्यार्थ्याने आणलेल्या पुस्तकांचे वजन अडीच किलो भरले. प्रत्येक विषयासाठी पाठ्यपुस्तक (टेक्स्ट बुक) आणि कार्यपुस्तिका (वर्क बुक) असतं. ज्यावेळी ‘वर्क बुक’ आणायला सांगितलं जातं, तेव्हा ‘टेक्स्ट बुक’ जवळ असणं अपेक्षित नसतं. तरीही पालक दोन्ही पुस्तकं दप्तरात कोंबतात. ज्या विषयाला शंभर पानांची वही करायला शाळेकडून सांगितलं जातं, त्या विषयाला ‘नंतर कटकट नको,’ असं म्हणून पालक दोनशे पानी वही मुलांना देतात. पालकांकडून शाळेचं वेळापत्रक अनेकदा पाहिलं जात नाही. वेळापत्रकानुसार दप्तर भरलं, तर त्याचं वजन कमी होऊ शकेल. अनेक पालक वेळापत्रक न पाहता सर्वच वह्या-पुस्तकं दप्तरात कोंबतात. पाल्याला सोडायला येणारे पालक स्वत: दप्तर उचलतात. अनेक मुलं रिक्षानं येतात. त्यामुळं दप्तराचं वजन हा विषयच गांभीर्यानं घेतला जात नाही.