शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

मुलांच्या खांद्यावर ‘कुणाचे’ ओझे?

By admin | Updated: June 22, 2015 00:25 IST

‘लोकमत’ने केलं सत्यशोधन : वीस किलोचा विद्यार्थी पाठीवर वागवतोय साडेचार किलोचं दप्तर-- लोकमत विशेष

सातारा : इंटरनेटमुळे जग लहान झालं आणि मोबाइच्या रूपाने खिशात जाऊन बसलं. कार्यालये ‘पेपरलेस’ होऊन फायलींचे गठ्ठे ‘हार्ड डिस्क’मध्ये सामावले. पण मोठ्यांचं जग असं हळूहळू ‘मायक्रो’ होत असताना लहानग्यांचं दप्तर मात्र अजून गलेलठ्ठच आहे. वीस ते बावीस किलो वजनाचा विद्यार्थी पाठीवर वागवतोय साडेचार ते पाच किलोचं दप्तर. या दप्तरात डोकावलं असता चिमुकल्यांच्या पाठीवर अपेक्षांबरोबरच काही ठिकाणी पालकांचं अज्ञान आणि काही ठिकाणी चक्क दुराग्रहाचंही ओझं जाणवतं. प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या पाठीवरचं दप्तराचं ओझं कसं कमी करता येईल, याविषयी शासनाने एक समिती नेमली असून, पुढील वर्षीपर्यंत या समितीच्या सूचना अमलात येण्याची अपेक्षा आहे. या पार्श्वभूमीवर सध्या या चिमुकल्यांच्या पाठीवर किती ओझं आहे, ते कशामुळे आहे, त्याचे आरोग्यावरील परिणाम कोणते, शाळांची भूमिका काय, त्यांनी स्वत: काही उपाय योजले आहेत का, पालकांच्या चुका कोणत्या, याचा सर्वसमावेशक आढावा ‘लोकमत टीम’ने शुक्रवारी घेतला. यासाठी तीन शाळांची निवड करण्यात आली. यात एक इंग्रजी माध्यमाची, एक मराठी माध्यमाची तर एक नगरपालिकेची शाळा निवडण्यात आली. अण्णासाहेब राजेभोसले प्राथमिक विद्यालय, नगरपालिका शाळा क्र. ७ आणि सातारा इंग्लिश मीडियम स्कूल या शाळांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आलं. प्रत्येक शाळेतील तिसरी आणि चौथीच्या वर्गातील सर्वसामान्य प्रकृतीचा प्रत्येकी एक मुलगा आणि एक मुलगी निवडून त्यांचं आणि त्यांच्या दप्तराचं वजन करण्यात आलं. यावेळी असं दिसून आलं की, तिसरी आणि चौथीच्या विद्यार्थ्यांचं सरासरी वजन वीस ते साडेबावीस किलोच्या दरम्यान असून, त्यांच्या दप्तराचं सरासरी वजन साडेचार ते सव्वापाच किलोच्या दरम्यान आहे. काही विद्यार्थ्यांचं वजन पंचवीस किलोपर्यंत भरलं. परंतु असे विद्यार्थी तुरळकच आढळले. एकंदरीत प्रत्येक विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी स्वत:च्या वजनाच्या वीस ते पंचवीस टक्के (एक पंचमांश ते एक चतुर्थांश) वजनाचं दप्तर पाठीवर वागवतो/ वागवते, असं दिसून आलं. सामान्यत: प्राथमिक शाळांमध्ये दररोज आठ ते नऊ तासिका घेण्यात येतात. दोन शिफ्ट असल्यास नऊ तासिका शक्य होत नाहीत. दररोज दोन ते तीन तासिका कार्यानुभव, व्यवसाय शिक्षण, शारीरिक शिक्षण यांसारख्या विषयांच्या असतात. त्यामुळे सामान्यत: दररोज पाच ते सहा विषयांची पुस्तके आणि आवश्यक वह्या दप्तरात असाव्यात अशी अपेक्षा