शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

तीन गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:25 IST

शिरवळ : खंडाळा तालुक्यातील पश्चिम भागातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या लढ्याला अनेक वर्षांनी यश आले आहे. पश्चिम भागातील अतिट, मिरजे, ...

शिरवळ : खंडाळा तालुक्यातील पश्चिम भागातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या लढ्याला अनेक वर्षांनी यश आले आहे. पश्चिम भागातील अतिट, मिरजे, झगलवाडी या तीन गावांमधील महिलांची डोक्यावर हंडा घेऊन होणारी पायपीट थांबणार आहे. दुर्गम व पावसाचे प्रमाण जास्त आहे. तरीही पाण्यापासून वंचित राहत असलेली पश्चिम भागातील अतिट, मिरजे, झगलवाडी या गावांनी अनेक वर्षे पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष केला आहे.

मिरजे, अतिट, झगलवाडी येथील ग्रामस्थांनी पाणीपुरवठा योजना राबविण्याची शासनाकडे वारंवार मागणी करुनही तांत्रिक अडचणींमुळे मोठ्या प्रमाणात योजना राबविताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. या अनुषंगाने या तीन गावांचा मूलभूत प्रश्न विचारात घेऊन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले यांनी हा प्रश्न सोडविण्याचा चंग बांधत याकरिता प्रयत्नांची पराकाष्ठा सुरु केली.

आमदार मकरंद पाटील यांचे मार्गदर्शनाखाली मिरजे, अतिट, झगलवाडी या तीन गावांचे सर्वेक्षण करून आराखडा तयार करुन पाणीटंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी मिटवण्यासाठी नियोजन केले. त्या अनुषंगाने शासनाच्या जलजीवन योजनेमध्ये समाविष्ट होण्याकरिता लागणाऱ्या सर्व बाबींची पूर्तता करत या गावांचे प्रस्ताव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्याकडे प्रशासकीय मान्यतेकरिता पाठवले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी शिरवळ जिल्हा परिषद गटातील मिरजे, अतिट, झगलवाडी या गावांच्या पाणी पुरवठा योजनेच्या प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरी दिली.