असते. तथापि, मुलांच्या दप्तरात याहून अधिक वह्या-पुस्तकं आढळतात. याखेरीज कंपासपेटी, इतर साहित्य, टिफिन आणि वॉटरबॅग प्रत्येक मुला-मुलीसोबत दिसते. टिफिन-वॉटरबॅगचं वजन दप्तराव्यतिरिक्त आहे. थोडा विचार, पालक-शाळांमध्ये सुसंवाद, पालकांचं अज्ञान, अवास्तव भीती दूर करणं, शाळेनं दिलेल्या सूचनांचं काटेकोर पालन असे उपाय योजले गेल्यास शासकीय समितीच्या सूचना येण्यापूर्वीच दप्तराचं वजन काही प्रमाणात का होईना, कमी करणं शक्य आहे, असं दिसून आलं. (लोकमत चमू) न पेलवणारं ओझं... दप्तराच्या ओझ्यानं मुलं सायंकाळी घरी परतल्यानंतर पुरती थकलेली असतात. त्यांच्यातील उत्साह मावळलेला दिसतो. चिमुरड्यांची अवस्था एखाद्या हमालासारखी होते. दप्तराचं ओझं कमी काय म्हणून त्यांना खासगी शिकवण्यांना जुंपलं जातं. सायंकाळी शाळेतून घरी आल्यानंतर फ्रेश होऊन लगेच क्लास गाठावा लागतो. त्याचं दप्तर वेगळंच असतं. एकूणच सध्याचं शिक्षण हे मुलांना ‘न पेलवणारं’ असल्याचं बोललं जात आहे. ‘सॅक’ला बंदी साताऱ्यातील निर्मला कॉन्व्हेंट स्कूलमध्ये सॅक आणायला बंदी आहे. या शाळेत पहिलीपासून विद्यार्थ्यांना शाळेचे दप्तर सक्तीचे करण्यात आले आहे. वैद्यकीय तज्ज्ञांनुसार सॅकमध्ये सगळी पुस्तके उभी आणि समोर बसतात, त्यामुळे त्याचे पूर्ण ओझे पाठीच्या मणक्यावर येते. याने विद्यार्थ्यांना बालवयातच पाठीचे विकार जडतात. या उलट दप्तरात वह्या पुस्तके आडवी बसतात. दप्तराचे ओझे दोन्ही खांद्यांवर विभागले आणि मणक्यावर ताण येत नाही. ही वैद्यकीय बाब लक्षात घेऊन निर्मला कॉन्व्हेंट स्कूलमध्ये दप्तर सक्तीचे करण्यात आले आहे. अबब..! अडीच किलोच्या वह्या मुलांच्या दप्तरात दडलंय काय, याची माहिती घेण्यासाठी काही शाळांची‘लोकमत टीम’ने पाहणी केली. यात काही धक्कादायक माहिती पुढे आले. वेळा पत्रकानुसार दप्तर न भरलेल्या चौथीच्या एका विद्यार्थ्याच्या फक्त वह्यांचे वजन होते तब्बल अडीच किलो! अन्य एका विद्यार्थ्याने आणलेल्या पुस्तकांचे वजन अडीच किलो भरले. प्रत्येक विषयासाठी पाठ्यपुस्तक (टेक्स्ट बुक) आणि कार्यपुस्तिका (वर्क बुक) असतं. ज्यावेळी ‘वर्क बुक’ आणायला सांगितलं जातं, तेव्हा ‘टेक्स्ट बुक’ जवळ असणं अपेक्षित नसतं. तरीही पालक दोन्ही पुस्तकं दप्तरात कोंबतात. ज्या विषयाला शंभर पानांची वही करायला शाळेकडून सांगितलं जातं, त्या विषयाला ‘नंतर कटकट नको,’ असं म्हणून पालक दोनशे पानी वही मुलांना देतात. पालकांकडून शाळेचं वेळापत्रक अनेकदा पाहिलं जात नाही. वेळापत्रकानुसार दप्तर भरलं, तर त्याचं वजन कमी होऊ शकेल. अनेक पालक वेळापत्रक न पाहता सर्वच वह्या-पुस्तकं दप्तरात कोंबतात. पाल्याला सोडायला येणारे पालक स्वत: दप्तर उचलतात. अनेक मुलं रिक्षानं येतात. त्यामुळं दप्तराचं वजन हा विषयच गांभीर्यानं घेतला जात नाही.